शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

तब्बल ३६ वर्षे दुसऱ्याच्या नावाने नोकरी, येत्या ३१ डिसेंबरला होणार निवृत्त; मात्र त्यापूर्वीच झाला भांडाफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 11:02 IST

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशमधील गोरखपूरमधून सरकारी खात्यामधील भ्रष्टाचाराचं एक धक्कादायक उदाहरण समोर आलं आहे. गोरखपूरमध्ये ३६ वर्षांपासून बनावट नावाने नोकरी करणारा एक माणूस आता ३१ डिसेंबर रोजी निवृत्त होणार आहे.

लखनौ - उत्तर प्रदेशमधील गोरखपूरमधून सरकारी खात्यामधील भ्रष्टाचाराचं एक धक्कादायक उदाहरण समोर आलं आहे. गोरखपूरमध्ये ३६ वर्षांपासून बनावट नावाने नोकरी करणारा एक माणूस आता ३१ डिसेंबर रोजी निवृत्त होणार आहे. दरम्यान, या प्रकरणात गोरखपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बनावट नावाने नोकरी करणाऱ्या रवी प्रकाश चतुर्वेदी यांच्याविरोधात मॅजिस्ट्रेट तपासानंतर ६ डिसेंबर रोजी सरकारला रिपोर्ट पाठवला होता. मात्र आतापर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार गोरखपूरमधील समाजकल्याण विभागामध्ये तैनात असलेला आरोपी रवी प्रकाश चतुर्वेदी याने पदावर ३६ वर्षे नोकरी केली आहे. तसेच आता तो याच महिन्यामध्ये निवृत्त होणार आहे. रवी प्रकाश चतुर्वेदी ज्या दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने नोकरी करत आहे. ती व्यक्ती त्याच्याच गावातील शेजारी आहे. तसेच त्याचे नाव हे रवी प्रकाश मिश्रा आहे.

याबाबतची तक्रार रवी प्रकाश मिश्रा यांनी दिली होती. त्यांच्या तक्रारीनुसार त्यांच्या नावावर रवी प्रकाश चतुर्वेदी नोकरी करत आहेत. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ मॅजिस्ट्रियल टीम स्थापित करून तपासाचे आदेश दिले होते. या तपासामध्ये ४ फेब्रुवारी १९८५ रोजी रवि प्रकाश मिश्रा यांच्या नावावर नियुक्ती पत्र जारी झाले होते. तेव्हापासून मिश्रा यांच्या नावावर  रवी प्रकाश चतुर्वेदी नोकरी करत आहे. या प्रकरणी जिल्हा समाज कल्याण अधिकारी वशिष्ठ नारायण सिंह यांनी सांगितले की, जिल्हाधिकाऱ्यांनी मॅजिस्ट्रियल तपास करवून ६ डिसेंबर रोजी रिपोर्ट सरकारला पाठवला आहे.

त्यानंतर आतापर्यंत त्यावर काहीही कारवाई झालेली नाही. आता ३६ वर्षांच्या नोकरीनंतर रवी प्रकाश मिश्रा नावाने नोकरी करणारा रवी प्रकाश चतुर्वेदी हा ३१ डिसेंबर रोजी निवृत्त होणार आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या शहरातील जिल्हाधिकाऱ्यांच्या रिपोर्टकडे सरकारने गांभीर्याने का पाहिले नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशGovernmentसरकारjobनोकरी