शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

शिक्षण थांबविल्याने ३ बहिणींनी सोडलं घर; गुडगावमधून मुलींना घेतलं ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 07:49 IST

तळोजातून एकाच वेळी पाच अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची नोंद झाल्याने पोलिसांनी गांभीर्याने घेतले होते

नवी मुंबई : शिक्षणाची आवड असूनही घरचे शिकू देत नसल्याने तीन अल्पवयीन बहिणींनी व शेजारी राहणाऱ्या दोन मुलींना शिकण्यात रस नसल्याने घर सोडले. या पाचही मुलींना गुन्हे शाखेने गुंडगाव येथून सुखरूपणे नवी मुंबईत आणले. या मुलींना महिला व बालकल्याण समितीच्या ताब्यात दिले असून पुढील तपास सुरू असल्याचे तपासी पथकाने सांगितले. 

तळोजातून एकाच वेळी पाच अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची नोंद झाल्याने पोलिसांनी गांभीर्याने घेतले होते. त्यामुळे अपहरणाचा गुन्हा दाखल होताच गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे, सहायक निरीक्षक नीलम पवार, यांच्यासह पथकाने सीसीटीव्हीच्या आधारे मुलींचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्या मुली वांद्रे येथे गेल्याचे दिसून आले. रेल्वे प्रवाशांच्या यादी तपासली असता त्या गुडगावला असल्याचे समजले. 

७ महिन्यांपासून त्यांची सुरू हाेती तयारी

यातील जुहू (१४, बदललेले नाव) हिला सात बहिणी असल्याने घरच्यांनी त्यांचे शिक्षण थांबवले होते. परंतु, त्यांना शिक्षणाची आवड असल्याने एक महिन्यापासून तमन्नाने सात व पाच वर्षाच्या बहिणीसोबत पळून जायची तयारी चालवली होती. त्यातच शेजारी राहणाऱ्या रिया (१६ बदललेले नाव) व प्रियंका (१४) यांना शिक्षणाची आवड नसल्याने व घरचे वातावरण चांगले नसल्याने त्यादेखील त्यांच्यासोबत पळून जायला तयार झाल्या होत्या. त्यानुसार ३ फेब्रुवारीला पाचही मुलींनी घर सोडून थेट गुडगाव गाठले होते.

टॅग्स :Policeपोलिस