शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

Ranya Rao : "मला १०-१५ वेळा कानाखाली मारल्या, कोऱ्या पानांवर सह्या घेतल्या"; अभिनेत्रीचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 15:01 IST

Ranya Rao : कन्नड अभिनेत्री रान्या राव हिने पुन्हा एकदा महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत आणि ती निर्दोष असल्याचा दावा केला आहे.

सोन्याच्या तस्करी प्रकरणात अडकलेली कन्नड अभिनेत्री रान्या राव हिने पुन्हा एकदा महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत आणि ती निर्दोष असल्याचा दावा केला आहे. एका पत्रात रान्या रावनं हा दावा केला आहे. ६ मार्च रोजी लिहिलेलं पाच पानांचं हाताने लिहिलेलं पत्र बंगळुरू येथील एचबीआर लेआउटच्या डीआरआयच्या अतिरिक्त महासंचालकांना लिहिलं आहे. या पत्रात रान्याचा दावा आहे की तिला खोट्या प्रकरणात अडकवण्यात आलं आहे.

रान्या रावने पत्रात लिहिलं आहे की, "मला विमानातच पकडण्यात आलं आणि कोणतंही स्पष्टीकरण न देता अटक करण्यात आली. मला अटक झाल्यापासून ते न्यायालयात हजर होईपर्यंत, मला किमान १०-१५ वेळा कानाखाली मारण्यात आली, त्या अधिकाऱ्यांनी मी ओळखू शकते. त्यांच्यापैकी एकाने सांगितलं की जर मी त्यांनी तयार केलेल्या कागदपत्रांवर सही केली नाही तर ते माझ्या वडिलांचं नाव आणि ओळख उघड करतील जरी ते यात सहभागी नसले तरी. प्रचंड दबाव आणि शारीरिक हल्ल्यामुळे मी ५०-६० टाईप केलेल्या आणि सुमारे ४० कोऱ्या पानांवर सही केली आहे."

"डीआरआय कोठडीत मला नीट झोपू किंवा जेवू दिलं जात नव्हतं. मी निर्दोष आहे आणि मला खोट्या आरोपात अडकवण्यात आलं आहे. दावा केल्याप्रमाणे कधीही माझी झडती घेण्यात आली नाही किंवा माझ्याकडून काहीही जप्त करण्यात आलं नाही. दिल्लीतील काही अधिकारी स्पष्टपणे इतर प्रवाशांना वाचवू इच्छितात आणि मला अडकवू इच्छितात. माझ्या अटकेपासून ते न्यायालयात हजर होईपर्यंत नोंदवलेल्या कोणत्याही जबाबावर विश्वास ठेवू नये अशी माझी विनंती आहे." रान्या रावला ३ मार्च रोजी केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबईहून बंगळुरूला येत असताना १२.५६ कोटी रुपयांच्या १४ किलो सोन्यासह अटक करण्यात आली होती. 

दुबईहून दरवेळी १५ किलो सोनं आणून किती कमाई करायची रान्या राव?, झाला धक्कादायक खुलासा

रान्याने यापूर्वीही अनेकदा तस्करी केली होती, असं सांगितलं जात आहे. परंतु यावेळी एजन्सीकडे ठोस माहिती होती. डीआरआयच्या या कारवाईमुळे सोन्याच्या तस्करीत सहभागी असलेल्या इतर अनेक नावांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या रॅकेटशी संबंधित आणखी लोकांची ओळख पटवली जात असून लवकरच अनेक मोठे खुलासे होऊ शकतात, असं तपास यंत्रणांचं म्हणणं आहे. अभिनेत्रीने २०१४ मध्ये 'माणिक्य' या कन्नड चित्रपटातून पदार्पण केलं आणि नंतर 'वगाह' आणि 'पटकी' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं, परंतु अचानक ती इंडस्ट्रीतून गायब झाली. 

टॅग्स :BengaluruबेंगळूरGoldसोनंAirportविमानतळCrime Newsगुन्हेगारी