शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

आम्ही भ्रष्टाचाऱ्यांकडून एक-एक पैसा वसूल करू, त्यांना उलटे टांगू - अमित शाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 06:29 IST

छत्तीसगडमधील प्रचारसभेत अमित शाह यांची टीका

राजनांदगाव (छत्तीसगड) : पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर छत्तीसगडमध्ये पुन्हा सत्तेत आल्यास काँग्रेस ‘व्होट बँके’साठी तुष्टीकरणाचे राजकारण सुरूच ठेवील, असा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी येथे दिला.

येथील एका जाहीर सभेत शाह म्हणाले की, काँग्रेस सरकारने दिल्लीपर्यंत अन्नसाखळीसारखी (रेस्टॉरंटच्या) ‘भ्रष्टाचार साखळी’ तयार केली आहे. जर भाजप छत्तीसगडमध्ये सत्तेवर आले तर आम्ही भ्रष्टाचाऱ्यांकडून एक-एक पैसा वसूल करू आणि त्यांना उलटे टांगू. काँग्रेसच्या काळात अविभाजित मध्य प्रदेश-छत्तीसगड हे ‘बिमारू’ (मागासलेले) राज्य होते; पण रमणसिंग सत्तेवर आल्यानंतर १५ वर्षांत (२००३ मध्ये) ते विकसित राज्य बनले, असा दावाही त्यांनी केला. एप्रिलमध्ये बेमेटारा जिल्ह्यातील बिरनपूर गावात झालेल्या जातीय हिंसाचारावर भूपेश बघेल सरकारवर शाह यांनी हल्ला केला आणि लोकांना छत्तीसगड पुन्हा जातीय दंगलींचे केंद्र बनवायचे आहे का, असे विचारले. छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या राजवटीत विविध घोटाळे झाले, बघेल यांनी राज्याला दिल्ली दरबारचे “एटीएम” बनविल्याचा आरोप शाह यांनी केला. 

राजस्थान-छत्तीसगड भ्रष्टाचाराचे एटीएमबंगळुरू येथील छाप्यात काँग्रेसच्या जवळच्या लोकांच्या घरातून १०० कोटींहून अधिक रोख जप्त केल्याचा दावा भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केला. काँग्रेसच्या भ्रष्ट डीएनएचा हा एक छोटासा नमुना आहे. काँग्रेसने छत्तीसगड आणि राजस्थानलाही भ्रष्टाचाराचे एटीएम बनविल्याचे ते म्हणाले. 

टॅग्स :Amit Shahअमित शाह