शहरं
Join us  
Trending Stories
1
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
2
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
3
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
4
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
5
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
6
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
7
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
8
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
9
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
10
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
11
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
12
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
13
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
14
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
15
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
16
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
17
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
18
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
19
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
20
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!

भयंकर! विषारी दारूने घेतला 24 जणांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ग्रामस्थांवर कोसळला दु:खाचा डोंगर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 12:14 IST

24 people have died : गेल्या दोन दिवसांत विषारी दारूने अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत.

नवी दिल्ली - बिहारच्या गोपाळगंज आणि पश्चिमी चंपारण जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांत विषारी दारूने अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. विषारी दारूने ग्रामस्थांचा बळी घेतला आहे. तसेच मृतांचा आकडा देखील सातत्याने वाढत आहे. गुरुवारी चंपारणच्या बेतिया गावामध्ये आठ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर गोपाळगंजमध्ये 16 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये बिहारमध्ये दारू प्यायल्याने मृत्यू झाल्याची ही तिसरी घटना आहे. धक्कादायक बाब म्हणजे अनेक लोकांची यामुळे दृष्टी गेली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दारू प्यायल्यानंतर अनेकांची प्रकृती बिघडली, काहींचा उपचारादरम्यान मृत्यू होत आहे. पोलीस अधिकारी आनंद कुमार यांनी गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यातील मुहम्मदपूर गावात काही लोकांचा रहस्यमयरित्या मृत्यू झाला आहे. जोपर्यंत त्यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट येत नाही तोपर्यंत मृत्यू मागचं नेमकं कारण समजणार नाही. तसेच तीन टीम याचा तपास करत असल्याचं म्हटलं आहे. बिहारमधील बेतिया गावातील आठ जणांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. ऐन दिवाळीत घडलेल्या या घटनेने ग्रामस्थांवर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे. आठ जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

ऐन दिवाळीत अघटीत घडलं! 8 जणांचा संशयास्पद मृत्यू; नातेवाईकांचा गंभीर आरोप

8 जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तसेच ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृतांच्या काही नातेवाईकांनी विषारी दारू प्यायल्याने या आठ जणांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या परिसरात मोठ्या प्रमाणात दारू विक्री होती. बेतिया येथे काही जणांनी मोठ्या प्रमाणात दारूचे सेवन केले. त्यानंतर अनेकांची प्रकृती अचानक बिघडू लागली आणि यातच 8 जणांचा मृत्यू झाला. अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचं माहिती समोर येत आहे. त्यामुळे मृतकांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

नौतन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दक्षिणेकडील तेलहुआ गावात ही घटना घडली. मृतकांमधील सर्व जण हे वॉर्ड क्रमांक 2, 3 आणि 4 मधील रहिवासी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी गावातील या सर्वांनी दारूचे सेवन केले आणि त्यानंतर रात्री उशीरा सर्वांची तब्येत खालावण्यास सुरुवात झाली. त्रास होत असलेल्या लोकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला. मृतकांची नावे समोर आली असून यामध्ये बच्चा यादव, महाराज यादव, हनुमंत सिंह, मुकेश पासवान, जवाहर सहनी, उमा साह, रमेश सहनी आणि राम प्रकाश यांचा समावेश आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :BiharबिहारDeathमृत्यू