शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

नोकरीचे आमिष दाखवून ११ तरुणांची फसवणूक; ३४ लाख रुपये केले हडप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 03:04 IST

सर्व जण तामिळनाडूमधील रहिवासी, दोघांवर गुन्हा दाखल

नवी मुंबई : विदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तामिळनाडूमधील ११ तरुणांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तरुणांकडून ३४ लाख रुपये घेऊन त्यांना नोकरीऐवजी टुरिस्ट व्हिसावर दुबईला पाठविण्यात आले होते. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विवेककुमार व रितू विवेककुमार अशी गुन्हा दाखल केलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांनी सीवूड स्टेशनसमोरील मॉलमध्ये व्हीआरव्ही मेरीटाइम प्रा. लि. नावाने कंपनी सुरू केली होती. या कंपनीच्या माध्यमातून विदेशात नोकरी लावण्याचे काम केले जात होते.उलवेमधील सेथील कुमारन यांनी जुलै २०१८ मध्ये नोकरीसाठी या कंपनीकडे अर्ज केला होता. त्यांचे वय ४० पेक्षा जास्त असल्याने त्यांना नोकरी नाकारली. परंतु त्यांच्या परिचितांपैकी कोणी मर्चंट नेव्हीचे प्रशिक्षण घेतले असल्यास त्यांना नोकरी मिळवू देऊ व प्रत्येक उमेदवारासाठी २० हजार रुपये कमिशन देऊ, असे आश्वासन दिले होते. सेथील कुमारन यांनी तामिळनाडूमधील ११ तरुणांना या कंपनीकडे अर्ज करण्यास सांगितले. प्रत्येकाकडून प्रत्येकी ३ लाख ६० हजार रुपये संबंधित कंपनीत भरण्यात आले. सर्व उमेदवारांना दुबई, अरब अमिराती, उझबेकिस्तानमध्ये नोकरी देण्यासाठी करार करण्यात आला. मार्च २०१९ मध्ये त्यांना टुरिस्ट व्हिसा देऊन दुबईमध्ये पाठविण्यात आले. २० दिवसांत व्हिसाची मुदत संपल्याने हे सर्व तरुण तेथे अडकून पडले होते.

फसवणूक झालेल्या तरुणांनी सेथील कुमारन यांच्याशी संपर्क साधून सर्व प्रकार सांगितला. दुबईला जाऊन या मुलांच्या जेवणाचा व राहण्याचा खर्च भागविला व एप्रिल २०१९ मध्ये त्यांना घेऊन पुन्हा भारतात आले. यानंतर व्हीआरव्ही कंपनीच्या संचालकांनी नोकरी मिळवून देण्याचे आमिष सुरूच ठेवले. नोकरीही मिळत नाही व पैसेही मिळत नसल्याने याविषयी फेब्रुवारी २०२० मध्ये त्यांनी नवी मुंबई गुन्हे शाखेकडे लेखी तक्रार केली होती. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Policeपोलिस