शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

विहिरीतून काढले तब्बल ९ मृतदेह; एकाच कुटुंबातील ६ जणांचा समावेश, परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2020 08:55 IST

एका कुटुंबातील ६ सदस्य, त्यांचा एक मित्र आणि अन्य २ व्यक्ती असे मिळून एकूण ९ मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले.

वारंगल – तेलंगणाच्या एका विहिरीत ९ लोकांचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ माजली आहे. यातील ६ मृतदेह एकाच कुटुंबातील असल्याचं समोर येत आहे. गुरुवारी विहिरीतून ४ लोकांचा मृतदेह सापडल्यानंतर शुक्रवारी पुन्हा ५ जणांचा मृतदेह आढळून आला आहे. प्लास्टिक थैली बनवण्याचं काम करणाऱ्या ४८ वर्षीय व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबातील ३ सदस्यांचे मृतदेह गोरेकुंटा गावातील विहिरीत सापडले.

यानंतर पोलिसांनी आणखी चौकशी केल्यानंतर अन्य मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. राज्यमंत्री इराबेल्ली दयाकर राव यांनी घटनास्थळी भेट देत शोक व्यक्त केला. ज्या ठिकाणी हे मृतदेह ठेवण्यात आले आहेत त्या रुग्णालयालाही मंत्र्यांनी भेट दिली. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली जाईल. प्रकरणाचा छडा लवकरच लावला जाईल असं ते म्हणाले.

वारंगलचे पोलीस आयुक्त वी रविंद्र यांनी सांगितले की, एका कुटुंबातील ६ सदस्य, त्यांचा एक मित्र आणि अन्य २ व्यक्ती असे मिळून एकूण ९ मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. प्रथमदर्शनी हे प्रकरण आत्महत्येचं वाटत असल्याचं त्यांनी सांगितले. मृतदेहांवर कोणत्याही प्रकारचे निशाण आढळलं नाही. पोस्टमार्टमनंतर मृत्यूचं खरं कारण समजू शकेल. घरच्या प्रमुख व्यक्तीने एका मित्राला घरी बोलवलं होतं. थैली बनवण्याचं काम जास्त आल्याचं मित्राला सांगण्यात आलं होतं.

सध्या पोलिसांकडून या प्रकरणी आत्महत्येचा गुन्हा नोंद केला आहे. प्रकरणाची चौकशी पुढे सुरु राहील त्यामुळे यात बदल होण्याचीही शक्यता आहे. ४८ वर्षीय व्यक्ती २० वर्षापूर्वी पश्चिम बंगालहून परत आला होता. त्यानंतर तो येथेच वास्तव्य करत होता. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करण्याचा प्रयत्न करत आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसTelanganaतेलंगणा