शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

१ जानेवारीपासून युवक काँग्रेसचे ‘चलो पंचायत’ अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 23:50 IST

येत्या १ जानेवारीपासून महाराष्टÑात युवक काँग्रेसतर्फे ‘चलो पंचायत’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत युवक काँग्रेसचे कार्यकर्ते गावोगाव जातील. तेथील शेतकरी व युवकांच्या गाठीभेटी घेतील. त्यांची नोंदणी करून घेतील, अशी माहिती आज येथे प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी दिली.

ठळक मुद्दे‘राहुल गांधी बनून सत्ता आणण्यासाठी परिश्रम करण्याचे आवाहन

औरंगाबाद : येत्या १ जानेवारीपासून महाराष्टÑात युवक काँग्रेसतर्फे ‘चलो पंचायत’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत युवक काँग्रेसचे कार्यकर्ते गावोगाव जातील. तेथील शेतकरी व युवकांच्या गाठीभेटी घेतील. त्यांची नोंदणी करून घेतील, अशी माहिती आज येथे प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी दिली.आज मौलाना आझाद संशोधन केंद्र, मजनू हिल येथे युवक काँग्रेसची विभागीय बैठक झाली. या बैठकीतच मराठवाड्यासह अहमदनगर जिल्ह्याचे पदाधिकारी सहभागी झाले होते. सुमारे २५ हजार गावांमधून व ५०० शहरांमधून १० फेब्रुवारीपर्यंत हे अभियान राबविण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये तीन राज्यांत काँग्रेसची सत्ता आल्याने महाराष्टÑातही बदल घडणार असा आत्मविश्वास घेऊन युवक काँग्रेसमध्ये प्राण ओतण्याचे काम सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून या विभागीय बैठकीकडे पाहिले जात आहे.महाराष्टÑ युवक काँग्रेसच्या प्रभारी प्रतिभा रघुवंशी व सहप्रभारी मनीष चौधरी यांनी या बैठकीस मार्गदर्शन केले. बूथ कमिट्या स्थापन करतील, त्याच कार्यकर्त्यांना यापुढे पदे दिली जाणार असल्याचे मनीष चौधरी यांनी यावेळी जाहीर केले. विकास आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन आपल्याला आगामी निवडणुका जिंकायच्या असल्याचेही ते म्हणाले.प्रतिभा रघुवंशी यांनी सांगितले की, मध्यप्रदेशात ज्या युवक कार्यकर्त्यांना कसलीही राजकीय पार्श्वभूमी नाही, त्यांनी मंत्री असलेल्या उमेदवारांनाही पाडून दाखविले. आगामी निवडणुकांमध्ये राहुल गांधी यांचे हात मजबूत करावयाचे आहेत. त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने राहुल गांधी बनून जातीय व धर्मांध शक्तींना हरवण्यासाठी काम केले पाहिजे.१९७८ सालचे कार्यकर्ते बनून काँग्रेसला विजयी करण्यासाठी कटिबद्ध व्हा, असे आवाहन सत्यजित तांबे यांनी यावेळी केले. वाढती बेरोजगारी, युवकांच्या प्रश्नांकडे अक्षम्य दुर्लक्ष, रोजगार निर्मितीचे खोटे आश्वासन देणाºया भाजप सरकार विरोधात राष्टÑीय युवक काँग्रेसच्या वतीने कन्याकुमारी ते काश्मीर, अशी युवा क्रांती यात्रा आयोजित करण्यात आली आहे. ही यात्रा ८ ते ११ जानेवारी या दरम्यान महाराष्टÑातून जाणार आहे. मोदी सरकारने निराश केलेल्यांना धीर देऊन त्यांना भक्कम बनविण्याची भूमिका युवक काँग्रेस निभावत असल्याचे तांबे यांनी सांगितले. शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष मुजफ्फर खान, जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर, प्रभाकर मुठ्ठे पाटील, बाबासाहेब पवार, नागसेन भेरजे आदींनी या बैठकीच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारण