शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
3
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
4
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
5
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
8
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
9
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
10
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
11
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
12
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
13
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
14
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
15
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
16
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
17
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
18
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
19
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
20
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!

पत्रकार राणा अयुबकडून १ कोटी ७७ लाख जप्त; ईडीकडून विशेष न्यायालयात तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 06:01 IST

ज्या कारणांसाठी हा पैसा गोळा करण्यात आला होता त्यातील केवळ २९ लाख रुपयेच त्या कामासाठी वापरल्याचे स्पष्ट झाले, तर बाकीच्या पैशांसाठी तिने बनावट बिले सादर केल्याचाही ठपका ईडीने ठेवला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लोकहिताचे प्रकल्प साकारायचे असल्याचे भासवत सर्वसामान्य लोकांकडून पैसे गोळा करून ते पैसे वैयक्तिक बँक खात्यात वळविल्याचा ठपका ठेवत पत्रकार राणा अयुब हिच्याविरोधात ईडीने विशेष न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. तसेच, आतापर्यंत राणाच्या बँक खात्यातील १ कोटी ७७ लाख रुपयांची रक्कमदेखील ईडीने जप्त केली आहे. 

उपलब्ध माहितीनुसार, सन २०२० मध्ये राणाने कोविड काळात महाराष्ट्र, आसाम, बिहार येथे झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना मदत करणे, तसेच अन्य काही समाजहिताची कारणे दाखवत केट्टो या ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे सर्वसामान्य माणसांकडून मोठ्या प्रमाणावर पैसा गोळा केला होता. या कामासाठी तिला लोकांकडून २ कोटी ६९ लाख रुपये मिळाल्याचे ईडीच्या तपासांत दिसून आले. हे पैसे तिच्या वडिलांच्या, तसेच बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा झाले होते. त्यानंतर हे पैसे त्या दोघांच्या खात्यातून राणाच्या खात्यामध्ये वळविल्याचे तपासात आढळले. तिच्या खात्यात पैसे जमा झाल्यानंतर या पैशांतील ५० लाख रुपयांची रक्कम तिने मुदत ठेवींमध्ये गुंतविली, तर आणखी ५० लाख रुपये तिच्याच दुसऱ्या बँक खात्यामध्ये वळविले. ज्या कारणांसाठी हा पैसा गोळा करण्यात आला होता त्यातील केवळ २९ लाख रुपयेच त्या कामासाठी वापरल्याचे स्पष्ट झाले, तर बाकीच्या पैशांसाठी तिने बनावट बिले सादर केल्याचाही ठपका ईडीने ठेवला आहे. या प्रकरणी गाझियाबाद पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता. मात्र, यातील आर्थिक व्याप्ती लक्षात घेता ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. ४ एप्रिल २०२२ रोजी राणा अयुब हिच्या बँक खात्यातील सर्व रक्कम जप्त केली. 

परदेशातूनही देणग्याराणा अयुबने परदेशातूनही काही देणग्या स्वीकारल्याचे ईडीच्या तपासांत निष्पन्न झाले. मात्र, परदेशातून स्वीकारण्यात आलेल्या देणग्यांसाठी तिने सरकारची कोणतीही आवश्यक परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे परदेशी चलन विनिमय कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोपही ईडीने आपल्या तक्रारीमध्ये केला आहे.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय