शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

भयंकर! विषारी दारूने घेतला 24 जणांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ग्रामस्थांवर कोसळला दु:खाचा डोंगर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 12:14 IST

24 people have died : गेल्या दोन दिवसांत विषारी दारूने अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत.

नवी दिल्ली - बिहारच्या गोपाळगंज आणि पश्चिमी चंपारण जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांत विषारी दारूने अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. विषारी दारूने ग्रामस्थांचा बळी घेतला आहे. तसेच मृतांचा आकडा देखील सातत्याने वाढत आहे. गुरुवारी चंपारणच्या बेतिया गावामध्ये आठ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर गोपाळगंजमध्ये 16 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये बिहारमध्ये दारू प्यायल्याने मृत्यू झाल्याची ही तिसरी घटना आहे. धक्कादायक बाब म्हणजे अनेक लोकांची यामुळे दृष्टी गेली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दारू प्यायल्यानंतर अनेकांची प्रकृती बिघडली, काहींचा उपचारादरम्यान मृत्यू होत आहे. पोलीस अधिकारी आनंद कुमार यांनी गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यातील मुहम्मदपूर गावात काही लोकांचा रहस्यमयरित्या मृत्यू झाला आहे. जोपर्यंत त्यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट येत नाही तोपर्यंत मृत्यू मागचं नेमकं कारण समजणार नाही. तसेच तीन टीम याचा तपास करत असल्याचं म्हटलं आहे. बिहारमधील बेतिया गावातील आठ जणांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. ऐन दिवाळीत घडलेल्या या घटनेने ग्रामस्थांवर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे. आठ जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

ऐन दिवाळीत अघटीत घडलं! 8 जणांचा संशयास्पद मृत्यू; नातेवाईकांचा गंभीर आरोप

8 जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तसेच ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृतांच्या काही नातेवाईकांनी विषारी दारू प्यायल्याने या आठ जणांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या परिसरात मोठ्या प्रमाणात दारू विक्री होती. बेतिया येथे काही जणांनी मोठ्या प्रमाणात दारूचे सेवन केले. त्यानंतर अनेकांची प्रकृती अचानक बिघडू लागली आणि यातच 8 जणांचा मृत्यू झाला. अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचं माहिती समोर येत आहे. त्यामुळे मृतकांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

नौतन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दक्षिणेकडील तेलहुआ गावात ही घटना घडली. मृतकांमधील सर्व जण हे वॉर्ड क्रमांक 2, 3 आणि 4 मधील रहिवासी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी गावातील या सर्वांनी दारूचे सेवन केले आणि त्यानंतर रात्री उशीरा सर्वांची तब्येत खालावण्यास सुरुवात झाली. त्रास होत असलेल्या लोकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला. मृतकांची नावे समोर आली असून यामध्ये बच्चा यादव, महाराज यादव, हनुमंत सिंह, मुकेश पासवान, जवाहर सहनी, उमा साह, रमेश सहनी आणि राम प्रकाश यांचा समावेश आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :BiharबिहारDeathमृत्यू