शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

डी के शिवकुमारांच्या शंकेनंतर छत्तीसगडमध्ये मोठ्या हालचाली; शैलजा अचानक रायपूरमध्ये, कर्नाटकची झळ बसू लागली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2023 18:08 IST

कुमारी शैलजा या मंगळवारी सकाळीच अचानक रायपूरमध्ये आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. शैलजा यांनी येताच मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी तळ ठोकून मंत्र्यांच्या एकेक करून बैठका घेण्यास सुरुवात केली आहे.

रायपूर: कर्नाटक विधानसभेचा निकाल लागला आणि दिल्लीत मुख्यमंत्री कोण यावरून खलबते सुरु झाली आहेत. सिद्धरामय्या की शिवकुमार यांना करायचे यावरून एकमत होत नाहीय तोच कर्नाटकातील दोन आणि तीन वर्षांच्या फॉर्म्युल्याने तिकडे छत्तीसगडमध्ये राजकारण उकळू लागले आहे. त्याची झळ दिल्लीत बसू लागताच काँग्रेसने दिल्लीतून तातडीने काँग्रेस प्रभारी कुमारी शैलजा यांना पाठवून दिले आहे. 

कुमारी शैलजा या मंगळवारी सकाळीच अचानक रायपूरमध्ये आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. शैलजा यांनी येताच मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी तळ ठोकून मंत्र्यांच्या एकेक करून बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. यामुळे छत्तीसगढ काँग्रेसमध्य सारे काही आलबेल नसल्याचे बोलले जाऊ लागले आहे. 

कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री पदासाठी जो फॉर्म्युला ठरविला जात आहे, छत्तीसगडमध्ये देखील तसाच फॉर्म्युला ठरविण्यात आला आहे. याची चर्चा गेल्या साडे चार वर्षांपासून तिथे होत आहे. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीनंतर हायकमांडने तिथे अडीज-अडीज वर्षांचा फॉर्म्युला ठेवला होता. भूपेश बघेल सुरुवातीच्या अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री नंतर टीएस सिंहदेव यांना पुढची टर्म दिली जाणार होती. परंतु, बघेल यांनी हे पद सोडलेले नाहीय. 

काँग्रेसने हा फॉर्म्युला कधी सार्वजनिक केला नाही, नाही बघेल यांनी तो पाळला. मात्र, सिंहदेव यांचे समर्थक जरूर याची चर्चा करत असतात. अडीच वर्षे झाल्यानंतर सिंहदेव यांनी देखील अनेकदा मुख्यमंत्रीपदावर हक्क सांगितला आहे. तसेच हायकमांडवर अनेकदा नाराजी देखील व्यक्त केली आहे. आता तर निवडणुका जवळ आल्या आहेत. 

कुठे पुन्हा चर्चा सुरु झाली...शिवकुमार यांना जेव्हा पुढची तीन वर्षे सीएमपद देण्याचा प्रस्ताव ठेवला गेला तेव्हा त्यांनी छत्तीसगडमध्ये असाच फॉर्म्युला पाळला गेला नाही, याची आठवण त्यांनी हायकमांडला करून दिली. मग कर्नाटकात तो लागू होईल हे कशावरून, असा सवाल त्यांनी विचारला. यानंतर तातडीने शैलजा यांचा दौरा ठरविण्यात आला आहे. रायपूरमध्ये कोणताही मंत्री, नेता यावर काही बोलत नाहीय. शैलजा यांनी गृहमंत्री ताम्रध्वज साहू आणइ पीएचई मंत्री रूद्र कुमार यांच्याशी चर्चा केली आहे. दोघांनीही यावर बोलण्यास पत्रकारांना नकार दिला आहे.

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकChhattisgarhछत्तीसगडcongressकाँग्रेस