शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

सोने तस्करीप्रकरणी दोन स्वतंत्र घटनांमध्ये एकूण सात जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2023 06:35 IST

‘डीआरआय’ची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : इंदूर आणि कोलकाता येथे झालेल्या सोन्याच्या तस्करीप्रकरणी केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी मुंबई आणि विरार येथून तीन जणांना अटक केली आहे. याप्रकरणी चार आरोपींना संबंधित राज्यांतून यापूर्वीच अटक केली आहे. ही दोन्ही स्वतंत्र प्रकरणे असून एकूण १४ किलो सोन्याची तस्करी पकडली गेली असून याची किंमत ८ कोटी रुपये इतकी आहे. याप्रकरणी एकूण सात जणांना अटक झाली आहे.

८ जून रोजी छत्तीसगडमधील रायपूर रेल्वेस्थानकातून सोन्याची तस्करी होणार असल्याची माहिती ‘डीआरआय’ अधिकाऱ्यांना मिळाली होती. तेथे छापेमारी केली असता अरविंद व रोहित राजपुरोहित या दोघांकडे २ कोटी २० लाख रुपये किमतीचे ३.६ किलो सोने आढळून आले. त्यांची चौकशी केली असता ते सोने तस्करी कोलकात्ता येथून त्यांच्यापर्यंत आले होते व ते सोने मुंबईत श्रीपाल जैन व आसित मोंडल यांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले. या माहितीच्या आधारे मुंबईत छापेमारी केली असता ४.८ किलो सोने पकडण्यात आले. याची किंमत २ कोटी ७० लाख इतकी आहे.

दुसऱ्या प्रकरणात, विरार येथून इंद्रमणी राम या व्यक्तीलाही सोन्याच्या तस्करीप्रकरणात ‘डीआरआय’नेच अटक केली आहे. कोलकात्यातून ५.६ किलो सोने तस्करीच्या माध्यमातून आले होते. याची किंमत ३ कोटी ४० लाख इतकी होती. इंद्रमणी राम याच्या सूचनेवरून हा सर्व व्यवहार सुरू होता, अशी माहिती कोलकात्यातील डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्या आधारे त्यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :GoldसोनंArrestअटक