शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

१३७ बळी घेणारे चालक मोकाटच; नवी मुंबई, पनवेल, उरणमध्ये अपघात करून झाले फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 01:42 IST

Crime News : रस्ते अपघात ही नवी मुंबईची गंभीर समस्या बनत चालली आहे. अपघाताला कारणीभूत ठरणारी रस्त्यावरील परिस्थिती तसेच वाहनचालकांचा बेशिस्तपणा यामुळे हे अपघात घडत आहेत.

- सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई : मागील दोन वर्षांत नवी मुंबईसह पनवेल व उरण परिसरात अपघातांमध्ये ५०३ जणांचा बळी गेला आहे. त्यापैकी १३७ जणांचा बळी घेणारे वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाल्याने ते अद्यापही मोकाटच आहेत. भविष्यातही त्यांच्याकडून अपघात घडण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये बेशिस्त वाहनचालकांविषयी दहशत निर्माण झाली आहे.रस्ते अपघात ही नवी मुंबईची गंभीर समस्या बनत चालली आहे. अपघाताला कारणीभूत ठरणारी रस्त्यावरील परिस्थिती तसेच वाहनचालकांचा बेशिस्तपणा यामुळे हे अपघात घडत आहेत. अनेकदा अपघात करून वाहनचालक घटनास्थळावरून पळदेखील काढतात. त्यामुळे बहुतांश अपघातांचा उलगडा अद्याप होऊ शकलेला नाही. नुकतेच पामबीच मार्गावर एपीएमसी येथे घडलेल्या अपघातामध्ये पोलीसपुत्र भावंडांना प्राण गमवावा लागला आहे. याप्रकरणी कार चालवणाऱ्या हॉटेल व्यावसायिक रोहन अबॉट याने घटनास्थळावरून पळ काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलिसांपुढे शरणागती पत्करली. या गुन्ह्यात न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली आहे. अशाच अपघातांमध्ये नवी मुंबईसह पनवेल व उरण परिसरात दोन वर्षांत ५०३ जणांचा बळी गेला आहे. त्यापैकी २३२ जणांचा मृत्यू गतवर्षात झाला असून, २०१९ मध्ये २७१ जणांनी अपघाती प्राण गमावले आहेत. त्यापैकी १३७ जणांचा बळी घेणारे वाहनचालक अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नसल्याने ते मोकाटच आहेत. त्यामध्ये २०२० मधील ७८, तर २०१९ मधील ५९ अपघातांचा समावेश आहे. सायन पनवेल मार्ग, ठाणे बेलापूर मार्ग, तसेच पामबीच व शहरांतर्गतच्या मार्गावर घडलेले हे अपघात आहेत.मागील दोन वर्षांत नवी मुंबईत तब्बल १,३३४ अपघात घडले आहेत. 

टॅग्स :Accidentअपघात