शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
4
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
5
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
6
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
7
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
8
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
9
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
10
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
11
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
12
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
13
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
14
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
15
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
16
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
17
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
18
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
19
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
20
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!

जि.प. शाळांची पटसंख्या ऐरणीवर

By admin | Updated: June 22, 2016 00:55 IST

औरंगाबाद : खाजगी शाळांनी गावागावांत जाऊन विद्यार्थी मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आहेत, तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या एकाही शिक्षकाने

औरंगाबाद : खाजगी शाळांनी गावागावांत जाऊन विद्यार्थी मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आहेत, तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या एकाही शिक्षकाने किंवा शिक्षणाधिकाऱ्यांनी विद्यार्थी मिळविण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. यांच्या अशा अनास्थेमुळे अनेक शाळांना कुलूप लागण्याची वेळ आली आहे. शिक्षकाअभावी रोज वेगवेगळ्या पंचायत समित्यांमध्ये पालक शाळा भरवीत आहेत. तरीही शिक्षणाधिकाऱ्यांना त्याचे सोयरसुतक नाही. अशा अकार्यक्षम शिक्षणाधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी सदस्यांनी सर्वसाधारण सभेत लावून धरली. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले की, अलीकडेच बदल्यांची प्रक्रिया राबवली आहे. काही शिक्षक अजूनही बदली झालेल्या शाळेत रुजू झालेले नाहीत. सध्या हाती घेण्यात आलेली पदोन्नतीची प्रक्रिया आटोपल्यानंतर शाळानिहाय शिक्षकांची स्थिती काय आहे, यासंबंधीचा अहवाल गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून मागवून घेतला जाईल. जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थी संख्या कमी होत आहे, ही बाब खरी आहे. यासंदर्भात आपण प्रवेश पंधरवडा राबवत आहोत. यापूर्वी जिल्ह्यांतील शाळांमध्ये असलेली विद्यार्थी संख्या आणि प्रवेश पंधरवडा राबविल्यानंतरची विद्यार्थी संख्या, या संबंधीचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल यांना दिले.बांधकाम सभापती संतोष जाधव यांनी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या बेपर्वाईचा मुद्दा चर्चेला आणला. ते म्हणाले की, मी स्वत: माझ्या सर्कलमधील विविध शाळांना भेटी देत आहे. मात्र, शाळा सुरू झाल्यानंतर आजपर्यंत एकदाही शिक्षणाधिकाऱ्यांनी एकाही शाळेला भेट दिली नाही. त्यांनी विद्यार्थी मिळविण्यासाठी गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख किंवा शिक्षकांना सांगितले नाहीत. आजही अनेक शाळांना शिक्षक नाहीत. यासंबंधी शिक्षणाधिकाऱ्यांना वेळोवेळी सांगण्यात आले; पण त्यांनी सातत्याने त्याकडे दुर्लक्ष केले. सदस्य मनाजी मिसाळ, दीपकसिंह राजपूत, शैलेश क्षीरसागर, पुष्पा जाधव, मनोहर गवई, पुष्पा केंदारे यांनीही शिक्षणाधिकारी कोणत्याही तक्रारीची दखल घेत नसल्याचा आरोप केला. शिक्षण सभापती विनोद तांबे यांनी पैठणच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांवर पैसे घेऊन नांदर जि.प. शाळेत शिक्षक भरल्याचा खळबळजनक आरोप केला. त्या शाळेतील एका शिक्षकाचे अपघाती निधन झाले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्या शाळेवर पैसे घेऊन शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली, असे ते म्हणाले.अनेक शाळांवर विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे; पण तेथे शिक्षक नाहीत, तर दुसरीकडे अनेक शाळा अशाही आहेत की तिथे विद्यार्थ्यांची संख्या अत्यंत कमी आहे. त्या शाळांमध्ये मात्र शिक्षक जास्तीचे आहेत. जिथे शिक्षकांची गरज आहे, अशा शाळांमध्ये शिक्षकांना पाठविण्याबद्दल वारंवार गटशिक्षणाधिकाऱ्यांना सांगितले जाते. मात्र, ते ऐकत नाहीत. गटशिक्षणाधिकारी शिक्षकांना का जपतात, हेच कळत नाही, असे तांबे म्हणाले.