शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

वर्षभरापासूनची प्रतीक्षा संपली; जालना रोडच्या कामाला अखेर मुहूर्त सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 19:27 IST

जालना रस्त्यावरील वाहतुकीचा भार कमी झाला असला तरी वाहनांची मोठी संख्या, ठिकठिकाणी झालेल्या अतिक्रमणांमुळे जालना रस्ता अरुंद झाला आहे. 

ठळक मुद्देभूगर्भ तपासणीसह अन्य तपासणीची कामे पूर्ण हैदराबाद येथील सृष्टी कंपनीला या रस्त्याच्या दुरुस्तीचे कंत्राट मिळाले आहे.

औरंगाबाद : शहरात सर्वाधिक रहदारीचा असलेल्या जालना रस्त्याच्या कामाला एकदाचा मुहूर्त सापडला आहे. रस्ता मजबुतीकरणासाठी आवश्यक ते सर्वेक्षण, विविध चाचण्या व भूगर्भ तपासणी पूर्ण झाली असून साधारणपणे १८ किंवा १९ मार्चपासून रस्त्याच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.

जालना रस्त्यावर चोवीस तास मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. आता मजबुतीकरणाच्या कामामुळे वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे. ती टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांनी पर्यायी रस्ते वाहतुकीसाठी उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. या रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी ‘एनएचएआय’ने ७४ कोटी मंजूर केले. या निधीतून फक्त मजबुतीकरणाचे काम होईल. जालना रस्त्याच्या रुंदीकरणासाठी जागा उपलब्ध नाही. जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. रस्ता रुंदीकरणात ज्या मालमत्ता संपादित करावयाच्या आहेत, त्याचा मावेजा कोणी द्यायचा? रस्त्याखालील जलवाहिन्या, मलनि:सारण वाहिन्या, टेलिफोन केबल काढून त्या इतरत्र शिफ्ट करणे या कामांसाठी लागणारा निधी व वेळ याची सांगड बसत नाही. त्यामुळे केवळ रस्ता मजबुतीकरणासाठी हा निधी मंजूर झाला आहे. 

हे काम १८ महिन्यांत पूर्ण करण्याची मुदत असली, तरी या रस्त्याच्या कामाची निविदा प्रक्रिया तांत्रिक मान्यता तसेच लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमध्ये सात-आठ महिने रखडली. अलीकडेच हैदराबाद येथील सृष्टी कंपनीला या रस्त्याच्या दुरुस्तीचे कंत्राट मिळाले आहे. जालना रस्त्यावर एकूण पाच उड्डाणपूल आहेत. हे पूल देखभाल दुरुस्तीसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे येतात. त्यामुळे या एकाच रस्त्यासाठी चार वेगवेगळ्या एजन्सी असल्याने तांत्रिक मंजुरीला विलंब लागला. दोन महिन्यांपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण झाली व गेल्या महिन्यात रस्त्याच्या सर्वेक्षण, भूगर्भ तपासणीला सुरुवात झाली. 

अतिक्रमण : रस्ता अरुंदलोकप्रतिनिधींनी या रस्त्याच्या मजबुतीकरणाऐवजी विस्तारीकरणासाठी आग्रह धरला होता. मात्र, त्यासाठी मोठा निधी लागतो. तत्कालीन राज्य सरकारकडून निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे हा रस्ता ‘एनएचएआय’कडे देण्यात आला. जालना रस्त्यावर मोठी वाहतूक आहे. बीड बायपासवरून जालना, नांदेड, विदर्भातून औरंगाबादेत येणारी वाहने जातात. यामुळे जालना रस्त्यावरील वाहतुकीचा भार कमी झाला असला तरी वाहनांची मोठी संख्या, ठिकठिकाणी झालेल्या अतिक्रमणांमुळे जालना रस्ता अरुंद झाला आहे. 

जालना रस्त्याच्या एकवेळ सुधारण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे शासनाने काम दिले आहे. या रस्त्याच्या मजबुतीकरणाबाबत तांत्रिक तपासणी, भूगर्भ चाचणी पूर्ण झाली आहे. कामाची प्रत्यक्ष सुरुवात पुढील आठवड्यापासून होईल.-अजय गाडेकर, प्रकल्प अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादroad safetyरस्ते सुरक्षाfundsनिधी