शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

नागपुरात कंटेनरमधून १.५९ कोटीच्या मोबाईलची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 23:55 IST

पांजरी टोल नाक्यावर उभ्या असलेल्या कंटेनगरमधून १.५९ कोटी रुपयांचे मोबाईल चोरी झाल्याची घटना घडली आहे. तीन महिन्यानंतर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देपांजरी टोल नाक्यावरील घटना, तीन महिन्यानंतर झाला गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पांजरी टोल नाक्यावर उभ्या असलेल्या कंटेनगरमधून १.५९ कोटी रुपयांचे मोबाईल चोरी झाल्याची घटना घडली आहे. तीन महिन्यानंतर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार आंध्र प्रदेशातील श्री सिटी येथील रहिवासी चालक आदेश कुमार कथेरिया (३४) हा १० कोटी रुपयांचे मोबाईल घेऊन कंटेनर क्रमांक आर. जे. ११, जीबी-५६६६ ने हरियाणाला जात होता. कंटेनरमध्ये आदेश कुमार याच्या शिवाय दुसरे कुणीही नव्हते. आंध्रप्रदेशवरून रवाना झाल्यानंतर तो यवतमाळ मधील पांढरकवडा येथे पोहोचला. तेथे धाब्यावर भोजन केल्यानंतर तो झोपी गेला. काही वेळ आराम केल्यानंतर १८ मार्चला दुपारी बेलतरोडी ठाण्यांतर्गत पांजरी टोल नाक्यावर पोहोचला. तेथे आदेश कुमारने कंटनेरच्या टायरची हवा तपासली. त्याला कंटेनरचे सील आणि सेंटर लॉक तोडण्यात आल्याचे समजले. कंटेनरची तपासणी केली असता मोबाईल चोरीला गेल्याचे समजले. या घटनेची बेलतरोडी ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. आदेश कुमार काही वेळासाठीच पांजरीला उतरला होता. दरम्यान तो कंटेनरजवळ उभा होता. पांढरकवडा येथे कंटेनर बराच वेळ उभा होता. यामुळे हे प्रकरण यवतमाळ पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे. पांढरकवडा पोलिसांनी त्यांच्या परिसरात चोरी झाली नसल्याचे म्हटले आहे. त्यानंतर बेलतरोडी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. कंटेनरमधून ओप्पो कंपनीचे २३६० मोबाईल चोरी झाल्याची माहिती आहे. त्यांची किंमत १.५९ कोटी रुपये आहे. आता तीन महिन्यानंतर बेलतरोडी पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Mobileमोबाइलtheftचोरी