शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
2
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
3
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
4
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
5
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल चामखीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
8
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
9
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
10
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
11
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
12
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
13
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
14
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
15
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
16
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
17
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
18
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
19
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
20
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...

एमआयडीसीमधील 18 कामगारांना विषबाधा ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2018 17:14 IST

अंबरनाथ - अंबरनाथ आनंदनगर एमआयडीसीमधील व्हर्टीव्ह एनर्जी प्रा. लिमिटेड या कंपनीत एकाच वेळी 18 कामगारांना विषबाधा झाल्याची भिती व्यक्त केली जात होती. मात्र या कामगारांमधील 10 कामगारांना किरकोळ त्रस झाल्याने त्यांना उपचार करुन सोडण्यात आले तर उर्वरित आठ जणांना एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या कामगारांना विषबाधा झाली नसून जंतूसंसर्ग ...

अंबरनाथ - अंबरनाथ आनंदनगर एमआयडीसीमधील व्हर्टीव्ह एनर्जी प्रा. लिमिटेड या कंपनीत एकाच वेळी 18 कामगारांना विषबाधा झाल्याची भिती व्यक्त केली जात होती. मात्र या कामगारांमधील 10 कामगारांना किरकोळ त्रस झाल्याने त्यांना उपचार करुन सोडण्यात आले तर उर्वरित आठ जणांना एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या कामगारांना विषबाधा झाली नसून जंतूसंसर्ग झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. 

व्हर्टीव्ह एनर्जी प्रा. लिमिटेड या कंपनीत काल सायंकाळी हा प्रकार घडला. या कंपनीत 600 कामगार काम करित असून त्यातील 18 कामगारांना मळमळने, उलटय़ा होणे असा त्रस जाणवत होता. त्यातील 10 कामगारांवर कारखान्यातील डॉक्टरांनीच उपचार करुन त्यांना घरी सोडले. तर उर्वरित 8 कामगारांना जास्त त्रास होत असल्याने त्यांना अंबरनाथच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले गेले. त्यांची प्रकृती स्थिर असली तरी त्या कामगारांना कशामुळे त्रास झाला हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. दुपारच्या जेवणातून हा त्रास झाल्याची शक्यता सुरुवातीला वर्तविण्यात येत होती. मात्र, 600 कामगारांपैकी अवघ्या 18 जणांना त्रास झाल्याने अन्नातून विषबाधा झाल्याची शक्यता धुसर झाली आहे. मात्र, कामगारांना झालेल्या त्रसाबाबत कंपनी स्तरावर चौकशी सुरु करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीसांनी देखील चौकशी सुरु केली आहे. कामगारांना नेमका जेवणातून त्रास झाला की कंपनीतील पाण्यातून त्रास झाला हे तपासण्यात येत आहे. कंपनीतील जेवण आणि पाण्याचे नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहे. 

ज्या कामगारांवर उपचार सुरु आहेत. त्यातील यागेश डोळे, पुरुषोत्तम पाटील, हर्षद गायकवाड, आनंद चिडे, रोहदास डायरे, आशुतोष पॉल, नरेंद्र राऊत आणि संग्राम नायर यांची प्रकृती स्थिर आहे. कंपनीचे वरिष्ठ संचालक विपीन रत्नपारखी  आणि संचालक मंगेश सावंत यांनी देखील कामगारांच्या प्रकृतीची चौकशी केली असून या कामगारांवर कंपनीमार्फत उपचार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच असा प्रकार पुन्हा घडणार नाही या अनुषंगाने कार्यवाही केली जात असल्याचे कंपनीमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfood poisoningअन्नातून विषबाधाambernathअंबरनाथ