शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीसाठी मुलीचे केले अपहरण, बदलापूर येथून केली आरोपीस अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 01:35 IST

अंडे खाण्याच्या बहाण्याने तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण करणाऱ्याला पोलिसांनी बदलापूर येथून बुधवारी रात्री अटक केली.

भिवंडी : अंडे खाण्याच्या बहाण्याने तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण करणाऱ्याला पोलिसांनी बदलापूर येथून बुधवारी रात्री अटक केली. जुन्या कौटुंबिक भांडणातून ही घटना घडल्याचे उघड झाले असून याबाबत पोलीस तपास करीत आहेत.शहरातील देवूनगर येथील मोहम्मद अली कंपाउंड येथे राहणाºया मोह. इर्शाद मो. इद्रीस अन्सारी याची तीन वर्षांची मुलगी आलिया हिला बुधवार रात्री ९ वाजण्याच्या सुमारास अंडे खाण्यास घेऊन जातो, असे सांगून घेऊन गेलेला अब्दुल कलाम अजीज चौधरी हा मुलीला परत घेऊन घरी न आल्याने मुलीच्या वडिलांनी सर्वत्र शोधाशोध सुरू केली. अखेर त्याचा तपास न लागल्याने मो. इर्शाद याने रात्री सव्वा वाजता भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सर्वत्र शोध सुरू केला असता अपहरणकर्त्याच्या मोबाइलचे लोकेशन बदलापूर येथील वालवली गावात दिसून आले. पोलिसांनी सापळा लावला आणि आरोपी अब्दुल कलाम यास तीन वर्षांच्या आलियासह ताब्यात घेतले. अब्दुल कलाम अजीज चौधरी यांस गुरुवारी दुपारी पोलिसांनी भिवंडी कोर्टात हजर केले असता त्यास कोर्टाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव करपे यांनी दिली.आरोपी अब्दुल अजीज चौधरी हा मजुरी करणारा असून तो व्यसनाधीन झाल्याने त्याची पत्नी त्याला सोडून गेली. ती अब्दुल अजीज याचा भाऊ असलेल्या मोहम्मद इर्शाद मो. ईद्रीस अन्सारी या सोबत राहू लागली. आपली पत्नी परत मिळावी,या उद्देशाने आरोपीने मोहम्मद इर्शाद अन्सारी याच्या तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण करून त्या बदल्यात आपल्या पत्नीची मागणी केली, अशी माहिती पोलीस सुत्रांनी दिली आहे .

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी