शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीमधील 18 कामगारांना विषबाधा ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2018 17:14 IST

अंबरनाथ - अंबरनाथ आनंदनगर एमआयडीसीमधील व्हर्टीव्ह एनर्जी प्रा. लिमिटेड या कंपनीत एकाच वेळी 18 कामगारांना विषबाधा झाल्याची भिती व्यक्त केली जात होती. मात्र या कामगारांमधील 10 कामगारांना किरकोळ त्रस झाल्याने त्यांना उपचार करुन सोडण्यात आले तर उर्वरित आठ जणांना एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या कामगारांना विषबाधा झाली नसून जंतूसंसर्ग ...

अंबरनाथ - अंबरनाथ आनंदनगर एमआयडीसीमधील व्हर्टीव्ह एनर्जी प्रा. लिमिटेड या कंपनीत एकाच वेळी 18 कामगारांना विषबाधा झाल्याची भिती व्यक्त केली जात होती. मात्र या कामगारांमधील 10 कामगारांना किरकोळ त्रस झाल्याने त्यांना उपचार करुन सोडण्यात आले तर उर्वरित आठ जणांना एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या कामगारांना विषबाधा झाली नसून जंतूसंसर्ग झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. 

व्हर्टीव्ह एनर्जी प्रा. लिमिटेड या कंपनीत काल सायंकाळी हा प्रकार घडला. या कंपनीत 600 कामगार काम करित असून त्यातील 18 कामगारांना मळमळने, उलटय़ा होणे असा त्रस जाणवत होता. त्यातील 10 कामगारांवर कारखान्यातील डॉक्टरांनीच उपचार करुन त्यांना घरी सोडले. तर उर्वरित 8 कामगारांना जास्त त्रास होत असल्याने त्यांना अंबरनाथच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले गेले. त्यांची प्रकृती स्थिर असली तरी त्या कामगारांना कशामुळे त्रास झाला हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. दुपारच्या जेवणातून हा त्रास झाल्याची शक्यता सुरुवातीला वर्तविण्यात येत होती. मात्र, 600 कामगारांपैकी अवघ्या 18 जणांना त्रास झाल्याने अन्नातून विषबाधा झाल्याची शक्यता धुसर झाली आहे. मात्र, कामगारांना झालेल्या त्रसाबाबत कंपनी स्तरावर चौकशी सुरु करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीसांनी देखील चौकशी सुरु केली आहे. कामगारांना नेमका जेवणातून त्रास झाला की कंपनीतील पाण्यातून त्रास झाला हे तपासण्यात येत आहे. कंपनीतील जेवण आणि पाण्याचे नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहे. 

ज्या कामगारांवर उपचार सुरु आहेत. त्यातील यागेश डोळे, पुरुषोत्तम पाटील, हर्षद गायकवाड, आनंद चिडे, रोहदास डायरे, आशुतोष पॉल, नरेंद्र राऊत आणि संग्राम नायर यांची प्रकृती स्थिर आहे. कंपनीचे वरिष्ठ संचालक विपीन रत्नपारखी  आणि संचालक मंगेश सावंत यांनी देखील कामगारांच्या प्रकृतीची चौकशी केली असून या कामगारांवर कंपनीमार्फत उपचार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच असा प्रकार पुन्हा घडणार नाही या अनुषंगाने कार्यवाही केली जात असल्याचे कंपनीमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfood poisoningअन्नातून विषबाधाambernathअंबरनाथ