शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
2
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
3
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
4
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
5
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
6
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
7
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
8
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
9
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
10
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
11
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
12
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
13
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
14
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
15
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
16
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
17
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
18
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
19
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
20
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षात पुढच्या सीटवर बसण्याच्या वादातून मित्राचा चाकूने भोसकून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 12:40 IST

औरंगाबादेतील कटकटगेट परिसरातील बुधवारी मध्यरात्रीची घटना 

ठळक मुद्देवाद विकोपाला गेला आणि मित्राने चाकूने सपासप वार केले

औरंगाबाद : कंदुरीच्या कार्यक्रमासाठी जात असताना रिक्षात बसण्यावरून दोन मित्रात झालेल्या वादातून  शेख आसिफ (२२,रा. लेबर कॉलनी) याचा चाकूने भोसकून खून करण्यात आला आहे. ही घटना कटकटगेट परिसरात आयपी मेसजवळ बुधवारी रात्री साडे अकराच्या सुमारास घडली. 

लेबर कॉलनी परिसरातील रहिवासी शेख रिहान आणि आसिफ हे अन्य दोन मित्रासह कंदूरीच्या कार्यक्रमासाठी निघाले होते. लेबर कॉलनी, कटकटगेट मार्गे ते आयपी मेस समोरून टीव्ही सेंटर रस्त्यावर आले. यावेळी आसिफ आणि रिहान यांच्या रिक्षात पुढच्या सिटवर  बसण्यावरून वाद झाला. यावेळी चालकाने रिक्षा थांबविली आणि ते दोघे खाली उतरले. वाद विकोपाला गेला आणि रिहाने स्वत:जवळील चाकू काढून आसिफवर जोरात दोन वार केले. या घटनेत आसिफ रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. हे दृष्य पाहून त्याच्या सोबतचे मित्र घटनास्थळावरून पसार झाले.  घटनेची माहिती मिळताच जिन्सी ठाण्याचे उपनिरीक्षक दत्ता शेळके आणि डी.बी. पथकाच्या कर्मचाऱ्यांनी आसिफला घाटी रूग्णालयात दाखल केले.  अपघात विभागातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.  खूनाची घटना सिडको पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असून आरोपी जिन्सी परिसरातील आहे. 

आरोपीला पोलिसांकडूनअटकआरोपी शेख रिहान हा पळून जिल्हाधिकारी कार्यालय समोरून जात असल्याची माहिती मिळताच जिन्सी ठाण्याच्या पथकाने त्यास ताब्यात घेतले. यावेळी त्याच्या अंगावरील कपडे रक्ताने माखलेले दिसले. शिवाय घटनास्थळावरून चाकू पोलिसांनी जप्त केला आहे. 

घटनास्थळी तणाव : आसिफचा चाकूने भोसकून खून झाल्याचे कळताच आयपी मेस परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती. पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. तेथे तणावसदृष्य परिस्थीती निर्माण झाली होती.