शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
3
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
4
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
5
देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
6
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
7
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
8
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
9
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
10
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
11
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
12
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
13
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
14
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
15
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
16
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
17
पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
18
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
19
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
20
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता युवक, एक कहाणी अन् २ कुटुंब अन् सगळाच गोंधळ; सत्य कळताच पोलिसही हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 08:32 IST

त्याची ही कहाणी खरी मानून देहारादूनच्या पटेलनगरमध्ये राहणाऱ्या आशा देवी शर्मा यांनी त्याला त्यांचा गायब झालेला मुलगा म्हणून घरी आश्रयास ठेवले होते

गाझियाबादच्या शहीद नगर येथून ३० वर्षापूर्वी गायब झालेला युवक राजू पुन्हा त्याच्या घरी परतला आहे. राजू गायब होण्यामागचं कारण ऐकून अनेकजण हैराण झालेत. सध्या या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. ३० वर्षापूर्वी शाळेतून परतताना काही लोकांनी माझं अपहरण केल्याचा दावा त्याने पोलिसांकडे केला आहे. पोलिसांनी त्याच्या कहाणीवर विश्वास ठेवून त्याला एका कुटुंबाच्या स्वाधीन केले मात्र आता पोलिसांसमोर वेगळेच सत्य आले आहे. या युवकाने देहारादून येथेही असाच प्रकार केला होता.

तपासात राजू हीच कहाणी बनवून देहारादून येथील एका कुटुंबात मोनू म्हणून राहत होता. जुलैमध्ये तो देहारादून पोलिसांकडे पोहचला आणि त्याने त्याच्या अपहरणाची कहाणी सांगितली. तो देहारादूनचा राहणारा होता, लहानपणी त्याचे अपहरण करून काही लोकांनी राजस्थानला नेले होते. त्याठिकाणी मजूर म्हणून काम करायला लावले. त्याची ही कहाणी खरी मानून देहारादूनच्या पटेलनगरमध्ये राहणाऱ्या आशा देवी शर्मा यांनी त्याला त्यांचा गायब झालेला मुलगा म्हणून घरी आश्रयास ठेवले होते. 

देहारादूनहून काही महिन्यापूर्वी दिल्लीत आला

आशादेवीचे पती कपिलदेव शर्मा यांनी सांगितले की, घरी परतल्यापासून मोनू कायम त्यांच्या मुलांशी भांडण करायचा. त्यांना घरातून बाहेर जायला सांगायचा. मला नेहमी त्याच्या दाव्यावर संशय यायचा परंतु पत्नीमुळे मी त्याला घरात राहू दिले होते असं त्यांनी सांगितले. इथं काही महिने शर्मा कुटुंबासोबत राहिल्यानंतर मोनू दिल्लीत काम करण्यासाठी जातो सांगून घरातून गेला. त्यानंतर गाजियाबादला इथं पोलिसांना येऊन तीच कहाणी ऐकवत तुलाराम यांच्या घरी राहू लागला. देहारादून पोलिसांकडून मिळालेल्या सूचनेनंतर गाझियाबाद पोलिसांनी राजूला तपासासाठी ताब्यात घेतले.

सध्या या प्रकरणाचा देहारादून आणि गाझियाबाद पोलीस संयुक्त तपास करत आहे. राजू साहिबाबादचा ज्या कुटुंबात राहत होता, त्यातील तुलाराम यांनी सांगितले की, गाझियाबाद पोलिसांनी तपासासाठी राजूला सोबत नेले आहे. पोलीस तपासानंतर खरं काय ते समोर येईल त्यानंतर कुटुंब म्हणून निर्णय घेऊ. आता २ दिवसच तो आमच्यासोबत राहिला आहे. या २ दिवसांत त्याची वागणूक विचित्र होती. दिवसभर तो घरी ठीक राहायचा आणि रात्री बाहेर जायचा हट्ट धरायचा. 

दरम्यान, राजूने त्याच्या अपहरणाची आणि सुटकेची अतिशय भावनिक कहाणी सांगितली होती. त्याला जैसलमेरमध्ये ठेवण्यात आले होते, जिथे त्याला बकऱ्या पाळायचं काम दिले होते. बकरी घेण्यासाठी एकदा काही ड्रायव्हर आले होते. तेव्हा त्याने त्याच्या पायातील साखळी पाहिली, आणि त्याला कारण विचारले तेव्हा त्याच्या अपहरणाची कहाणी सांगितली. यानंतर ट्रकचालकांनी राजूला दिल्लीला आणले. तिथून राजूने खोडा पोलीस ठाणे गाठले आणि ही कहाणी सांगितली. पोलिसांना ३० वर्षांपूर्वीच्या नोंदी तपासल्या त्यावरून तुलारामचा मुलगा बेपत्ता झाल्याचे उघड झाले आणि पोलिसांनी राजूल त्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले पण आता कहाणीत ट्विस्ट आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी