शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

विश्वासात न घेतल्यामुळे हॉकर्स बांधवांनी फिरविली पाठ तिढा वाढला : अतिक्रमण विभागासमोर निर्माण झाला पेच

By admin | Updated: January 26, 2016 00:04 IST

जळगाव : गोलाणी मार्केटमधील हॉकर्स बांधवांना हक्काची जागा मनपाच्या अतिक्रमण विभागातर्फे सोडत काढून देण्यात येणार होती. परंतु, तत्पूर्वी मनपा प्रशासनाने हॉकर्स बांधवांना विश्वासात न घेता, ही प्रक्रिया केल्याचे कारण पुढे करत सोमवारी एकही हॉकर्स उपस्थित न राहिल्यामुळे अतिक्रमण विभागासमोर पुन्हा एकदा पेच निर्माण झाला आहे.

जळगाव : गोलाणी मार्केटमधील हॉकर्स बांधवांना हक्काची जागा मनपाच्या अतिक्रमण विभागातर्फे सोडत काढून देण्यात येणार होती. परंतु, तत्पूर्वी मनपा प्रशासनाने हॉकर्स बांधवांना विश्वासात न घेता, ही प्रक्रिया केल्याचे कारण पुढे करत सोमवारी एकही हॉकर्स उपस्थित न राहिल्यामुळे अतिक्रमण विभागासमोर पुन्हा एकदा पेच निर्माण झाला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या रस्ता सुरक्षा समितीच्या अनुषंगाने शहरातील रहदारीचे रस्ते व फुटपाथ मोकळे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यादृष्टीने टप्प्याटप्याने शहरातील सुरक्षित जागांवर हॉकर्सचे स्थलांतर करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने महासभेत मंजूर करून घेतला आहे. त्यानुसार गोलाणी मार्केटमध्ये भर रस्त्यात अतिक्रमण करणार्‍या नोंदणीकृत २० व्यावसायिकांना हटविण्यात येऊन त्यांना सुरक्षितस्थळी जागा देण्याचे मनपा प्रशासनाने नियोजन केले होते.
सोडत काढण्याची पूर्ण तयारी झाली
मात्र, हॉकर्सच उपस्थित नाही
मनपाच्या अतिक्रमण विभागात सोडत काढण्याची वेळ सकाळी ११ वाजता पूर्ण झाली होती. परंतु, हॉकर्सबांधव उपस्थित राहिले नाही. कालांतराने हॉकर्स संघटनेच्या काही प्रतिनिधींशी अधीक्षक एच. एम. खान यांनी स्वत: संपर्क साधला. परंतु, त्यांनी स्पष्टपणे हॉकर्सला विश्वासात न घेता सोडत काढली जात असल्याचे सांगून सोडत काढण्यासाठी उपस्थित राहू शकत नाही, असे परखडपणे सांगितले. त्यामुळे मनपा प्रशासन व हॉकर्स बांधव यांच्यातील जागा वाटपाचा तिढा आणखीनच वाढला आहे.
परिपूर्ण व्यवस्था करूनही हॉकर्स ऐकण्यास तयार नाहीत
गोलाणी मार्केटच्या परिसरात व्यवसाय करणार्‍या हॉकर्सला सकाळी गोलाणी मार्केट परिसरात तर सायंकाळी मनपाच्या सतरा मजली इमारतीसमोर व्यवसाय करण्याची परवानगी मनपा प्रशासनाने दिली आहे. त्यानुसार हॉकर्सला जागेची आखणीही करून दिली आहे. सायंकाळी नागरिक व हॉकर्सची गैरसोय होऊ नये, म्हणून सतरा मजलीच्या बाजूने जो रस्ता जातो, त्या ठिकाणी लाईट व फोकस लावण्यात आले आहे. तरीही हॉकर्स पूर्वीपासून ज्याठिकाणी व्यवसाय करत आहे, त्याच ठिकाणी व्यवसाय करू द्या, असे सांगत असल्यामुळे मनपाच्या अतिक्रमण विभागात कार्यरत अधिकार्‍यांची डोकेदुखी वाढली आहे.