शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

ZP निवडणुक स्वबळावर शिवसेनेला अवघड; महाविकास आघाडीसोबत लढण्याचा मनोदय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 12:26 IST

बंडखोर पाच आमदारांपैकी संदीपान भुमरे सोडले, तर उर्वरित आमदारांची ताकद ग्रामीण भागात शून्य आहे.

- विजय सरवदे 

औरंगाबाद : बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. एकदम पाच आमदार एकनाथ शिंदेसोबत गेल्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांवरील सेनेची पकड ढिली होऊ शकते. जि.प.मध्ये सध्याचे बलाबल गाठणेही सेनेला शक्य होणार नाही, असा कयास आहे. मात्र, आगामी जि.प. निवडणूक ही महाविकास आघाडीसोबत लढली जाईल. शिवाय, बंडखोर पाच आमदारांपैकी संदीपान भुमरे सोडले, तर उर्वरित आमदारांची ताकद ग्रामीण भागात शून्य आहे. तरीही जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी सेनेला पूर्वीपेक्षा प्रचंड मेहन घ्यावी लागेल, यास सेनेच्या ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात शिवसेनेचे पाच आमदार निवडून आले होते. त्यात पैठण विधानसभा मतदारसंघाचे आ. संदीपान भुमरे, वैजापूरचे आ. रमेश बोरनारे, औरंगाबाद पश्चिमचे आ. संजय शिरसाट, मध्यचे आ. प्रदीप जैस्वाल आणि कन्नडचे आ. उदयसिंग राजपूत, आदींचा समावेश आहे. निवडणूक झाल्यानंतर सिल्लोडचे आ. अब्दुल सत्तार हे शिवसेनेत दाखल झाले. तथापि, सेनेच्या एकूण सहा आमदारांपैकी अलीकडे पाच आमदारांनी बंडखोरी करीत ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. त्यामुळे आता शिवसेनेकडे आ. उदयसिंग राजपूत हे एकमेव आमदार आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत जि.प.चे सध्याचे बलाबल राखणे अवघड आहे, अशी राजकीय पटलावर चर्चा आहे.

यासंदर्भात ग्रामीण भागातील सेनेचे स्थानिक पदाधिकारी म्हणतात की, ग्रामीण भागात उमेदवाराला न बघता शिवसेनेला मानणारे मतदार आहेत. आमदार जरी फुटलेले असले, तरी त्यांचा ग्राउंडरुटवर फारसा परिणाम झालेला नाही. मतदारांची श्रद्धा बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शिवसेनेवर आजही कायम आहे. काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी पैठण, वैजापूर, औरंगाबाद, आदी ठिकाणी मेळावे घेतले होते. तेव्हा शंभर-पन्नास कार्यकर्ते मेळाव्याला हजर राहतील, असा विरोधकांनी अंदाज लावला होता. पण, मेळाव्यास मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हेच सांगतो आहे की, आजही शिवसेनेला मानणारे कार्यकर्ते कमी झालेले नाहीत.

जि.प.चे माजी शिक्षण सभापती अविनाश गलांडे यांनी सांगितले की, निवडणुकीपूर्वी वरिष्ठ नेत्यांसह स्थानिक नेते व ग्रामीण पदाधिकारी संपूर्ण जिल्हा पिंजून काढणार आहेत. जि.प.ची निवडणूक ही महाविकास आघाडीसोबत लढणार असून, सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वस्व पणाला लावले जाईल. सध्या फुटीर आमदार विद्यमान शिंदे सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी विकास कामांवर खर्च करत आहेत. याचाही फारसा परिणाम होणार नाही. कारण, या आमदारांना शिवसेनेने आणि शिवसेनेच्या मतदारांनीच निवडून दिले आहे. त्यामुळे ही विकासकामे शिवसेनेमुळेच होत आहेत, हा विश्वास आम्ही ग्रामीण भागात लोकांना पटवून देत आहोत.

जि.प.मधील पक्षीय बलाबलशिवसेना : १९काँग्रेस : १६राष्ट्रवादी काँग्रेस : २भाजप : २२अपक्ष : ३

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदMahavikas Aghadiमहाविकास आघाडीElectionनिवडणूक