शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कधी थांबणार ग्रंथांची महोत्सवी उपेक्षा?

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

औरंगाबाद : राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानातर्फे घेण्यात येणारा जिल्हा ग्रंथ महोत्सव दरसालप्रमाणे यथासांग पार पडला. विविध सांस्कृतिक उपक्रम, साहित्यिकांच्या मुलाखती यांची रेलचेल, विद्यार्थ्यांसाठी अनेकविध स्पर्धा साजर्‍या झाल्या.

औरंगाबाद : राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानातर्फे घेण्यात येणारा जिल्हा ग्रंथ महोत्सव दरसालप्रमाणे यथासांग पार पडला. विविध सांस्कृतिक उपक्रम, साहित्यिकांच्या मुलाखती यांची रेलचेल, विद्यार्थ्यांसाठी अनेकविध स्पर्धा साजर्‍या झाल्या.
मात्र महोत्सवाचा मूळ उद्देश होता ग्रंथांची ओळख आणि विक्री. हा हेतू मात्र, कुठेतरी हरवल्याचे चित्र होते. तीन दिवसांत शहरभरातील पालक व विद्यार्थ्यांनी महोत्सवाला भेटी देणे अपेक्षित होते. मात्र, स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आलेल्या शाळकरी मुलांव्यतिरिक्त कोणीही आवर्जून इकडे फिरकले नाही. या महोत्सवाची पुरेशी प्रसिद्धी करण्याची तसदीच शासनाकडून घेतली गेली नसल्याची भावना एका स्टॉलधारकाने बोलून दाखविली. सर्व साधन-सुविधा असताना अनेकदा केवळ संवेदनशीलता व कल्पकतेचा अभाव ही आपल्या शासकीय कार्यपद्धतीची ओळख आहे. लालफितीतला कारभार या नावाने प्रसिद्ध असणारा हा एकूण व्यवहार वाचन संस्कृतीच्या प्रवाहीपणाला फारसा पुढे नेऊ शकला नाही. वाचक पुस्तकांपर्यंत पोहोचला नाही; तर पुस्तकेच वाचकोंपर्यंत पोहोचतील याचे प्रयत्न व्हावे लागतात. आधुनिक तंत्रयुगातील माध्यमांचा प्रभावी वापर करत अधिक संवादी बनणे सहज शक्य आहे. या महोत्सवाचे स्वरूप केवळ उत्सवी होत असल्याचेच ठळकपणे जाणवते आहे. दीर्घकाळ मनात रुजणारे वाचनवेड या महोत्सवातून कोवळ्या वयाला मिळायला हवे. मात्र, तीन दिवसांचा आनंदोत्सव, स्पर्धा, बक्षिसे यांच्यापलीकडे जाण्यात महोत्सव अपयशी ठरला. भाषणे, व्याख्याने यातून प्रसंग साजरा केल्याचे तात्पुरते समाधान मिळते. मात्र, उद्याचा वाचक घडवायचा, टिकवायचा असेल तर काही अधिक विचारीपणे व्हायला हवे. निमंत्रित साहित्यिक सोडले तर शहरातील एकही ज्येष्ठ वा नव्या दमाचा साहित्यिक-कवी महोत्सवात फिरकला नाही. नव्या पिढीशी जोडून घेत त्यांच्या हाती अक्षरठेवा सोपविण्याची ही संधी त्यांना का मोलाची वाटली नाही?
शेवटी काय तर, ऐकलेले शब्द वार्‍यावर विरून जातील कालांतराने. मात्र, कुणीतरी वाचावे म्हणून कुणी लिहिलेली अक्षरे दीर्घकाळ सोबत करतात. त्या अक्षरांना एकाकीपणापासून वाचवायला हवे, त्यासाठी वाचायला हवे, नाही का?