शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

रिक्षात पुढच्या सीटवर बसण्याच्या वादातून मित्राचा चाकूने भोसकून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 12:40 IST

औरंगाबादेतील कटकटगेट परिसरातील बुधवारी मध्यरात्रीची घटना 

ठळक मुद्देवाद विकोपाला गेला आणि मित्राने चाकूने सपासप वार केले

औरंगाबाद : कंदुरीच्या कार्यक्रमासाठी जात असताना रिक्षात बसण्यावरून दोन मित्रात झालेल्या वादातून  शेख आसिफ (२२,रा. लेबर कॉलनी) याचा चाकूने भोसकून खून करण्यात आला आहे. ही घटना कटकटगेट परिसरात आयपी मेसजवळ बुधवारी रात्री साडे अकराच्या सुमारास घडली. 

लेबर कॉलनी परिसरातील रहिवासी शेख रिहान आणि आसिफ हे अन्य दोन मित्रासह कंदूरीच्या कार्यक्रमासाठी निघाले होते. लेबर कॉलनी, कटकटगेट मार्गे ते आयपी मेस समोरून टीव्ही सेंटर रस्त्यावर आले. यावेळी आसिफ आणि रिहान यांच्या रिक्षात पुढच्या सिटवर  बसण्यावरून वाद झाला. यावेळी चालकाने रिक्षा थांबविली आणि ते दोघे खाली उतरले. वाद विकोपाला गेला आणि रिहाने स्वत:जवळील चाकू काढून आसिफवर जोरात दोन वार केले. या घटनेत आसिफ रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. हे दृष्य पाहून त्याच्या सोबतचे मित्र घटनास्थळावरून पसार झाले.  घटनेची माहिती मिळताच जिन्सी ठाण्याचे उपनिरीक्षक दत्ता शेळके आणि डी.बी. पथकाच्या कर्मचाऱ्यांनी आसिफला घाटी रूग्णालयात दाखल केले.  अपघात विभागातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.  खूनाची घटना सिडको पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असून आरोपी जिन्सी परिसरातील आहे. 

आरोपीला पोलिसांकडूनअटकआरोपी शेख रिहान हा पळून जिल्हाधिकारी कार्यालय समोरून जात असल्याची माहिती मिळताच जिन्सी ठाण्याच्या पथकाने त्यास ताब्यात घेतले. यावेळी त्याच्या अंगावरील कपडे रक्ताने माखलेले दिसले. शिवाय घटनास्थळावरून चाकू पोलिसांनी जप्त केला आहे. 

घटनास्थळी तणाव : आसिफचा चाकूने भोसकून खून झाल्याचे कळताच आयपी मेस परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती. पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. तेथे तणावसदृष्य परिस्थीती निर्माण झाली होती.