शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘झेडपी’ने आवळला कारवाईचा फास !

By admin | Updated: June 17, 2016 00:31 IST

बाबूराव चव्हाण , उस्मानाबाद वर्षानुवर्ष पाणीटंचाईला तोंड देणाऱ्या गावे, वाड्या-तांड्यावर भारत निर्माण योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या

बाबूराव चव्हाण , उस्मानाबादवर्षानुवर्ष पाणीटंचाईला तोंड देणाऱ्या गावे, वाड्या-तांड्यावर भारत निर्माण योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या. मात्र, जिल्हाभरातील सुमारे ११९ योजनांच्या पाणीपुरवठा समित्यांनी निकषानुसार योजनांची कामे पूर्ण केली नसल्याचा ठपका ठेवून तसा अहवाल शासनाला सादर करण्यात आला. अशा समित्यांकडे तब्बल एक कोटी रूपये वसूलपात्र रक्कम असून, शासनाने ही रक्कम वसूल करण्याचे आदेश दिल्यानंतर जिल्हा परिषदेकडून आता कारवाईचा फास आवळला आहे. ज्या समित्यांचे अध्यक्ष-सचिव वसूलपात्र रक्कम शासनखाती जमा करणार नाहीत, त्यांच्याविरूद्ध तीन दिवसानंतर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.भारत निर्माण तसेच राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत आजवर जिल्हाभरात सुमारे १५५ पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या. यापैकी काही योजनांवर १० लाख, काहीं योजनांसाठी २० लाख तर काही योजनांवर ८० लाखांपर्यंत निधी खर्च झाला असल्याचे दाखविण्यात आले आहे. परंतु, बोटावर मोजण्याइतपत पाणीपुरवठा समित्यांनीच निकषानुसार कामे पूर्ण केली. त्यामुळे कोट्यवधी रूपये खर्च होवूनही गावांना पाणी मिळू शकले नाही. यास तत्कालीन अधिकारी आणि गावपुढाऱ्यांतील मिलिभगत जबाबदार असल्याचे ग्रामस्थ सांगतात. अशा योजनांबाबत तक्रारी आल्यानंतर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांनी गावनिहाय योजनांचा आढावा घेतला. आढाव्याअंती अनेक पाणीपुरवठा समित्यांनी योजनेचे मुल्यांकन केलेले नसल्याचे समोर आले. तसेच काही समित्यांनी कामापेक्षा अधिक निधी खर्च केल्याचे दाखविले, काहींनी कामे न करताच निधी खर्च केल्याचे समोर आले. सदरील प्रकार गांभीर्याने घेत जि.प. प्रशासनाने हा अहवाल शासनाला सादर केला. ११९ गावच्या पाणीपुरवठा समित्यांनी कामे निकषानुसार केली नसल्याने त्यांच्याकडे तब्बल एक कोटी रूपये वसूलपात्र रक्कम असल्याचे अहवालात म्हटले होते. त्यावर शासनाने सदरील रक्कम वसूल करा अन्यथा फौजदारी गुन्हे नोंदवा असे आदेश दिले होते. हे आदेश प्राप्त होताच सीईओ आनंद रायते यांनी समितीच्या अध्यक्ष-सचिवांची सुनावणी घेवून ‘रक्कम भरा, अन्यथा कारवाईला सामोरे जा’ असा इशारा दिला होता. त्यानुसार मागील तीन-चार दिवसांत लोहारा, भूम, परंडा, वाशी आणि उमरगा या तालुक्यांतील काही समित्यांनी रक्कम शासनखाती जमा केली आहे. उर्वरित समित्यांकडे आणखी तीन दिवसांची मुदत आहे. यानंतर मात्र संबंधितांविरूद्ध फौजदारी गुन्हे नोंदविण्यात येणार असल्याचे कार्यकारी अभियंता देवकर यांनी सांगितले.