शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

व्यापाऱ्याच्या हत्येप्रकरणी मजुराला अटक, दारू सोडायला सांगितल्याने केली हत्या 

By सूर्यकांत वाघमारे | Updated: August 20, 2022 00:10 IST

नवी मुंबई : मजुराला असलेल्या दारूच्या सवईवरून त्याला सतत बोलून दारू सोडण्याचा तगादा लावणे व्यापाऱ्याला जीवावर बेतले आहे. १४ ...

नवी मुंबई : मजुराला असलेल्या दारूच्या सवईवरून त्याला सतत बोलून दारू सोडण्याचा तगादा लावणे व्यापाऱ्याला जीवावर बेतले आहे. १४ ऑगस्टला एपीएमसी भाजी मार्केटमध्ये व्यापाऱ्याचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी घटनेनंतर बेपत्ता असलेल्या मजुराला अटक केल्यानंतरच या हत्येचे कारण समोर आले. 

एपीएमसीच्या भाजी मार्केटमध्ये भाड्याच्या गाळ्यावर व्यापार करणाऱ्या रमायन ललसा उर्फ गुरुदेव (४५) या व्यापाऱ्याच्या हत्येची घटना रविवारी उघडकीस आली होती. गाळ्याच्या वरच्या मजल्यावरील खोलीचा दरवाजा बंद असून व्यापाऱ्यांचा संपर्क होत नसल्याने दरवाजा तोडला असता आतमध्ये मृत्यदेह आढळून आला होता. याप्रकरणी एपीएमसी पोलिसांकडून अधिक चौकशी सुरू असताना त्याच्याकडे मजुरी करणारा अरुणकुमार भारती (३२) हा बेपत्ता असल्याचे आढळून आले. यामुळे त्याच्या शोधासाठी सहायक आयुक्त डी. डी. टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक माणिक नलावडे यांनी सहायक निरीक्षक वसीम शेख, निलेश शेवाळे आदींचे पथक तयार केले. तपासादरम्यान मयत रमायन यांचे दोन मोबाईल देखील चोरीला गेले असल्याचे समोर आले. त्याद्वारे तपास पथकाने चार दिवसांत उत्तर प्रदेशसह नवी मुंबईत शोध घेऊन गुरुवारी रात्री अटक केली.

अधिक चौकशीत त्याने मयत रमायन हे दारू सोडण्यावरून सतत लोकांमध्ये बोलत असल्याच्या रागातून हत्या केल्याची कबुली दिल्याचे उपायुक्त विवेक पानसरे यांनी सांगितले. अरुणकुमार याला दारूचे व्यसन असल्याने रमायन हे त्याला सतत दारू सोडण्यासाठी बोलत असत. परंतु लोकांसमोर त्यांचे बोलणे अरुणकुमार याला खटकत असे. यारून शनिवारी रात्री दोघेच असताना त्यांच्यात वाद झाला. त्यामध्ये अरुणकुमार याने पेव्हरब्लॉक डोक्यात मारून रमायन यांची हत्या करून पळ काढला होता.      

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNavi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिस