शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

बेपत्ता युवक, एक कहाणी अन् २ कुटुंब अन् सगळाच गोंधळ; सत्य कळताच पोलिसही हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 08:32 IST

त्याची ही कहाणी खरी मानून देहारादूनच्या पटेलनगरमध्ये राहणाऱ्या आशा देवी शर्मा यांनी त्याला त्यांचा गायब झालेला मुलगा म्हणून घरी आश्रयास ठेवले होते

गाझियाबादच्या शहीद नगर येथून ३० वर्षापूर्वी गायब झालेला युवक राजू पुन्हा त्याच्या घरी परतला आहे. राजू गायब होण्यामागचं कारण ऐकून अनेकजण हैराण झालेत. सध्या या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. ३० वर्षापूर्वी शाळेतून परतताना काही लोकांनी माझं अपहरण केल्याचा दावा त्याने पोलिसांकडे केला आहे. पोलिसांनी त्याच्या कहाणीवर विश्वास ठेवून त्याला एका कुटुंबाच्या स्वाधीन केले मात्र आता पोलिसांसमोर वेगळेच सत्य आले आहे. या युवकाने देहारादून येथेही असाच प्रकार केला होता.

तपासात राजू हीच कहाणी बनवून देहारादून येथील एका कुटुंबात मोनू म्हणून राहत होता. जुलैमध्ये तो देहारादून पोलिसांकडे पोहचला आणि त्याने त्याच्या अपहरणाची कहाणी सांगितली. तो देहारादूनचा राहणारा होता, लहानपणी त्याचे अपहरण करून काही लोकांनी राजस्थानला नेले होते. त्याठिकाणी मजूर म्हणून काम करायला लावले. त्याची ही कहाणी खरी मानून देहारादूनच्या पटेलनगरमध्ये राहणाऱ्या आशा देवी शर्मा यांनी त्याला त्यांचा गायब झालेला मुलगा म्हणून घरी आश्रयास ठेवले होते. 

देहारादूनहून काही महिन्यापूर्वी दिल्लीत आला

आशादेवीचे पती कपिलदेव शर्मा यांनी सांगितले की, घरी परतल्यापासून मोनू कायम त्यांच्या मुलांशी भांडण करायचा. त्यांना घरातून बाहेर जायला सांगायचा. मला नेहमी त्याच्या दाव्यावर संशय यायचा परंतु पत्नीमुळे मी त्याला घरात राहू दिले होते असं त्यांनी सांगितले. इथं काही महिने शर्मा कुटुंबासोबत राहिल्यानंतर मोनू दिल्लीत काम करण्यासाठी जातो सांगून घरातून गेला. त्यानंतर गाजियाबादला इथं पोलिसांना येऊन तीच कहाणी ऐकवत तुलाराम यांच्या घरी राहू लागला. देहारादून पोलिसांकडून मिळालेल्या सूचनेनंतर गाझियाबाद पोलिसांनी राजूला तपासासाठी ताब्यात घेतले.

सध्या या प्रकरणाचा देहारादून आणि गाझियाबाद पोलीस संयुक्त तपास करत आहे. राजू साहिबाबादचा ज्या कुटुंबात राहत होता, त्यातील तुलाराम यांनी सांगितले की, गाझियाबाद पोलिसांनी तपासासाठी राजूला सोबत नेले आहे. पोलीस तपासानंतर खरं काय ते समोर येईल त्यानंतर कुटुंब म्हणून निर्णय घेऊ. आता २ दिवसच तो आमच्यासोबत राहिला आहे. या २ दिवसांत त्याची वागणूक विचित्र होती. दिवसभर तो घरी ठीक राहायचा आणि रात्री बाहेर जायचा हट्ट धरायचा. 

दरम्यान, राजूने त्याच्या अपहरणाची आणि सुटकेची अतिशय भावनिक कहाणी सांगितली होती. त्याला जैसलमेरमध्ये ठेवण्यात आले होते, जिथे त्याला बकऱ्या पाळायचं काम दिले होते. बकरी घेण्यासाठी एकदा काही ड्रायव्हर आले होते. तेव्हा त्याने त्याच्या पायातील साखळी पाहिली, आणि त्याला कारण विचारले तेव्हा त्याच्या अपहरणाची कहाणी सांगितली. यानंतर ट्रकचालकांनी राजूला दिल्लीला आणले. तिथून राजूने खोडा पोलीस ठाणे गाठले आणि ही कहाणी सांगितली. पोलिसांना ३० वर्षांपूर्वीच्या नोंदी तपासल्या त्यावरून तुलारामचा मुलगा बेपत्ता झाल्याचे उघड झाले आणि पोलिसांनी राजूल त्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले पण आता कहाणीत ट्विस्ट आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी