शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

रिक्षात पुढच्या सीटवर बसण्याच्या वादातून मित्राचा चाकूने भोसकून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 12:40 IST

औरंगाबादेतील कटकटगेट परिसरातील बुधवारी मध्यरात्रीची घटना 

ठळक मुद्देवाद विकोपाला गेला आणि मित्राने चाकूने सपासप वार केले

औरंगाबाद : कंदुरीच्या कार्यक्रमासाठी जात असताना रिक्षात बसण्यावरून दोन मित्रात झालेल्या वादातून  शेख आसिफ (२२,रा. लेबर कॉलनी) याचा चाकूने भोसकून खून करण्यात आला आहे. ही घटना कटकटगेट परिसरात आयपी मेसजवळ बुधवारी रात्री साडे अकराच्या सुमारास घडली. 

लेबर कॉलनी परिसरातील रहिवासी शेख रिहान आणि आसिफ हे अन्य दोन मित्रासह कंदूरीच्या कार्यक्रमासाठी निघाले होते. लेबर कॉलनी, कटकटगेट मार्गे ते आयपी मेस समोरून टीव्ही सेंटर रस्त्यावर आले. यावेळी आसिफ आणि रिहान यांच्या रिक्षात पुढच्या सिटवर  बसण्यावरून वाद झाला. यावेळी चालकाने रिक्षा थांबविली आणि ते दोघे खाली उतरले. वाद विकोपाला गेला आणि रिहाने स्वत:जवळील चाकू काढून आसिफवर जोरात दोन वार केले. या घटनेत आसिफ रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. हे दृष्य पाहून त्याच्या सोबतचे मित्र घटनास्थळावरून पसार झाले.  घटनेची माहिती मिळताच जिन्सी ठाण्याचे उपनिरीक्षक दत्ता शेळके आणि डी.बी. पथकाच्या कर्मचाऱ्यांनी आसिफला घाटी रूग्णालयात दाखल केले.  अपघात विभागातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.  खूनाची घटना सिडको पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असून आरोपी जिन्सी परिसरातील आहे. 

आरोपीला पोलिसांकडूनअटकआरोपी शेख रिहान हा पळून जिल्हाधिकारी कार्यालय समोरून जात असल्याची माहिती मिळताच जिन्सी ठाण्याच्या पथकाने त्यास ताब्यात घेतले. यावेळी त्याच्या अंगावरील कपडे रक्ताने माखलेले दिसले. शिवाय घटनास्थळावरून चाकू पोलिसांनी जप्त केला आहे. 

घटनास्थळी तणाव : आसिफचा चाकूने भोसकून खून झाल्याचे कळताच आयपी मेस परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती. पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. तेथे तणावसदृष्य परिस्थीती निर्माण झाली होती.