शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
3
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
5
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
6
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
7
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
8
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
9
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
10
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
11
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
12
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
13
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
14
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
15
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
16
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
17
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
18
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
19
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
20
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात

यंदा एकाही पदाची भरती अशक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 23:56 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १ फेब्रुवारी रोजी स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व सद्य:स्थिती जाहीर केली आहे. यात २०१८ या वर्षात ‘एमपीएससी’तर्फे भरण्यात येणाºया जागांसाठी राज्य सरकारने मागणीपत्रच दिलेले नाही. यामुळे यंदा महत्त्वाच्या पदांच्या जागा निघणे अवघड असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देबेरोजगारांची खदखद : ‘एमपीएससी’तर्फे स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर

राम शिनगारे ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १ फेब्रुवारी रोजी स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व सद्य:स्थिती जाहीर केली आहे. यात २०१८ या वर्षात ‘एमपीएससी’तर्फे भरण्यात येणाºया जागांसाठी राज्य सरकारने मागणीपत्रच दिलेले नाही. यामुळे यंदा महत्त्वाच्या पदांच्या जागा निघणे अवघड असल्याचे स्पष्ट झाले आहे.राज्य सरकारने पदभरतीची मागणी केल्यानंतरच ‘एमपीएससी’तर्फे जागा भरतीची प्रक्रिया राबविली जाते. ही प्रक्रिया साधारणपणे १७ ते १८ महिन्यांपर्यंत चालते. यातच न्यायालयात काही प्रश्न उपस्थित झाले, तर याला आणखी उशीर होतो. यामुळे विविध पदांच्या वर्षातून दोन वेळा जागा निघणे अपेक्षित असते. मात्र, सरकारने पदभरतीवर घातलेल्या बंदीचा फटका ‘एमपीएससी’तर्फे भरण्यात येणाºया पदांनाही बसला आहे. आगामी आर्थिक वर्षात जरी भरतीवरील बंदी उठवली तरी ‘एमपीएससी’तर्फे होणाºया पदभरतींना मूर्तस्वरूप २०१९ मध्येच येणार आहे. यातही लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका वेगवेगळ्या जाहीर झाल्यास अचारसंहितेमुळे जागांची भरती काढता येणार नाही. राज्य सरकारने मागणी केल्यानुसार ‘एमपीएससी’तर्फे २९ डिसेंबर २०१७ रोजी राज्यसेवा परीक्षांची जाहिरात दिली आहे. यात केवळ ६९ जागांचा समावेश आहे. यासाठी ८ एप्रिलला पूर्वपरीक्षा आणि १८, १९ व २० आॅगस्ट रोजी मुख्य परीक्षा घेण्याचे वेळापत्रकानुसार प्रस्तावित आहे. यात मुख्य परीक्षा झाल्यानंतर निकाल लावून मुलाखती आणि अंतिम निकालासाठी २०१९ हे सालच उजाडणार आहे. याचा फटकाही परीक्षांची तयारी करणाºया युवकांना बसत आहे. तसेच राज्य सरकारने पीएसआय, एसटीआय, एएसओ, अभियांत्रिकी, मोटार वाहन निरीक्षक, कृषिसेवा पदांसाठी चालू वर्षात मागणी नोंदविली नसल्यामुळे परीक्षा कधी होणार याविषयी अद्यापही निश्चित असे काहीच ठरलेले नाही.या परीक्षांचे निकाल पेंडिंग‘एमपीएससी’तर्फे ७ डिसेंबर २०१६ रोजी पीएसआयसाठी जाहिरात देण्यात आली. यापरीक्षेच्या पूर्व, मुख्य परीक्षा आणि मुलाखती झाल्या आहेत. मात्र, अद्यापही अंतिम निकाल जाहीर झालेला नाही. राज्यसेवेसाठी १४ डिसेंबर २०१६ रोजी जाहिरात दिली. याची केवळ पूर्व, मुख्य परीक्षा घेतली. मुख्य परीक्षेचा अद्यापही निकाल लागला नाही. विभागांतर्गत पीएसआयची जाहिरात १४ जून २०१७ रोजी दिली. हीसुद्धा पेंडिंगच आहे. सहायक मोटार वाहन निरीक्षकपदासाठी ३० जानेवारी २०१७ रोजी जाहिरात प्रसिद्ध झाली. यात मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर नाही. लिपिक, टंकलेखकसाठी ६ एप्रिल २०१७ रोजी जाहिरात आली. यात मुख्य परीक्षेचा निकाल पेंडिंग. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पदासाठी १५ मार्च २०१७ रोजी जाहिरातीमधील मुलाखती बाकी. महाराष्ट्र वनसेवा परीक्षेची जाहिरात ६ एप्रिल २०१७ रोजी आली. यात अंतिम निकाल बाकी आहे. याशिवाय इतरही अनेक परीक्षांचे २०१६ पासून भिजत घोंगडे तसेच पडलेले आहे. अनेक परीक्षांची प्रक्रिया अर्ध्यावरच आहे. याचे परिणाम बेरोजगार युवकांना भोगावे लागत आहेत.तामिळनाडू पॅटर्न लागू करण्याची मागणीतामिळनाडू राज्यात लोकसेवा आयोगातर्फे विविध पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येते. यात पदांची जाहिरात देतानाच पूर्वपरीक्षा, तिचा निकाल, मुख्य परीक्षा, त्या परीक्षेचा निकाल आणि अंतिम निकाल यांचे वेळापत्रक परीक्षेपूर्वी जाहीर केले जाते. अंतिम निकालानंतर निवड झालेल्यांना सेवेत दाखल करण्याचा दिनांकही जाहीर करण्यात येतो.तामिळनाडू राज्यात स्पर्धा परीक्षांसंदर्भात सर्व गोष्टी अगोदरच स्पष्ट असल्यामुळे कोणत्याही अडचणी निर्माण होत नाहीत. युवकांना निश्चित वेळेत अभ्यास करता येतो. हाच पॅटर्न महाराष्ट्रातही लागू झाला पाहिजे, अशी युवकांची मागणी आहे. याउलट महाराष्ट्रात जाहिरात प्रकाशित झाल्यानंतर परीक्षेची प्रक्रिया आणि अंतिम निकालास १६ ते १७ महिने लागतात. यानंतर यशस्वी उमेदवारांना प्रत्यक्षात सेवेत रुजू होण्यास तब्बल एक ते दोन वर्षे लागतात. हा मुख्य फरक दोन्ही राज्यांतील लोकसेवा आयोगात आहे.उद्याच्या अंकातमागील चार वर्षांत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने भरलेल्या जागा आणि राज्यातील सर्व विभागांमध्ये रिक्त पदांची संख्या.