शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

मणिपूरमध्ये फुटीरतावाद्यांनी गावाला घेरले, गोळीबारात ९ लोकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2023 12:23 IST

सशस्त्र फुटीरतावाद्यांनी इम्फाळचा पूर्व जिल्हा आणि कांगपोकी जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या खमेनलोक भागात गावकऱ्यांवर भ्याड हल्ला केला आहे.

मणिपूरमध्ये गेल्या महिनाभरापासून सुरु असलेला हिंसाचार आजही सुरुच आहे. सरकार आणि नागरिकांना तणाव निवळला असे वाटत नाही तोच गोळीबाराच्या घटना घडत आहेत. बुधवारी रात्री एका गावात मोठ्या प्रमाणावर गोळीबार झाला आहे. यामध्ये नऊ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर १० अन्य नागरिक जखमी झाले आहेत.

सशस्त्र फुटीरतावाद्यांनी इम्फाळचा पूर्व जिल्हा आणि कांगपोकी जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या खमेनलोक भागात गावकऱ्यांवर भ्याड हल्ला केला आहे. पहाटे १ वाजता हा हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १० जण जखमी झाले आहेत. या सर्वांना इम्फाळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा आदिवासी बहुल भाग आहे. 

धक्कादायक बाब म्हणजे सोमवारी देखील या भागात गोळीबार झाला होता. यामध्ये नऊ लोक जखमी झाले होते. फुटीरतावादी आणि ग्रामीणांमध्ये सोमवारी रात्री उशिरा गोळीबार झाला होता. दोन्ही बाजुचे नऊजण जखमी झाले होते. मणिपूरमध्ये गेल्या एका महिन्यापासून सुरू असलेल्या हिंसाचारात किमान 100 लोकांचा मृत्यू झाला असून 310 जण जखमी झाले आहेत. राज्यातील 16 पैकी 11 जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू आहे. त्याचबरोबर संपूर्ण राज्यात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार