शहरं
Join us  
Trending Stories
1
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
2
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
3
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
5
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
6
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
7
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
8
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
9
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
10
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
11
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
12
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
13
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
14
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
15
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
16
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
17
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
18
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
19
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
20
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   

२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 15:44 IST

या महिलेच्या पतीचे १ वर्षापूर्वी निधन झाले होते. त्यानंतर दीरासोबत महिलेने लग्न केले होते.

उत्तर प्रदेशच्या बाराबंकी येथे एका महिलेने २ चिमुकल्यांना घेऊन नदीत उडी मारली आहे. ही महिला आधी पूलावर पोहचली. तिथे अंगावरील दागिने आणि मोबाईल एका कपड्यात बांधून बाजूला ठेवला. त्यानंतर मोठ्या मुलाला नदीत फेकले. त्यानंतर ४ वर्षाच्या मुलाला उचलून तिने पुलावरून खाली नदीत उडी घेतली. जवळपास १८ तासांनी या तिघांचे मृतदेह पोलिसांना सापडले आहेत. त्यात ४ वर्षाच्या छोट्या मुलाचा मृतदेह घटनास्थळापासून १० किमी अंतरावर तर मोठा मुलगा आणि आईचा मृतदेह १०० मीटर अंतरावर सापडला आहे. 

बुधवारी संध्याकाळी ४ च्या सुमारास ही घटना घडली. घटनास्थळी पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली. त्यात महिलेने तिच्या सासू-सासरे आणि दीरावर हुंड्यासाठी छळ केल्याचा आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. या महिलेच्या पतीचे १ वर्षापूर्वी निधन झाले होते. त्यानंतर दीरासोबत महिलेने लग्न केले होते. या महिलेने नोटमध्ये लिहिले होते की, माझ्या घरी सासू सासरे गेल्या १५ दिवसांपासून हुंड्याच्या मागणीसाठी रोज वाद घालत आहेत. दागिने आणि २ लाख रुपये दिले नाही तर मुलांना घेऊन घरातून निघून जा अशी धमकी दिली. माझ्या पतीचा मृत्यू झाला होता, त्यानंतर मी दीराशी लग्न केले होते. या तिघांनी मिळून माझ्या पतीचा पैसा हडपला आणि आम्हाला घरातून पळवले असा आरोप तिने केला. 

याच कारणाने मी गोमाता नदीत उडी घेत आहे. माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. आता सासरे बाबूलाल आणि सासू कुंती देवी यांनी मज्जा करावी. मी आणि माझ्या मुलांमुळे घरच्यांना अडचण व्हायची. ही सुसाईड नोट मी माझ्या हाताने लिहून फेसबुकवर टाकत आहे असं तिने नोटमध्ये शेवटी लिहिले आहे. ७ वर्षापूर्वी मिथिलेश कुमार या महिलेचे बाबूलाल यांचा मोठा मुलगा हुकुमसोबत लग्न झाले होते. या दोघांना ६ वर्षीय अभय यादव आणि ४ वर्षीय अंश यादव अशी मुले होती. एक वर्षापूर्वी आजारामुळे पती हुकुम यांचा मृत्यू झाला. ३ महिन्यापूर्वी मिथिलेशने दीर भोलासोबत लग्न केले होते. परंतु १५ दिवसांपासून सासू-सासरे आणि पती भोला मिळून हुंड्यासाठी छळ करत असल्याचं नोटमध्ये उल्लेख आहे. 

दरम्यान, बुधवारी दुपारी ३ वाजता कुणालाही न सांगता सून मिथिलेश दोन मुलांना घेऊन घरातून निघाली. तिचा शोध घेण्याचा बराच प्रयत्न केला परंतु काही कळले नाही. त्यानंतर गुरुवारी घरापासून ८ किमी अंतरावरील गोमाता नदीच्या पुलावरून महिलेने मुलांना घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांकडून कळले असं सासरे बाबूलाल यांनी सांगितले.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी