शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
2
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
3
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
4
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
5
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
6
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
7
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
8
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
9
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
10
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
11
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
12
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
13
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
14
Share Market: US Fed च्या निर्णयानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; 'या' शेअर्समध्ये तेजी
15
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
16
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
17
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
18
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
19
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
20
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर

नवीन विद्यापीठ कायदा

By admin | Updated: July 8, 2016 18:17 IST

शिक्षकांना जबाबदारीचे भान असावे लागणार आहे. कुलगुरूंना अधिसभा, व्यवस्थापन मंडळ आदी प्राधिकरणांवर नियुक्त्या करण्याचे अधिकार असतील. कुलगुरू नि:पक्षपाती असणे आवश्यक राहणार आहे. कुलगुरू मनमानी पद्धतीने वागतात. त्यामुळे कुलगुरूंची नियुक्ती करतानाच योग्य निर्णय घ्यावे लागतील. नवीन कायद्यानुसार विद्यापीठात कायमस्वरूपी अधिष्ठाता नियुक्त केला जाणार आहे. ही बाब शिक्षक, संशोधक आदींसाठी चांगली आहे. शिवाय आर्थिक बाबींवरही बंधने येतील. आर्थिक वर्ष संपण्यापूर्वीच ऑडीट करून त्यासंबंधी सूचविलेल्या सुधारणा महिनाभरात करून त्यास अधिसभेची मंजुरी घ्यावी लागेल. शिक्षणासोबतच कौशल्य विकासाची जोड दिली जाणार आहे. नॅक बंधनकारक असेल. त्यावर संस्थेची प्रगती अवलंबून असेल.

शिक्षकांना जबाबदारीचे भान असावे लागणार आहे. कुलगुरूंना अधिसभा, व्यवस्थापन मंडळ आदी प्राधिकरणांवर नियुक्त्या करण्याचे अधिकार असतील. कुलगुरू नि:पक्षपाती असणे आवश्यक राहणार आहे. कुलगुरू मनमानी पद्धतीने वागतात. त्यामुळे कुलगुरूंची नियुक्ती करतानाच योग्य निर्णय घ्यावे लागतील. नवीन कायद्यानुसार विद्यापीठात कायमस्वरूपी अधिष्ठाता नियुक्त केला जाणार आहे. ही बाब शिक्षक, संशोधक आदींसाठी चांगली आहे. शिवाय आर्थिक बाबींवरही बंधने येतील. आर्थिक वर्ष संपण्यापूर्वीच ऑडीट करून त्यासंबंधी सूचविलेल्या सुधारणा महिनाभरात करून त्यास अधिसभेची मंजुरी घ्यावी लागेल. शिक्षणासोबतच कौशल्य विकासाची जोड दिली जाणार आहे. नॅक बंधनकारक असेल. त्यावर संस्थेची प्रगती अवलंबून असेल.
-प्राचार्य अनिल राव

निवडणुकांचा वाईट अनुभव
विद्यापीठातील मंडळे, अधिसभा आदींबाबत वाईट अनुभव होता. त्यामुळे नवीन कायदा आला. उच्चशिक्षणाचे बळकटीकरण, गुणवत्ता, विद्याविषयक विकास आदी उद्दिष्टे आहेत. पण हा कायदा उपयुक्त आहे काय हा मुद्दा आहे. ज्ञानस्त्रोत केंद्र, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सहचार्य मंडळ अशा नवीन बाबी या कायद्यात समाविष्ट केल्या. परंतु कौशल्य विकास व इतर मुद्दे लक्षात घेतले तर तशा सुविधा उपलब्ध आहेत काय, मनुष्यबळ आहे का, हा विचार करायला हवा होता. महाविद्यालयांमधील निवडणुका योग्य की अयोग्य हादेखील मुद्दा आहे. विज्ञान, तंत्रज्ञान याला प्रोत्साहन देण्याचे काम नवीन कायद्यात झाले, परंतु सामाजिक शास्त्र, ‘ुमॅनिटी यासंबंधी दुर्लक्ष होत नाही ना याचाही विचार व्हायला हवा.
-प्राचार्य आर.डी.राणे

शिक्षणाला उद्योगाची जोड
शिक्षणाला उद्योगाची जोड देण्याचे काम कौशल्य विकासच्या माध्यमातून नवीन कायदा आल्यानंतर होणार आहे. आज अनेक विद्यार्थ्यांना थेअरी माहीत असते, पण प्रॅक्टीकल येत नाही. हा प्रकार कमी होऊ शकेल. विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होऊ शकले. आंतरविद्याशाखांबाबतही चांगला निर्णय घेतला जाणार आहे. विद्यापीठाचे नियम अधिक कडक होणार आहेत.
-प्राचार्य यु.डी.कुलकर्णी

विद्यार्थ्यांच्या निवडणुका त्रासदायक बनू नयेत
महाविद्यालयांमध्ये प्राचार्य नियुक्त करताना विद्यार्थी मतदान करतील. महाविद्यालयातून विद्यार्थ्यांचा प्रतिनिधी निवडण्यासाठी निवडणूक होईल. त्या त्रासदायक बनू शकतात. कारण त्यासाठी आर्थिक तरतूद व इतर मुद्दे हे अनुत्तरित आहेत. संस्थांचे नियंत्रण आसावे लागेल. कौशल्य विकासमध्ये इतर देशांची तुलना करून काही आणण्यापेक्षा ज्या भागात ज्या उद्योगाला वाव आहे त्यावर भर दिला जावा. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा विचार करावा.
-प्राचार्य एल.पी.देशमुख