शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कधी थांबणार ग्रंथांची महोत्सवी उपेक्षा?

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

औरंगाबाद : राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानातर्फे घेण्यात येणारा जिल्हा ग्रंथ महोत्सव दरसालप्रमाणे यथासांग पार पडला. विविध सांस्कृतिक उपक्रम, साहित्यिकांच्या मुलाखती यांची रेलचेल, विद्यार्थ्यांसाठी अनेकविध स्पर्धा साजर्‍या झाल्या.

औरंगाबाद : राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानातर्फे घेण्यात येणारा जिल्हा ग्रंथ महोत्सव दरसालप्रमाणे यथासांग पार पडला. विविध सांस्कृतिक उपक्रम, साहित्यिकांच्या मुलाखती यांची रेलचेल, विद्यार्थ्यांसाठी अनेकविध स्पर्धा साजर्‍या झाल्या.
मात्र महोत्सवाचा मूळ उद्देश होता ग्रंथांची ओळख आणि विक्री. हा हेतू मात्र, कुठेतरी हरवल्याचे चित्र होते. तीन दिवसांत शहरभरातील पालक व विद्यार्थ्यांनी महोत्सवाला भेटी देणे अपेक्षित होते. मात्र, स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आलेल्या शाळकरी मुलांव्यतिरिक्त कोणीही आवर्जून इकडे फिरकले नाही. या महोत्सवाची पुरेशी प्रसिद्धी करण्याची तसदीच शासनाकडून घेतली गेली नसल्याची भावना एका स्टॉलधारकाने बोलून दाखविली. सर्व साधन-सुविधा असताना अनेकदा केवळ संवेदनशीलता व कल्पकतेचा अभाव ही आपल्या शासकीय कार्यपद्धतीची ओळख आहे. लालफितीतला कारभार या नावाने प्रसिद्ध असणारा हा एकूण व्यवहार वाचन संस्कृतीच्या प्रवाहीपणाला फारसा पुढे नेऊ शकला नाही. वाचक पुस्तकांपर्यंत पोहोचला नाही; तर पुस्तकेच वाचकोंपर्यंत पोहोचतील याचे प्रयत्न व्हावे लागतात. आधुनिक तंत्रयुगातील माध्यमांचा प्रभावी वापर करत अधिक संवादी बनणे सहज शक्य आहे. या महोत्सवाचे स्वरूप केवळ उत्सवी होत असल्याचेच ठळकपणे जाणवते आहे. दीर्घकाळ मनात रुजणारे वाचनवेड या महोत्सवातून कोवळ्या वयाला मिळायला हवे. मात्र, तीन दिवसांचा आनंदोत्सव, स्पर्धा, बक्षिसे यांच्यापलीकडे जाण्यात महोत्सव अपयशी ठरला. भाषणे, व्याख्याने यातून प्रसंग साजरा केल्याचे तात्पुरते समाधान मिळते. मात्र, उद्याचा वाचक घडवायचा, टिकवायचा असेल तर काही अधिक विचारीपणे व्हायला हवे. निमंत्रित साहित्यिक सोडले तर शहरातील एकही ज्येष्ठ वा नव्या दमाचा साहित्यिक-कवी महोत्सवात फिरकला नाही. नव्या पिढीशी जोडून घेत त्यांच्या हाती अक्षरठेवा सोपविण्याची ही संधी त्यांना का मोलाची वाटली नाही?
शेवटी काय तर, ऐकलेले शब्द वार्‍यावर विरून जातील कालांतराने. मात्र, कुणीतरी वाचावे म्हणून कुणी लिहिलेली अक्षरे दीर्घकाळ सोबत करतात. त्या अक्षरांना एकाकीपणापासून वाचवायला हवे, त्यासाठी वाचायला हवे, नाही का?