शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
3
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
4
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
5
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
6
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
7
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
8
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
9
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
10
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
11
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
12
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
13
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
14
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
15
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
16
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
17
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
18
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
19
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...

Ranya Rao : "मला १०-१५ वेळा कानाखाली मारल्या, कोऱ्या पानांवर सह्या घेतल्या"; अभिनेत्रीचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 15:01 IST

Ranya Rao : कन्नड अभिनेत्री रान्या राव हिने पुन्हा एकदा महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत आणि ती निर्दोष असल्याचा दावा केला आहे.

सोन्याच्या तस्करी प्रकरणात अडकलेली कन्नड अभिनेत्री रान्या राव हिने पुन्हा एकदा महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत आणि ती निर्दोष असल्याचा दावा केला आहे. एका पत्रात रान्या रावनं हा दावा केला आहे. ६ मार्च रोजी लिहिलेलं पाच पानांचं हाताने लिहिलेलं पत्र बंगळुरू येथील एचबीआर लेआउटच्या डीआरआयच्या अतिरिक्त महासंचालकांना लिहिलं आहे. या पत्रात रान्याचा दावा आहे की तिला खोट्या प्रकरणात अडकवण्यात आलं आहे.

रान्या रावने पत्रात लिहिलं आहे की, "मला विमानातच पकडण्यात आलं आणि कोणतंही स्पष्टीकरण न देता अटक करण्यात आली. मला अटक झाल्यापासून ते न्यायालयात हजर होईपर्यंत, मला किमान १०-१५ वेळा कानाखाली मारण्यात आली, त्या अधिकाऱ्यांनी मी ओळखू शकते. त्यांच्यापैकी एकाने सांगितलं की जर मी त्यांनी तयार केलेल्या कागदपत्रांवर सही केली नाही तर ते माझ्या वडिलांचं नाव आणि ओळख उघड करतील जरी ते यात सहभागी नसले तरी. प्रचंड दबाव आणि शारीरिक हल्ल्यामुळे मी ५०-६० टाईप केलेल्या आणि सुमारे ४० कोऱ्या पानांवर सही केली आहे."

"डीआरआय कोठडीत मला नीट झोपू किंवा जेवू दिलं जात नव्हतं. मी निर्दोष आहे आणि मला खोट्या आरोपात अडकवण्यात आलं आहे. दावा केल्याप्रमाणे कधीही माझी झडती घेण्यात आली नाही किंवा माझ्याकडून काहीही जप्त करण्यात आलं नाही. दिल्लीतील काही अधिकारी स्पष्टपणे इतर प्रवाशांना वाचवू इच्छितात आणि मला अडकवू इच्छितात. माझ्या अटकेपासून ते न्यायालयात हजर होईपर्यंत नोंदवलेल्या कोणत्याही जबाबावर विश्वास ठेवू नये अशी माझी विनंती आहे." रान्या रावला ३ मार्च रोजी केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबईहून बंगळुरूला येत असताना १२.५६ कोटी रुपयांच्या १४ किलो सोन्यासह अटक करण्यात आली होती. 

दुबईहून दरवेळी १५ किलो सोनं आणून किती कमाई करायची रान्या राव?, झाला धक्कादायक खुलासा

रान्याने यापूर्वीही अनेकदा तस्करी केली होती, असं सांगितलं जात आहे. परंतु यावेळी एजन्सीकडे ठोस माहिती होती. डीआरआयच्या या कारवाईमुळे सोन्याच्या तस्करीत सहभागी असलेल्या इतर अनेक नावांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या रॅकेटशी संबंधित आणखी लोकांची ओळख पटवली जात असून लवकरच अनेक मोठे खुलासे होऊ शकतात, असं तपास यंत्रणांचं म्हणणं आहे. अभिनेत्रीने २०१४ मध्ये 'माणिक्य' या कन्नड चित्रपटातून पदार्पण केलं आणि नंतर 'वगाह' आणि 'पटकी' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं, परंतु अचानक ती इंडस्ट्रीतून गायब झाली. 

टॅग्स :BengaluruबेंगळूरGoldसोनंAirportविमानतळCrime Newsगुन्हेगारी