शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

खासगी शाळांच्या शिक्षक भरतीसाठी सीईटी घेणार संस्थाचालकांच्या मनमानी भरती प्रक्रियेला बसणार चाप

By admin | Updated: August 27, 2015 23:45 IST

पुणे: राज्यातील खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील सर्व शिक्षकांच्या रिक्त जागांवरील भरती कॉमन रिक्रुटमेंट टेस्ट फॉर द टीचर (सीआरटीटी) च्या माध्यमातून करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे सोईच्या उमेदवारीच्या नियुक्तीसाठी संस्थाचालकांकडून केल्या जाणा-या मनमानीला चाप बसणार आहे.तसेच शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण असणा-या गुणवता धारक उमेदवारांनाच या पुढील काळात शासकीय व खासगी शाळांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे.येत्या नोव्हेंबर/डिसेंबर महिन्यात सीआरटीटी परीक्षा घेवून खासगी शिक्षक भरतीला सुरूवात होण्याची शक्यता आहे.

पुणे: राज्यातील खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील सर्व शिक्षकांच्या रिक्त जागांवरील भरती कॉमन रिक्रुटमेंट टेस्ट फॉर द टीचर (सीआरटीटी) च्या माध्यमातून करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे सोईच्या उमेदवारीच्या नियुक्तीसाठी संस्थाचालकांकडून केल्या जाणा-या मनमानीला चाप बसणार आहे.तसेच शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण असणा-या गुणवता धारक उमेदवारांनाच या पुढील काळात शासकीय व खासगी शाळांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे.येत्या नोव्हेंबर/डिसेंबर महिन्यात सीआरटीटी परीक्षा घेवून खासगी शिक्षक भरतीला सुरूवात होण्याची शक्यता आहे.
नागपूर उच्च न्यायालयात खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षकांच्या भरती बाबत जनहित जाचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने शासनाच्या अर्थ सहाय्याने चालणा-या राज्यातील खासगी व्यव्स्थापनाचामधील शिक्षक व शिक्षकेत कर्मचा-यांच्या नेमणूका गुणवत्तेनुसार करण्याचे धोरण निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व खासगी शाळांमधील शिक्षकांच्या एकूण रिक्त पदांचा आढावा घेतला जाणार आहे. खासगी शाळांमधील शिक्षकांच्या भरतीच्या परीक्षेसाठी विषय निहाय अभ्यासक्रम निश्चित केला जाणार आहे. प्राथमिक शिक्षक भरतीच्या परीक्षेचा अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून तर माध्यमिक शिक्षकांच्या भरतीचा अभ्यासक्रम राज्य मंडळाकडून निश्चित केला जाणार आहे.राज्य परीक्षा परिषदेकडून परीक्षेच्या नियोजनाची कालबध्द रुपरेषा आखण्यात आली आहे.
राज्य शासनाचे शिक्षण विभागासाठी एक ते दहा प्राध्यान्य निश्चित केले आहे.त्यात शिक्षकांची नियुक्ती केंद्रीय निवड पध्दतीने करण्यास प्राधान्य दिले आहे. त्यामुळे केवळ शासकीयच नाही तर खासगी शाळांमधील शिक्षकांची नियुक्ती सुध्दा केंद्रीय निवड पध्दतीने होणार आहे. सध्या संस्थाचालकांकडून केल्या जात असलेल्या भरतीतून काहीवेळा गुणवत्ताधारक उमेदवारांना डावलले जाते. तसेच शैक्षणिक दृष्ट्या अपात्र असणा-या व सामाजिक आरक्षण डावलून काही उमेदवारांच्या नियुक्त्या केल्या जातात. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात.त्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला आहे.
शासनाने टीईटी परीक्षा उत्तीर्ण असणारे उमेदवारचीच शिक्षक पदी नियुक्ती केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.त्यामुळे टीईटी पात्र उमेदवारांचीच सीआरटीटीमधून खासगी शिक्षक पदासाठी निवड होणार आहे. इंग्रजी माध्यामाच्या शाळांमध्ये पदवी किंवा पदव्युत्तर पदवी प्राप्त उमेदवार शिक्षक म्हणून काम करत आहेत.त्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे.सीईटी किंवा सीआरटीटीच्या माध्यमातून शिक्षकांची निवड झाली तर शैक्षणिक दर्जा उंचावणार आहे.मात्र,काही संस्थाचालक या धोरणाच्या विरोधात पुन्हा न्यायालयात जाण्याची शक्तता व्यक्त केली जात आहे.