शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

यंदा एकाही पदाची भरती अशक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 23:56 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १ फेब्रुवारी रोजी स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व सद्य:स्थिती जाहीर केली आहे. यात २०१८ या वर्षात ‘एमपीएससी’तर्फे भरण्यात येणाºया जागांसाठी राज्य सरकारने मागणीपत्रच दिलेले नाही. यामुळे यंदा महत्त्वाच्या पदांच्या जागा निघणे अवघड असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देबेरोजगारांची खदखद : ‘एमपीएससी’तर्फे स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर

राम शिनगारे ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १ फेब्रुवारी रोजी स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व सद्य:स्थिती जाहीर केली आहे. यात २०१८ या वर्षात ‘एमपीएससी’तर्फे भरण्यात येणाºया जागांसाठी राज्य सरकारने मागणीपत्रच दिलेले नाही. यामुळे यंदा महत्त्वाच्या पदांच्या जागा निघणे अवघड असल्याचे स्पष्ट झाले आहे.राज्य सरकारने पदभरतीची मागणी केल्यानंतरच ‘एमपीएससी’तर्फे जागा भरतीची प्रक्रिया राबविली जाते. ही प्रक्रिया साधारणपणे १७ ते १८ महिन्यांपर्यंत चालते. यातच न्यायालयात काही प्रश्न उपस्थित झाले, तर याला आणखी उशीर होतो. यामुळे विविध पदांच्या वर्षातून दोन वेळा जागा निघणे अपेक्षित असते. मात्र, सरकारने पदभरतीवर घातलेल्या बंदीचा फटका ‘एमपीएससी’तर्फे भरण्यात येणाºया पदांनाही बसला आहे. आगामी आर्थिक वर्षात जरी भरतीवरील बंदी उठवली तरी ‘एमपीएससी’तर्फे होणाºया पदभरतींना मूर्तस्वरूप २०१९ मध्येच येणार आहे. यातही लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका वेगवेगळ्या जाहीर झाल्यास अचारसंहितेमुळे जागांची भरती काढता येणार नाही. राज्य सरकारने मागणी केल्यानुसार ‘एमपीएससी’तर्फे २९ डिसेंबर २०१७ रोजी राज्यसेवा परीक्षांची जाहिरात दिली आहे. यात केवळ ६९ जागांचा समावेश आहे. यासाठी ८ एप्रिलला पूर्वपरीक्षा आणि १८, १९ व २० आॅगस्ट रोजी मुख्य परीक्षा घेण्याचे वेळापत्रकानुसार प्रस्तावित आहे. यात मुख्य परीक्षा झाल्यानंतर निकाल लावून मुलाखती आणि अंतिम निकालासाठी २०१९ हे सालच उजाडणार आहे. याचा फटकाही परीक्षांची तयारी करणाºया युवकांना बसत आहे. तसेच राज्य सरकारने पीएसआय, एसटीआय, एएसओ, अभियांत्रिकी, मोटार वाहन निरीक्षक, कृषिसेवा पदांसाठी चालू वर्षात मागणी नोंदविली नसल्यामुळे परीक्षा कधी होणार याविषयी अद्यापही निश्चित असे काहीच ठरलेले नाही.या परीक्षांचे निकाल पेंडिंग‘एमपीएससी’तर्फे ७ डिसेंबर २०१६ रोजी पीएसआयसाठी जाहिरात देण्यात आली. यापरीक्षेच्या पूर्व, मुख्य परीक्षा आणि मुलाखती झाल्या आहेत. मात्र, अद्यापही अंतिम निकाल जाहीर झालेला नाही. राज्यसेवेसाठी १४ डिसेंबर २०१६ रोजी जाहिरात दिली. याची केवळ पूर्व, मुख्य परीक्षा घेतली. मुख्य परीक्षेचा अद्यापही निकाल लागला नाही. विभागांतर्गत पीएसआयची जाहिरात १४ जून २०१७ रोजी दिली. हीसुद्धा पेंडिंगच आहे. सहायक मोटार वाहन निरीक्षकपदासाठी ३० जानेवारी २०१७ रोजी जाहिरात प्रसिद्ध झाली. यात मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर नाही. लिपिक, टंकलेखकसाठी ६ एप्रिल २०१७ रोजी जाहिरात आली. यात मुख्य परीक्षेचा निकाल पेंडिंग. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पदासाठी १५ मार्च २०१७ रोजी जाहिरातीमधील मुलाखती बाकी. महाराष्ट्र वनसेवा परीक्षेची जाहिरात ६ एप्रिल २०१७ रोजी आली. यात अंतिम निकाल बाकी आहे. याशिवाय इतरही अनेक परीक्षांचे २०१६ पासून भिजत घोंगडे तसेच पडलेले आहे. अनेक परीक्षांची प्रक्रिया अर्ध्यावरच आहे. याचे परिणाम बेरोजगार युवकांना भोगावे लागत आहेत.तामिळनाडू पॅटर्न लागू करण्याची मागणीतामिळनाडू राज्यात लोकसेवा आयोगातर्फे विविध पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येते. यात पदांची जाहिरात देतानाच पूर्वपरीक्षा, तिचा निकाल, मुख्य परीक्षा, त्या परीक्षेचा निकाल आणि अंतिम निकाल यांचे वेळापत्रक परीक्षेपूर्वी जाहीर केले जाते. अंतिम निकालानंतर निवड झालेल्यांना सेवेत दाखल करण्याचा दिनांकही जाहीर करण्यात येतो.तामिळनाडू राज्यात स्पर्धा परीक्षांसंदर्भात सर्व गोष्टी अगोदरच स्पष्ट असल्यामुळे कोणत्याही अडचणी निर्माण होत नाहीत. युवकांना निश्चित वेळेत अभ्यास करता येतो. हाच पॅटर्न महाराष्ट्रातही लागू झाला पाहिजे, अशी युवकांची मागणी आहे. याउलट महाराष्ट्रात जाहिरात प्रकाशित झाल्यानंतर परीक्षेची प्रक्रिया आणि अंतिम निकालास १६ ते १७ महिने लागतात. यानंतर यशस्वी उमेदवारांना प्रत्यक्षात सेवेत रुजू होण्यास तब्बल एक ते दोन वर्षे लागतात. हा मुख्य फरक दोन्ही राज्यांतील लोकसेवा आयोगात आहे.उद्याच्या अंकातमागील चार वर्षांत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने भरलेल्या जागा आणि राज्यातील सर्व विभागांमध्ये रिक्त पदांची संख्या.