शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

कारागृह उपमहानिरीक्षकांकडून योगेशच्या मृत्यूची चौकशी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 23:23 IST

न्यायालयीन बंदी योगेश रोहिदास राठोडच्या मृत्यूबाबत नातेवाईकांनी केलेले मारहाणीचे आरोप, शवविच्छेदन अहवाल आणि दाखल झालेल्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर जेल महासंचालक यांनी गंभीर दखल घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सोमवारी दुपारपासून चौकशी सुरू केली असून, आठ दिवसांत ही चौकशी पूर्ण होईल, अशी माहिती कारागृह मध्य विभागाचे उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांनी पत्रकारांना दिली.

ठळक मुद्देडीआयजी योगेश देसाई : आठ दिवसांत चौकशी पूर्ण करून महासंचालकांना अहवाल देणार, निष्पक्षपाती चौकशी करणार

औरंगाबाद : न्यायालयीन बंदी योगेश रोहिदास राठोडच्या मृत्यूबाबत नातेवाईकांनी केलेले मारहाणीचे आरोप, शवविच्छेदन अहवाल आणि दाखल झालेल्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर जेल महासंचालक यांनी गंभीर दखल घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सोमवारी दुपारपासून चौकशी सुरू केली असून, आठ दिवसांत ही चौकशी पूर्ण होईल, अशी माहिती कारागृह मध्य विभागाचे उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांनी पत्रकारांना दिली.देसाई म्हणाले की, १७ जानेवारी रोजी रात्री योगेश कारागृहात दाखल झाला आणि १८ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता त्याला बेशुद्धावस्थेत घाटी रुग्णालयात दाखल केले गेले. या काळात योगेशशी ज्यांचा संबंध आला त्या सर्वांची चौकशी केली जात आहे. योगेश कारागृहात आला त्यावेळी कामावर उपस्थित अधिकारी- कर्मचारी, त्याला ठेवण्यात आलेल्या बॅरेक क्रमांक एकच्या सुरक्षेसाठी हजर अधिकारी -कर्मचारी आणि बॅरेकमध्ये त्या दिवशी ठेवलेल्या सुमारे ३० कैद्यांचे जबाब नोंदविले जाणार आहेत. कारागृह प्रशासनाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार योगेशला दारूचे व्यसन होते. शिवाय त्याला कारागृहात दाखल केल्यानंतर फिटस्चा त्रास सुरू झाला होता. त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचेही जबाब नोंदविले जाणार आहेत. चौकशीला आज सुरुवात झाली. सुमारे आठ दिवसांत चौकशी पूर्ण होईल आणि चौकशीचा गोपनीय अहवाल महासंचालकांना पाठविण्यात येईल.चौकशीत दोषी आढळले तरच कारवाईसंशयित अधिकारी-कर्मचारी कामावर असताना चौकशीवर परिणाम होणार नाही का, या प्रश्नाचे उत्तर देताना उपमहानिरीक्षक देसाई म्हणाले की, चौकशीत जोपर्यंत कोणताही अधिकारी, कर्मचारी दोषी आढळत नाही, तोपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई करता येणार नाही. शिवाय पोलीस प्रशासन गुन्ह्याच्या अँगलने तपास करीत आहे आणि न्यायालयीन चौकशीही होणार आहे. या सर्व चौकशींचे रिपोर्ट मानवी हक्क आयोगाला सादर होतात. त्यामुळे ही चौकशी पारदर्शक होणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.केवळ कॅमेरे सुरू, रेकॉर्डिंग होत नाही....हर्सूल मध्यवर्ती कारागृहातील सीसीटीव्ही हे राज्यातील अन्य कारागृहांच्या मानांकनानुसार नाहीत. विजेचा दाब कमी-जास्त झाला की, सीसीटीव्हीची हार्ड डिस्क करप्ट होते. केवळ कॅमेरे सुरू असल्याचे दिसते, त्यांचे रेकॉर्डिंग होत नसल्याचे त्यांनी सांगितले. सीसीटीव्ही बंद असणे ही तांत्रिक बाब असल्याचे देसाई यांनी नमूद केले. सीसीटीव्ही सुरू असते तर सर्व काही स्पष्टपणे दिसले असते. आमच्या चौकशीचीही गरज राहिली नसती, असे ते म्हणाले.----

टॅग्स :Deathमृत्यूjailतुरुंग