शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

कधी थांबणार ग्रंथांची महोत्सवी उपेक्षा?

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

औरंगाबाद : राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानातर्फे घेण्यात येणारा जिल्हा ग्रंथ महोत्सव दरसालप्रमाणे यथासांग पार पडला. विविध सांस्कृतिक उपक्रम, साहित्यिकांच्या मुलाखती यांची रेलचेल, विद्यार्थ्यांसाठी अनेकविध स्पर्धा साजर्‍या झाल्या.

औरंगाबाद : राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानातर्फे घेण्यात येणारा जिल्हा ग्रंथ महोत्सव दरसालप्रमाणे यथासांग पार पडला. विविध सांस्कृतिक उपक्रम, साहित्यिकांच्या मुलाखती यांची रेलचेल, विद्यार्थ्यांसाठी अनेकविध स्पर्धा साजर्‍या झाल्या.
मात्र महोत्सवाचा मूळ उद्देश होता ग्रंथांची ओळख आणि विक्री. हा हेतू मात्र, कुठेतरी हरवल्याचे चित्र होते. तीन दिवसांत शहरभरातील पालक व विद्यार्थ्यांनी महोत्सवाला भेटी देणे अपेक्षित होते. मात्र, स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आलेल्या शाळकरी मुलांव्यतिरिक्त कोणीही आवर्जून इकडे फिरकले नाही. या महोत्सवाची पुरेशी प्रसिद्धी करण्याची तसदीच शासनाकडून घेतली गेली नसल्याची भावना एका स्टॉलधारकाने बोलून दाखविली. सर्व साधन-सुविधा असताना अनेकदा केवळ संवेदनशीलता व कल्पकतेचा अभाव ही आपल्या शासकीय कार्यपद्धतीची ओळख आहे. लालफितीतला कारभार या नावाने प्रसिद्ध असणारा हा एकूण व्यवहार वाचन संस्कृतीच्या प्रवाहीपणाला फारसा पुढे नेऊ शकला नाही. वाचक पुस्तकांपर्यंत पोहोचला नाही; तर पुस्तकेच वाचकोंपर्यंत पोहोचतील याचे प्रयत्न व्हावे लागतात. आधुनिक तंत्रयुगातील माध्यमांचा प्रभावी वापर करत अधिक संवादी बनणे सहज शक्य आहे. या महोत्सवाचे स्वरूप केवळ उत्सवी होत असल्याचेच ठळकपणे जाणवते आहे. दीर्घकाळ मनात रुजणारे वाचनवेड या महोत्सवातून कोवळ्या वयाला मिळायला हवे. मात्र, तीन दिवसांचा आनंदोत्सव, स्पर्धा, बक्षिसे यांच्यापलीकडे जाण्यात महोत्सव अपयशी ठरला. भाषणे, व्याख्याने यातून प्रसंग साजरा केल्याचे तात्पुरते समाधान मिळते. मात्र, उद्याचा वाचक घडवायचा, टिकवायचा असेल तर काही अधिक विचारीपणे व्हायला हवे. निमंत्रित साहित्यिक सोडले तर शहरातील एकही ज्येष्ठ वा नव्या दमाचा साहित्यिक-कवी महोत्सवात फिरकला नाही. नव्या पिढीशी जोडून घेत त्यांच्या हाती अक्षरठेवा सोपविण्याची ही संधी त्यांना का मोलाची वाटली नाही?
शेवटी काय तर, ऐकलेले शब्द वार्‍यावर विरून जातील कालांतराने. मात्र, कुणीतरी वाचावे म्हणून कुणी लिहिलेली अक्षरे दीर्घकाळ सोबत करतात. त्या अक्षरांना एकाकीपणापासून वाचवायला हवे, त्यासाठी वाचायला हवे, नाही का?