शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
3
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
4
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
5
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
6
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
7
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
8
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
9
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
10
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
11
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
12
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
13
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
14
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
15
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
16
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
17
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
18
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
19
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
20
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरापासूनची प्रतीक्षा संपली; जालना रोडच्या कामाला अखेर मुहूर्त सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 19:27 IST

जालना रस्त्यावरील वाहतुकीचा भार कमी झाला असला तरी वाहनांची मोठी संख्या, ठिकठिकाणी झालेल्या अतिक्रमणांमुळे जालना रस्ता अरुंद झाला आहे. 

ठळक मुद्देभूगर्भ तपासणीसह अन्य तपासणीची कामे पूर्ण हैदराबाद येथील सृष्टी कंपनीला या रस्त्याच्या दुरुस्तीचे कंत्राट मिळाले आहे.

औरंगाबाद : शहरात सर्वाधिक रहदारीचा असलेल्या जालना रस्त्याच्या कामाला एकदाचा मुहूर्त सापडला आहे. रस्ता मजबुतीकरणासाठी आवश्यक ते सर्वेक्षण, विविध चाचण्या व भूगर्भ तपासणी पूर्ण झाली असून साधारणपणे १८ किंवा १९ मार्चपासून रस्त्याच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.

जालना रस्त्यावर चोवीस तास मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. आता मजबुतीकरणाच्या कामामुळे वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे. ती टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांनी पर्यायी रस्ते वाहतुकीसाठी उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. या रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी ‘एनएचएआय’ने ७४ कोटी मंजूर केले. या निधीतून फक्त मजबुतीकरणाचे काम होईल. जालना रस्त्याच्या रुंदीकरणासाठी जागा उपलब्ध नाही. जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. रस्ता रुंदीकरणात ज्या मालमत्ता संपादित करावयाच्या आहेत, त्याचा मावेजा कोणी द्यायचा? रस्त्याखालील जलवाहिन्या, मलनि:सारण वाहिन्या, टेलिफोन केबल काढून त्या इतरत्र शिफ्ट करणे या कामांसाठी लागणारा निधी व वेळ याची सांगड बसत नाही. त्यामुळे केवळ रस्ता मजबुतीकरणासाठी हा निधी मंजूर झाला आहे. 

हे काम १८ महिन्यांत पूर्ण करण्याची मुदत असली, तरी या रस्त्याच्या कामाची निविदा प्रक्रिया तांत्रिक मान्यता तसेच लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमध्ये सात-आठ महिने रखडली. अलीकडेच हैदराबाद येथील सृष्टी कंपनीला या रस्त्याच्या दुरुस्तीचे कंत्राट मिळाले आहे. जालना रस्त्यावर एकूण पाच उड्डाणपूल आहेत. हे पूल देखभाल दुरुस्तीसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे येतात. त्यामुळे या एकाच रस्त्यासाठी चार वेगवेगळ्या एजन्सी असल्याने तांत्रिक मंजुरीला विलंब लागला. दोन महिन्यांपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण झाली व गेल्या महिन्यात रस्त्याच्या सर्वेक्षण, भूगर्भ तपासणीला सुरुवात झाली. 

अतिक्रमण : रस्ता अरुंदलोकप्रतिनिधींनी या रस्त्याच्या मजबुतीकरणाऐवजी विस्तारीकरणासाठी आग्रह धरला होता. मात्र, त्यासाठी मोठा निधी लागतो. तत्कालीन राज्य सरकारकडून निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे हा रस्ता ‘एनएचएआय’कडे देण्यात आला. जालना रस्त्यावर मोठी वाहतूक आहे. बीड बायपासवरून जालना, नांदेड, विदर्भातून औरंगाबादेत येणारी वाहने जातात. यामुळे जालना रस्त्यावरील वाहतुकीचा भार कमी झाला असला तरी वाहनांची मोठी संख्या, ठिकठिकाणी झालेल्या अतिक्रमणांमुळे जालना रस्ता अरुंद झाला आहे. 

जालना रस्त्याच्या एकवेळ सुधारण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे शासनाने काम दिले आहे. या रस्त्याच्या मजबुतीकरणाबाबत तांत्रिक तपासणी, भूगर्भ चाचणी पूर्ण झाली आहे. कामाची प्रत्यक्ष सुरुवात पुढील आठवड्यापासून होईल.-अजय गाडेकर, प्रकल्प अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादroad safetyरस्ते सुरक्षाfundsनिधी