शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

जि.प. अध्यक्षपदी काँग्रेसचे महाजन

By admin | Updated: September 22, 2014 01:18 IST

औरंगाबाद : चमत्कार घडविण्याचे युतीचे दावे फोल ठरवीत काँग्रेस आघाडीने जिल्हा परिषदेतील सत्ता कायम राखली. सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेने एकजुटीचे दर्शन घडवून युतीचा धुव्वा उडविला.

 

औरंगाबाद : चमत्कार घडविण्याचे युतीचे दावे फोल ठरवीत काँग्रेस आघाडीने जिल्हा परिषदेतील सत्ता कायम राखली. सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेने एकजुटीचे दर्शन घडवून युतीचा धुव्वा उडविला. काँग्रेसचे श्रीराम नागोराव महाजन हे अध्यक्षपदी, तर राष्ट्रवादीचे दिनकर नरसिंहराव पवार हे उपाध्यक्षपदी विजयी झाले. शिवसेनेचे अध्यक्षपदाचे उमेदवार अनिलकुमार शांतीलाल चोरडिया व भाजपाच्या उपाध्यक्षपदाच्या उमेदवार इंदूमती राधाकिसन वाघ यांचा पराभव झाला. आघाडीचे महाजन व पवार यांना प्रत्येकी ३४ मते पडली तर युतीचे चोरडिया व वाघ यांना प्रत्येकी २५ मते पडली.औरंगाबाद : ६० सदस्यांच्या या सभागृहात ५९ सदस्यांनी मतदान केले. भाजपाच्या फर्दापूर गटाच्या सदस्या भिकाबाई दगडू तडवी या अनुपस्थित राहिल्या. त्यामुळे युतीचे मताधिक्य एका मताने घटले. काँग्रेसचे १५, राष्ट्रवादीचे ११ व मनसेच्या ८ सदस्यांनी (एकूण ३४) आघाडीच्या उमेदवारांना मतदान केले. युतीच्या उमेदवारांना शिवसेनेचे १८, भाजपा ५ आणि २ अपक्षांनी (एकूण २५) मतदान केले. बहुमत असूनही सिल्लोड पंचायत समिती हातून गेल्यामुळे ही निवडणूक काँग्रेस आघाडीसाठी प्रतिष्ठेची झाली होती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आघाडीच्या सर्वच सदस्यांना गेल्या आठ दिवसांपासून बाहेर अज्ञातस्थळी पाठविण्यात आले होते. त्यानंतर युतीचे सदस्यही सहलीवर निघून गेले होते. रविवारी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर दुपारी पावणेतीन वाजता एका बसमधून युतीचे सदस्य व त्यानंतर आघाडीचे सदस्य एका लक्झरी बसमधून एकत्र आले. युतीच्या सदस्यांसोबत गजानन बारवाल, राजू दानवे आदी पदाधिकारी होते. तर आघाडीच्या सदस्यांसोबत पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री अब्दुल सत्तार, आ. सुभाष झांबड आदी मंडळी होती. तत्पूर्वी अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या उमेदवारांनी जिल्हा परिषदेत येऊन उमेदवारी अर्ज भरले होते. अध्यक्षपदासाठी आघाडीकडून श्रीराम महाजन व विनोद तांबे यांनी आणि उपाध्यक्षपदासाठी रामदास पालोदकर, दिनकर पवार यांनी अर्ज नेले. परंतु अध्यक्षपदासाठी फक्त महाजन यांनीच अर्ज सादर केला. तर उपाध्यक्षपदासाठी तिघांनी अर्ज सादर केले व नंतर पालोदकर यांनी अर्ज मागे घेतला. युतीकडून दोन्ही पदासाठी प्रत्येकी एक अर्ज भरण्यात आला होता. जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांच्या अध्यक्षतेखाली निवडीच्या विशेष सभेला दुपारी ३ वाजता सुरुवात झाली. हात उंचावून मतदान घेण्यात आले. त्यात महाजन व पवार विजयी झाल्याची घोषणा विक्रमकुमार यांनी केली. त्यांना जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी मदत केली. निवडीची प्रक्रिया सुरू असताना मंत्री अब्दुल सत्तार, आ. सुभाष झांबड, आ. सतीश चव्हाण, भाऊ साहेब चिकटगावकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रभाकर पालोदकर, जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे, सुधाकर सोनवणे, नगरसेवक अभिजित देशमुख, इब्राहिम पटेल हे उपाध्यक्षांच्या दालनात बसून होते. नूतन अध्यक्ष, उपाध्यक्षांचे या मान्यवरांनी अभिनंदन केले. पक्ष नेत्यांच्या उपस्थितीत महाजन यांनी मावळत्या अध्यक्षा शारदा जारवाल यांच्याकडून, तर पवार यांनी मावळत्या उपाध्यक्षा विजया चिकटगावकर यांच्याकडून पदभार स्वीकारला. अध्यक्षपदी महाजन यांची निवड झाल्याचा निरोप सभागृहातून बाहेर येताच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तेथून काढता पाय घेतला. तर काँग्रेस आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केली. ४बँड व ढोल-ताशे वाजवीत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. गुलालाची उधळण करून जल्लोष करण्यात आला.