शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

खासगी शाळांच्या शिक्षक भरतीसाठी सीईटी घेणार संस्थाचालकांच्या मनमानी भरती प्रक्रियेला बसणार चाप

By admin | Updated: August 27, 2015 23:45 IST

पुणे: राज्यातील खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील सर्व शिक्षकांच्या रिक्त जागांवरील भरती कॉमन रिक्रुटमेंट टेस्ट फॉर द टीचर (सीआरटीटी) च्या माध्यमातून करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे सोईच्या उमेदवारीच्या नियुक्तीसाठी संस्थाचालकांकडून केल्या जाणा-या मनमानीला चाप बसणार आहे.तसेच शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण असणा-या गुणवता धारक उमेदवारांनाच या पुढील काळात शासकीय व खासगी शाळांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे.येत्या नोव्हेंबर/डिसेंबर महिन्यात सीआरटीटी परीक्षा घेवून खासगी शिक्षक भरतीला सुरूवात होण्याची शक्यता आहे.

पुणे: राज्यातील खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील सर्व शिक्षकांच्या रिक्त जागांवरील भरती कॉमन रिक्रुटमेंट टेस्ट फॉर द टीचर (सीआरटीटी) च्या माध्यमातून करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे सोईच्या उमेदवारीच्या नियुक्तीसाठी संस्थाचालकांकडून केल्या जाणा-या मनमानीला चाप बसणार आहे.तसेच शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण असणा-या गुणवता धारक उमेदवारांनाच या पुढील काळात शासकीय व खासगी शाळांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे.येत्या नोव्हेंबर/डिसेंबर महिन्यात सीआरटीटी परीक्षा घेवून खासगी शिक्षक भरतीला सुरूवात होण्याची शक्यता आहे.
नागपूर उच्च न्यायालयात खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षकांच्या भरती बाबत जनहित जाचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने शासनाच्या अर्थ सहाय्याने चालणा-या राज्यातील खासगी व्यव्स्थापनाचामधील शिक्षक व शिक्षकेत कर्मचा-यांच्या नेमणूका गुणवत्तेनुसार करण्याचे धोरण निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व खासगी शाळांमधील शिक्षकांच्या एकूण रिक्त पदांचा आढावा घेतला जाणार आहे. खासगी शाळांमधील शिक्षकांच्या भरतीच्या परीक्षेसाठी विषय निहाय अभ्यासक्रम निश्चित केला जाणार आहे. प्राथमिक शिक्षक भरतीच्या परीक्षेचा अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून तर माध्यमिक शिक्षकांच्या भरतीचा अभ्यासक्रम राज्य मंडळाकडून निश्चित केला जाणार आहे.राज्य परीक्षा परिषदेकडून परीक्षेच्या नियोजनाची कालबध्द रुपरेषा आखण्यात आली आहे.
राज्य शासनाचे शिक्षण विभागासाठी एक ते दहा प्राध्यान्य निश्चित केले आहे.त्यात शिक्षकांची नियुक्ती केंद्रीय निवड पध्दतीने करण्यास प्राधान्य दिले आहे. त्यामुळे केवळ शासकीयच नाही तर खासगी शाळांमधील शिक्षकांची नियुक्ती सुध्दा केंद्रीय निवड पध्दतीने होणार आहे. सध्या संस्थाचालकांकडून केल्या जात असलेल्या भरतीतून काहीवेळा गुणवत्ताधारक उमेदवारांना डावलले जाते. तसेच शैक्षणिक दृष्ट्या अपात्र असणा-या व सामाजिक आरक्षण डावलून काही उमेदवारांच्या नियुक्त्या केल्या जातात. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात.त्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला आहे.
शासनाने टीईटी परीक्षा उत्तीर्ण असणारे उमेदवारचीच शिक्षक पदी नियुक्ती केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.त्यामुळे टीईटी पात्र उमेदवारांचीच सीआरटीटीमधून खासगी शिक्षक पदासाठी निवड होणार आहे. इंग्रजी माध्यामाच्या शाळांमध्ये पदवी किंवा पदव्युत्तर पदवी प्राप्त उमेदवार शिक्षक म्हणून काम करत आहेत.त्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे.सीईटी किंवा सीआरटीटीच्या माध्यमातून शिक्षकांची निवड झाली तर शैक्षणिक दर्जा उंचावणार आहे.मात्र,काही संस्थाचालक या धोरणाच्या विरोधात पुन्हा न्यायालयात जाण्याची शक्तता व्यक्त केली जात आहे.