शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
2
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
3
लडाख: गलवान खोऱ्यात लष्करी वाहनावर दरड कोसळली, २ जवान शहीद, ३ जण गंभीर जखमी
4
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
5
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
6
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
7
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
8
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
9
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
10
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
11
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
12
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
13
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT
14
शाब्बास पोरा! शिक्षणासाठी केली फूड डिलिव्हरी, मजुराचा लेक होणार मोठा सरकारी अधिकारी
15
रिलायन्स जिओचा ५२,००० कोटींचा 'महा-आयपीओ'! मुकेश अंबानी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार?
16
सर्वत्र कर्मचारी कपात होत असतानाच 'ही' दिग्गज IT कंपनी करतेय हायरिंग; हजारो ग्रॅज्युएट्सना देणार संधी
17
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
18
ICC Rankings : अभिषेक शर्मा टी-२० चा नवा किंग; जड्डू टेस्टमधील बेस्ट ऑलराउंडर
19
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
20
५ वर्षांत ३०००% रिटर्न, पहिल्या तिमाहित नफाही दुप्पट; आता लागलं अपर सर्किट, ऑर्डर बुकही मजबूत

वाळूज येथून तरुण बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:11 IST

वाळूज महानगर : वाळूज येथून २१ वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या भावाने वाळूज पोलीस ठाण्यात दिली. शेख ...

वाळूज महानगर : वाळूज येथून २१ वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या भावाने वाळूज पोलीस ठाण्यात दिली.

शेख इम्रान शेख सलीम (वय २१, रा.भारतनगर, वाळूज) हा ४ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास आरटीओ कार्यालयात जाऊन येतो, असे म्हणून घराबाहेर पडला होता. मात्र, अद्यापपर्यंत इम्रान घरी परत आला नाही. त्याचा भाऊ शेख अलीम याने लहान भाऊ बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे. पोहेकॉ. एन. एम. मालोदे हे शोध घेत आहेत.

फोटो क्रमांक- शेख इम्रान

----------------------

साऊथसिटीत सुविधा पुरवा

वाळूज महानगर : साऊथसिटीत विविध नागरी सुविधा परविल्या जात नसल्याने नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. या परिसरातील बहुतांश रस्ते कच्चे असल्याने व रस्त्यावर खड्डे पडल्याने नागरिक व वाहनधारकांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागत आहे. मुख्य रस्त्यावरील अनेक ठिकाणी पथदिवे बंद असल्याने नागरिकांना अंधारातून ये-जा करावी लागते. स्वच्छतेकडे ग्रामपंचायत प्रशासन डोळेझाक करीत असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. या वसाहतीत किमान नागरी सुविधा पुरविण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

--------------------------

भारतनगरातील रस्ते झाले अरुंद

वाळूज महानगर : वाळूजच्या भारतनगरात अनेकांनी मुख्य रस्त्यालगत अतिक्रमण केल्यामुळे या भागातील रस्ते अरुंद झाले आहेत. या कामगार वसाहतीत अनेकांनी घरासमोरच टपऱ्या, छोटी दुकाने, हातगाड्यावर दुकाने थाटल्यामुळे वाहनधारक व नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. नागरिक त्यांची दुचाकी व चारचाकी वाहने रस्त्यावरच उभी करतात. कारवाई करण्याऐवजी ग्रामपंचायत प्रशासन अतिक्रमणांना अभय देत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

----------------------

खंडित वीजपुरवठ्याने नागरिक त्रस्त

वाळूज महानगर : पंढरपुरात सतत वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत. बुधवारी सायंकाळी या परिसरात पावसाने हजेरी लावल्यानंतर जवळपास अर्धा तास वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरण ग्राहकांना कुठलीही पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित करते. गावात सुरळीत वीजपुरवठा करण्याची मागणी शेख मन्सूर, एकनाथ कीर्तीकर आदींनी केली आहे.

-----------------------------

उद्योगनगरीत अ‍ॅपेचालकांची दादागिरी

वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीत अ‍ॅपेरिक्षाचालकांची दादागिरी वाढल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. बसथांब्यावर उभ्या असलेल्या प्रवाशांना अक्षरश: ओढतच चालक रिक्षामध्ये बसण्याचा आग्रह करतात. प्रवाशांनी रिक्षात बसण्यास नकार देताच त्यांना शिवीगाळ केली जाते. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी रिक्षात बसवून वेगाने चालविल्या जात असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. या मुजोर अ‍ॅपेरिक्षा चालकाविरुध्द कारवाई करण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे.

---------------------