शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बनावट दस्तावेजाच्याआधारे जमिनीचा व्यवहार करून घातला ३० कोटींचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 20:38 IST

दोघांवर गुन्हा दाखल

ठळक मुद्देओशिवरा येथील जमिनीचे बनावट दस्तावेज बनवून तब्बल ३० कोटींचा गंडा घातल्याचे माहिती उघड होत आहे.आर्थिक गैरव्यवहार असल्याने हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती अंबोली पोलिसांनी दिली.

मुंबई - बनावट दस्तावेज तयार करून त्याद्वारे जमिनीचा व्यवहार करून तब्बल ३० कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या विकासक आणि त्याचा भागीदार अशा दोघांवर अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, आर्थिक गैरव्यवहार असल्याने हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती अंबोली पोलिसांनी दिली.फिर्यादी बिपीन तलाक्षी मकडा, राहणारे शंकर मठ्ठम रोड ,पलई हाऊस माटुंगा, मुंबई बिपिनच्या वडिलांची मालकीची दलिया इंडस्ट्रियल इस्टेट नावाची कंपनी सुरु होती. मात्र तलाक्षी मकडा यांच्या निधनाने वडिलोपार्जित मालमत्ता हि बिपीन याच्या मालकीची झाली. मात्र  मकडा चालवीत असलेली कंपनीत सात भागीदार होते. त्यात गुन्हा दाखल झालेल्या विकासक हिरजी केनियाचा समावेश आहे. फिर्यादीच्या वडिलांच्या सुरु असलेल्या कंपनीच्या माध्यमातून विविध ठिकाणी इमारती बांधून त्याच्या सदनिका विकण्याचा व्यवसाय सुरु होता. १९७२ वर्षात हिरजी यांनी कंपनीच्या नावे ओशिवरा परिसरात सव्वाचार चौरस मीटरचा जमिनीचा काही भाग खरेदी केला होता.

कंपनीच्या इतर भागीदार हे त्यांच्या कामात व्यस्त असल्याने जमिनीच्या व्यवहाराची आणि देखभालीची जबाबदारी हि हिरजी केनिया यांच्यावर सोपविण्यात आली होती. त्यासाठी कंपनीकडून हिरजी याना पॉवर ऑफ अ‍ॅटॉर्नी देण्यात आली होती. विविध जमिनीच्या रस्त्यासाठी भूखंड राखीव करणे, प्लॉट पालिकेकडून हस्तांतरण करणे, जमिनीचा मिळणार टीडीआर मिळवणे आदी कामे सोपविण्यात आली होती. मागील वर्षी कंपनीच्या मालकीचा प्लॉट हा बिल्डर असलेल्या मुकेश मेहता यांच्या नावावर असल्याचे निष्पन्न झाले. त्या जमिनीबाबत शहानिशा केली असता दस्तावेज तपासले असता मेहतांकडे असलेल्या करारावर हिरजी आणि जितेंद्र मकडा या दोन भागीदारांच्या नावाचा उल्लेख होता. कंपनीची जागा असतानाही अन्य कंपनीच्या भागीदारी संमतीने घेतली.

ओशिवरा येथील जमिनीचे बनावट दस्तावेज बनवून तब्बल ३० कोटींचा गंडा घातल्याचे माहिती उघड होत आहे. २००८ साली खरेदी आणि जमीन विक्रीचे दस्तावेज तयार करण्यात आलेले होते. मात्र, ते १९७९  स्टॅम्प ड्युटी न भरता शासनाची फसवणूक केल्याचे समोर येताच बिपीन मकडा यांनी अंबोली पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. तक्रारीची शहानिशा केल्यांनतर अंबोली पोलीस ठाण्यात मुकेश मेहता आणि हिरजी केनिया या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या दोघांनी बनावट कंपनीचे दस्तावेज बनवून शासनाची ३० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल असून त्याचा अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. हिरजी आणि मुकेश यांचा लवकरच जबाब नोंदवून त्यांच्यावर फसवणूक प्रकरणी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :fraudधोकेबाजीPoliceपोलिसEconomic Offence Wingआर्थिक गुन्हे शाखाMumbaiमुंबईAndheriअंधेरी