शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
2
'एनडीएने बिहारची मते ५.५ रुपये प्रतिदिन दराने खरेदी केली', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
3
धक्कादायक खुलासा! डॉक्टर शाहीन निघाली दहशतवादी फंडिंगची मास्टरमाईंड; बिटकॉइन आणि हवालातून कोट्यवधींचा व्यवहार
4
आमदार-खासदारांशी कसं वागावे? शासनानं काढलं परिपत्रक; कर्मचाऱ्यांना दिला ९ कलमी कार्यक्रम
5
'मुलगा गोरा कसा?'; संशयी पतीने क्रौर्याची सीमा ओलांडली! बाळाच्या रंगावरून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला अन्.. 
6
एक-एक घुसखोराला हाकलून लावू..; गृहमंत्री अमित शांहाचा हल्लाबोल
7
कराची शेअर बाजारात तेजी... पाकिस्तानची सर्वात मोठी कंपनी कोणती? रिलायन्सच्या तुलनेत कुठे?
8
Mumbai Crime: ऑफिसमधून बाहेर पडताच कारच्या समोरून आले आणि घातल्या गोळ्या; मुंबईतील घटनेचा व्हिडीओ आला समोर
9
JCB वर बसून काढत होते पदयात्रा, अचानक घडलं असं काही, रस्त्यावर धपकन पडले भाजपाचे नेते 
10
Jara Hatke : जगातील अद्भुत कोपरा, जिथे सूर्य दोन महिने 'सुट्टीवर' जातो; तापमानही जाते शून्याच्या खाली!
11
Sangli: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नवा अध्याय; 'तारा'चा मुक्त संचार सुरू, रेडिओ कॉलरद्वारे ठेवणार लक्ष
12
BMC Election: शरद पवार गट मुंबईत कोणाशी करणार युती, उद्धवसेना की काँग्रेस?
13
Numerology 2026: ६ मूलांकांचे दु:खाचे दिवस सरणार, सुवर्ण काळ येणार; २०२६ला मालामाल-भाग्योदय!
14
उदयपूरमध्ये शाही विवाह सोहळा, ज्युनियर ट्रम्पपासून VVIP पाहुणे येणार; कोण आहे वधू आणि वर?
15
Smriti Mandhana : समझो हो ही गया... स्मृती मंधानाने केली साखरपुड्याची अनोखी घोषणा, रविवारी होणार विवाह
16
किलर स्माईल ते किलर्स स्माईल! माधुरी दीक्षितची सस्पेन्स सीरिज 'या' दिवशी होणार रिलीज
17
एकनाथ शिंदेंकडून दिल्लीत तक्रार पण मंत्री उदय सामंतांनी रवींद्र चव्हाणांचं केलं भरभरून कौतुक
18
धक्कादायक! शाळेच्या छतावरून उडी घेऊन १३ वर्षीय विद्यार्थिनीने आयुष्य संपवले, नेमके कारण काय?
19
असं काय झालं की, लग्नाला फक्त ३ दिवस बाकी असताना नवरदेवाने संपवले आयुष्य; ४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
20
"युट्यूबमधून मी जास्त पैसे कमावते...", फराह खानचा खुलासा; कोरिओग्राफी-दिग्दर्शनाबद्दल म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 15:44 IST

या महिलेच्या पतीचे १ वर्षापूर्वी निधन झाले होते. त्यानंतर दीरासोबत महिलेने लग्न केले होते.

उत्तर प्रदेशच्या बाराबंकी येथे एका महिलेने २ चिमुकल्यांना घेऊन नदीत उडी मारली आहे. ही महिला आधी पूलावर पोहचली. तिथे अंगावरील दागिने आणि मोबाईल एका कपड्यात बांधून बाजूला ठेवला. त्यानंतर मोठ्या मुलाला नदीत फेकले. त्यानंतर ४ वर्षाच्या मुलाला उचलून तिने पुलावरून खाली नदीत उडी घेतली. जवळपास १८ तासांनी या तिघांचे मृतदेह पोलिसांना सापडले आहेत. त्यात ४ वर्षाच्या छोट्या मुलाचा मृतदेह घटनास्थळापासून १० किमी अंतरावर तर मोठा मुलगा आणि आईचा मृतदेह १०० मीटर अंतरावर सापडला आहे. 

बुधवारी संध्याकाळी ४ च्या सुमारास ही घटना घडली. घटनास्थळी पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली. त्यात महिलेने तिच्या सासू-सासरे आणि दीरावर हुंड्यासाठी छळ केल्याचा आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. या महिलेच्या पतीचे १ वर्षापूर्वी निधन झाले होते. त्यानंतर दीरासोबत महिलेने लग्न केले होते. या महिलेने नोटमध्ये लिहिले होते की, माझ्या घरी सासू सासरे गेल्या १५ दिवसांपासून हुंड्याच्या मागणीसाठी रोज वाद घालत आहेत. दागिने आणि २ लाख रुपये दिले नाही तर मुलांना घेऊन घरातून निघून जा अशी धमकी दिली. माझ्या पतीचा मृत्यू झाला होता, त्यानंतर मी दीराशी लग्न केले होते. या तिघांनी मिळून माझ्या पतीचा पैसा हडपला आणि आम्हाला घरातून पळवले असा आरोप तिने केला. 

याच कारणाने मी गोमाता नदीत उडी घेत आहे. माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. आता सासरे बाबूलाल आणि सासू कुंती देवी यांनी मज्जा करावी. मी आणि माझ्या मुलांमुळे घरच्यांना अडचण व्हायची. ही सुसाईड नोट मी माझ्या हाताने लिहून फेसबुकवर टाकत आहे असं तिने नोटमध्ये शेवटी लिहिले आहे. ७ वर्षापूर्वी मिथिलेश कुमार या महिलेचे बाबूलाल यांचा मोठा मुलगा हुकुमसोबत लग्न झाले होते. या दोघांना ६ वर्षीय अभय यादव आणि ४ वर्षीय अंश यादव अशी मुले होती. एक वर्षापूर्वी आजारामुळे पती हुकुम यांचा मृत्यू झाला. ३ महिन्यापूर्वी मिथिलेशने दीर भोलासोबत लग्न केले होते. परंतु १५ दिवसांपासून सासू-सासरे आणि पती भोला मिळून हुंड्यासाठी छळ करत असल्याचं नोटमध्ये उल्लेख आहे. 

दरम्यान, बुधवारी दुपारी ३ वाजता कुणालाही न सांगता सून मिथिलेश दोन मुलांना घेऊन घरातून निघाली. तिचा शोध घेण्याचा बराच प्रयत्न केला परंतु काही कळले नाही. त्यानंतर गुरुवारी घरापासून ८ किमी अंतरावरील गोमाता नदीच्या पुलावरून महिलेने मुलांना घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांकडून कळले असं सासरे बाबूलाल यांनी सांगितले.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी