शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

ZP निवडणुक स्वबळावर शिवसेनेला अवघड; महाविकास आघाडीसोबत लढण्याचा मनोदय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 12:26 IST

बंडखोर पाच आमदारांपैकी संदीपान भुमरे सोडले, तर उर्वरित आमदारांची ताकद ग्रामीण भागात शून्य आहे.

- विजय सरवदे 

औरंगाबाद : बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. एकदम पाच आमदार एकनाथ शिंदेसोबत गेल्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांवरील सेनेची पकड ढिली होऊ शकते. जि.प.मध्ये सध्याचे बलाबल गाठणेही सेनेला शक्य होणार नाही, असा कयास आहे. मात्र, आगामी जि.प. निवडणूक ही महाविकास आघाडीसोबत लढली जाईल. शिवाय, बंडखोर पाच आमदारांपैकी संदीपान भुमरे सोडले, तर उर्वरित आमदारांची ताकद ग्रामीण भागात शून्य आहे. तरीही जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी सेनेला पूर्वीपेक्षा प्रचंड मेहन घ्यावी लागेल, यास सेनेच्या ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात शिवसेनेचे पाच आमदार निवडून आले होते. त्यात पैठण विधानसभा मतदारसंघाचे आ. संदीपान भुमरे, वैजापूरचे आ. रमेश बोरनारे, औरंगाबाद पश्चिमचे आ. संजय शिरसाट, मध्यचे आ. प्रदीप जैस्वाल आणि कन्नडचे आ. उदयसिंग राजपूत, आदींचा समावेश आहे. निवडणूक झाल्यानंतर सिल्लोडचे आ. अब्दुल सत्तार हे शिवसेनेत दाखल झाले. तथापि, सेनेच्या एकूण सहा आमदारांपैकी अलीकडे पाच आमदारांनी बंडखोरी करीत ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. त्यामुळे आता शिवसेनेकडे आ. उदयसिंग राजपूत हे एकमेव आमदार आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत जि.प.चे सध्याचे बलाबल राखणे अवघड आहे, अशी राजकीय पटलावर चर्चा आहे.

यासंदर्भात ग्रामीण भागातील सेनेचे स्थानिक पदाधिकारी म्हणतात की, ग्रामीण भागात उमेदवाराला न बघता शिवसेनेला मानणारे मतदार आहेत. आमदार जरी फुटलेले असले, तरी त्यांचा ग्राउंडरुटवर फारसा परिणाम झालेला नाही. मतदारांची श्रद्धा बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शिवसेनेवर आजही कायम आहे. काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी पैठण, वैजापूर, औरंगाबाद, आदी ठिकाणी मेळावे घेतले होते. तेव्हा शंभर-पन्नास कार्यकर्ते मेळाव्याला हजर राहतील, असा विरोधकांनी अंदाज लावला होता. पण, मेळाव्यास मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हेच सांगतो आहे की, आजही शिवसेनेला मानणारे कार्यकर्ते कमी झालेले नाहीत.

जि.प.चे माजी शिक्षण सभापती अविनाश गलांडे यांनी सांगितले की, निवडणुकीपूर्वी वरिष्ठ नेत्यांसह स्थानिक नेते व ग्रामीण पदाधिकारी संपूर्ण जिल्हा पिंजून काढणार आहेत. जि.प.ची निवडणूक ही महाविकास आघाडीसोबत लढणार असून, सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वस्व पणाला लावले जाईल. सध्या फुटीर आमदार विद्यमान शिंदे सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी विकास कामांवर खर्च करत आहेत. याचाही फारसा परिणाम होणार नाही. कारण, या आमदारांना शिवसेनेने आणि शिवसेनेच्या मतदारांनीच निवडून दिले आहे. त्यामुळे ही विकासकामे शिवसेनेमुळेच होत आहेत, हा विश्वास आम्ही ग्रामीण भागात लोकांना पटवून देत आहोत.

जि.प.मधील पक्षीय बलाबलशिवसेना : १९काँग्रेस : १६राष्ट्रवादी काँग्रेस : २भाजप : २२अपक्ष : ३

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदMahavikas Aghadiमहाविकास आघाडीElectionनिवडणूक