शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

८४ कोटींची ‘केबीसी’ची मालमत्ता ईडीकडून जप्त; राज्यभरात २०० कोटींचा केला अपहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2024 12:50 IST

कंपनीशी निगडित ११ ठिकाणी छापेमारी

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मल्टिलेव्हल मार्केटिंगची योजना सादर करत राज्यभरातील लाखो गुंतवणूकदारांकडून २०० कोटींपेक्षा जास्त पैसे गोळा करत त्याचा अपहार करणाऱ्या केबीसी मल्टिट्रेड या कंपनीला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दणका देत कंपनीची ८४ कोटी २४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. जप्त केलेल्या मालमत्तेत ठाणे, पाली, नाशिक व सिंधुदुर्ग येथील चल व अचल मालमत्तेचा समावेश आहे. 

प्राप्त माहितीनुसार, कंपनीने क्लब व रिसॉर्टसाठी गुंतवणुकीच्या आकर्षक योजना सादर करत त्यावर भरीव परतावा देणे तसेच या योजनांचा प्रसार करत नवा गुंतवणूकदार आणल्यास त्यावर भरघोस कमिशन देणे आदी कार्यपद्धतीचा अवलंब करत कोट्यवधींची माया गोळा केली होती. मात्र, कालांतराने लोकांना फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सर्वप्रथम परभणीत गुन्हा दाखल झाला. त्यानंतर अनेक जिल्ह्यांत कंपनीचे प्रवर्तक बापू चव्हाण, भाऊसाहेब चव्हाण आणि आरती भाऊसाहेब चव्हाण यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाले. मात्र, मनी लाँड्रिंग झाल्यामुळे तपास ईडीने सुरू केला होता.

कंपनीशी निगडित ११ ठिकाणी छापेमारी

  • ईडीच्या अधिकाऱ्यांनी ८ व ११ मार्च रोजी कंपनीशी निगडित ११ ठिकाणी छापेमारी केली होती.
  • याच छापेमारी दरम्यान ११ मार्च रोजी संजय पंचारिया नावाच्या व्यक्तीच्या नावे आनंद नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित या पतसंस्थेत असलेल्या लॉकरमध्ये असलेली ६२ कोटी रुपये मूल्यांची २० मालमत्तांची कागदपत्रे, १६ कोटी ६० लाख रुपयांची रक्कम, डिमॅट खात्यात असलेले ४४ लाख ६१ हजार रुपये, पोस्ट बचत योजनेतील ५ लाख ५६ हजार रुपये, ३० लाख ७५ हजार रुपये मूल्याचे सोन्याचे व हिऱ्याचे दागिने आदी मालमत्ता जप्त केली होती.
  • कंपनीच्या प्रवर्तकांनी अपहार केलेल्या पैशांतून व्यक्तिगत मालमत्ता खरेदी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी