शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

नागपुरात कंटेनरमधून १.५९ कोटीच्या मोबाईलची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 23:55 IST

पांजरी टोल नाक्यावर उभ्या असलेल्या कंटेनगरमधून १.५९ कोटी रुपयांचे मोबाईल चोरी झाल्याची घटना घडली आहे. तीन महिन्यानंतर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देपांजरी टोल नाक्यावरील घटना, तीन महिन्यानंतर झाला गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पांजरी टोल नाक्यावर उभ्या असलेल्या कंटेनगरमधून १.५९ कोटी रुपयांचे मोबाईल चोरी झाल्याची घटना घडली आहे. तीन महिन्यानंतर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार आंध्र प्रदेशातील श्री सिटी येथील रहिवासी चालक आदेश कुमार कथेरिया (३४) हा १० कोटी रुपयांचे मोबाईल घेऊन कंटेनर क्रमांक आर. जे. ११, जीबी-५६६६ ने हरियाणाला जात होता. कंटेनरमध्ये आदेश कुमार याच्या शिवाय दुसरे कुणीही नव्हते. आंध्रप्रदेशवरून रवाना झाल्यानंतर तो यवतमाळ मधील पांढरकवडा येथे पोहोचला. तेथे धाब्यावर भोजन केल्यानंतर तो झोपी गेला. काही वेळ आराम केल्यानंतर १८ मार्चला दुपारी बेलतरोडी ठाण्यांतर्गत पांजरी टोल नाक्यावर पोहोचला. तेथे आदेश कुमारने कंटनेरच्या टायरची हवा तपासली. त्याला कंटेनरचे सील आणि सेंटर लॉक तोडण्यात आल्याचे समजले. कंटेनरची तपासणी केली असता मोबाईल चोरीला गेल्याचे समजले. या घटनेची बेलतरोडी ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. आदेश कुमार काही वेळासाठीच पांजरीला उतरला होता. दरम्यान तो कंटेनरजवळ उभा होता. पांढरकवडा येथे कंटेनर बराच वेळ उभा होता. यामुळे हे प्रकरण यवतमाळ पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे. पांढरकवडा पोलिसांनी त्यांच्या परिसरात चोरी झाली नसल्याचे म्हटले आहे. त्यानंतर बेलतरोडी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. कंटेनरमधून ओप्पो कंपनीचे २३६० मोबाईल चोरी झाल्याची माहिती आहे. त्यांची किंमत १.५९ कोटी रुपये आहे. आता तीन महिन्यानंतर बेलतरोडी पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Mobileमोबाइलtheftचोरी