शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

‘झेडपी’ने आवळला कारवाईचा फास !

By admin | Updated: June 17, 2016 00:31 IST

बाबूराव चव्हाण , उस्मानाबाद वर्षानुवर्ष पाणीटंचाईला तोंड देणाऱ्या गावे, वाड्या-तांड्यावर भारत निर्माण योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या

बाबूराव चव्हाण , उस्मानाबादवर्षानुवर्ष पाणीटंचाईला तोंड देणाऱ्या गावे, वाड्या-तांड्यावर भारत निर्माण योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या. मात्र, जिल्हाभरातील सुमारे ११९ योजनांच्या पाणीपुरवठा समित्यांनी निकषानुसार योजनांची कामे पूर्ण केली नसल्याचा ठपका ठेवून तसा अहवाल शासनाला सादर करण्यात आला. अशा समित्यांकडे तब्बल एक कोटी रूपये वसूलपात्र रक्कम असून, शासनाने ही रक्कम वसूल करण्याचे आदेश दिल्यानंतर जिल्हा परिषदेकडून आता कारवाईचा फास आवळला आहे. ज्या समित्यांचे अध्यक्ष-सचिव वसूलपात्र रक्कम शासनखाती जमा करणार नाहीत, त्यांच्याविरूद्ध तीन दिवसानंतर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.भारत निर्माण तसेच राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत आजवर जिल्हाभरात सुमारे १५५ पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या. यापैकी काही योजनांवर १० लाख, काहीं योजनांसाठी २० लाख तर काही योजनांवर ८० लाखांपर्यंत निधी खर्च झाला असल्याचे दाखविण्यात आले आहे. परंतु, बोटावर मोजण्याइतपत पाणीपुरवठा समित्यांनीच निकषानुसार कामे पूर्ण केली. त्यामुळे कोट्यवधी रूपये खर्च होवूनही गावांना पाणी मिळू शकले नाही. यास तत्कालीन अधिकारी आणि गावपुढाऱ्यांतील मिलिभगत जबाबदार असल्याचे ग्रामस्थ सांगतात. अशा योजनांबाबत तक्रारी आल्यानंतर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांनी गावनिहाय योजनांचा आढावा घेतला. आढाव्याअंती अनेक पाणीपुरवठा समित्यांनी योजनेचे मुल्यांकन केलेले नसल्याचे समोर आले. तसेच काही समित्यांनी कामापेक्षा अधिक निधी खर्च केल्याचे दाखविले, काहींनी कामे न करताच निधी खर्च केल्याचे समोर आले. सदरील प्रकार गांभीर्याने घेत जि.प. प्रशासनाने हा अहवाल शासनाला सादर केला. ११९ गावच्या पाणीपुरवठा समित्यांनी कामे निकषानुसार केली नसल्याने त्यांच्याकडे तब्बल एक कोटी रूपये वसूलपात्र रक्कम असल्याचे अहवालात म्हटले होते. त्यावर शासनाने सदरील रक्कम वसूल करा अन्यथा फौजदारी गुन्हे नोंदवा असे आदेश दिले होते. हे आदेश प्राप्त होताच सीईओ आनंद रायते यांनी समितीच्या अध्यक्ष-सचिवांची सुनावणी घेवून ‘रक्कम भरा, अन्यथा कारवाईला सामोरे जा’ असा इशारा दिला होता. त्यानुसार मागील तीन-चार दिवसांत लोहारा, भूम, परंडा, वाशी आणि उमरगा या तालुक्यांतील काही समित्यांनी रक्कम शासनखाती जमा केली आहे. उर्वरित समित्यांकडे आणखी तीन दिवसांची मुदत आहे. यानंतर मात्र संबंधितांविरूद्ध फौजदारी गुन्हे नोंदविण्यात येणार असल्याचे कार्यकारी अभियंता देवकर यांनी सांगितले.