शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

गूढ वाढलं! संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित महिलेची ७-८ दिवसांपूर्वी हत्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 15:51 IST

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही धागेदोरे हाती लागू नये म्हणून ही हत्या झाली की अनैतिक संबंधातून हत्या झाली अशी चर्चा सुरू आहे असं दमानिया यांनी सांगितले. 

मुंबई - बीडच्या मस्साजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित एका महिलेची हत्या झाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. या महिलेची ५ दिवसापूर्वी हत्या झाली. घटनास्थळी पोलिसांनी पोस्टमोर्टम केले. शनिवारी बीड पोलीस कळंबमध्ये गेल्यानंतर स्थानिक पोलिसांना ही घटना कळली. अनैतिक संबंध की पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने ही हत्या झाली का असा संशय आता व्यक्त केला जात आहे. 

कळंबच्या द्वारकानगर येथील एका घरात या महिलेची हत्या झाली. या घराला बाहेरून कुलूप लावण्यात आले होते. पोलिसांकडून जागेवरच पोस्टमोर्टम करून लगेचच अंत्यविधी उरकण्यात आला असं दमानिया यांनी म्हटलं आहे. याबाबत अंजली दमानिया यांनी ट्विट करत म्हटलंय की, गुड संपता संपत नाही आणि हत्या संपता संपत नाहीत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात चौकशी झालेल्या महिलेची कळंब शहरात हत्या झाली आहे. संतोष देशमुखांवर अनैतिक आरोप करण्यासाठी तयार आसलेली कळंब शहरातील द्वारका नगरमध्ये राहत असलेल्या महिलेची हत्या झाल्याचं कळतंय. या महिलेची ७ ते ८ दिवसापूर्वी हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. कुठल्या कारणाने हत्या झाली अन बीड पोलिसांना ही बातमी कळाली अन ते घटनास्थळी पोहचल्यावर नंतरच तेथील रहिवासी व स्थानिक पोलिसांना घटना कळली. अजून याबाबत अधिकृत माहिती समोर आली नसून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही धागेदोरे हाती लागू नये म्हणून ही हत्या झाली की अनैतिक संबंधातून हत्या झाली अशी चर्चा सुरू आहे असं त्यांनी सांगितले. 

त्याशिवाय या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करीत आहेत. असं असलं तरी शहर आणि परिसरात या घटनेने दहशत पसरली आहे.शहरातील द्वारका नगरीत राहणाऱ्या लोकांना २ दिवसांपासून उग्र वास येत होता. ज्या घरातून वास येत होता त्या घराला बाहेरून कुलूप लावलेले होते. दरवाजा तोडून बीड पोलीस व स्थानिक पोलिसांनी आत प्रवेश केल्यानंतर संबंधित महिलेचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह पोलिसांना आढळला व मृतदेह सडलेला असल्यामुळे जागेवरच मृतदेहाचे पोस्टमोर्टम केले. अंत्यविधीही उरकला. ही महिला अनेक पुरुषांना अडकवण्याचे काम करायची आणि त्यासाठी मनीषा आकुसकर आडस, मनीषा बिडवे कळंब, मनीषा मनोज बियाणी कळंब, मनीषा राम उपाडे अंबाजोगाई, मनीषा संजय गोंदवले रत्नागिरी अशा नावांचा वापर करायची असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, द्वारकानगरीत मनीषा बिडवे नावाच्या महिलेचा खून झालेला आहे अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही तात्काळ तिथे पोहचलो. तेव्हा घरच्या दरवाजाला कुलूप होते. आम्ही मागील दरवाजाने आतमध्ये गेल्यानंतर तिथे महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. या महिलेचा पोस्टमोर्टम रिपोर्ट येणे बाकी आहे. ही महिला संतोष देशमुख प्रकरणाशी संबंधित आहे याबाबत खात्रीशीर माहिती नाही. पोलीस तपास सुरू आहे असं पोलीस निरीक्षक रवी सानप यांनी सांगितले. 

टॅग्स :Santosh Deshmukhसंतोष देशमुख हत्या प्रकरणbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणanjali damaniaअंजली दमानिया