शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
4
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
5
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
6
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
7
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
8
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
9
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
10
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
11
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
12
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
13
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
14
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
15
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
16
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
17
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
18
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
19
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
20
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!

दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या, पण आता पुढे काय ?; मुलांच्या आकलनावर प्रश्नचिन्ह कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 19:11 IST

गेल्या वर्षी अनेक ठिकाणी नववीच्याही सहामाहीच परीक्षा झाल्या. त्यावरच मूल्यांकन होऊन तेच विद्यार्थी थेट दहावीत आले.

ठळक मुद्देमूल्यमापन कशावर आधारित आहेमूल्यमापन परीक्षेशिवाय अशक्य पुढील शिक्षणाचा निर्णय कसा

औरंगाबाद : कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने दहावीची परीक्षा रद्द केली. परीक्षेची नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनावर त्यांना उत्तीर्ण केले जाणार आहे. मात्र, नववीतही परीक्षा न होता थेट दहावीत आले. आताही परीक्षा न घेण्याचा निर्णय झाल्याने थेट बारावी बोर्डाच्या परीक्षेलाच हे विद्यार्थी सामोरे जातील. विद्यार्थी परीक्षेचे टेन्शन गेल्याने काहीसे सुखावले असले तरी पालक मात्र पुढे काय शिकवावे याबद्दल धास्तावलेले आहेत.

जिल्ह्यात १०३२ शाळेत ७० हजार विद्यार्थी शिकत आहेत. त्यापैकी ६५ हजार ११ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरले. मात्र, महामारीच्या काळात आरोग्यालाही महत्त्व देणे क्रमप्राप्त असल्याने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या गेल्या. दहावी विद्यार्थ्यांचा टर्निंग पाॅईंट आहे. वर्षभर ऑनलाइन शिक्षणातून पदरी काय पडले याची कल्पना न घेता परीक्षा न घेता मूल्यमापन कसे होईल, असा प्रश्न पालकांना पडला आहे. गेल्या वर्षी अनेक ठिकाणी नववीच्याही सहामाहीच परीक्षा झाल्या. त्यावरच मूल्यांकन होऊन तेच विद्यार्थी थेट दहावीत आले. आता वर्षभर ऑनलाइन शिकले. काही काळ वर्ग भरले. त्यातही शंका समाधान करण्यात वेळ गेला. त्यातही निम्मे अधिक विद्यार्थी वर्गातच आले नाही. त्यामुळे दहावीतून पुढे गेल्यावर थेट बारावीच्या परीक्षेला सामोरे जातांना या विद्यार्थ्यांवर दडपण येईल, अशी भीती पालकांसह शिक्षकांतून व्यक्त होत आहे. तर परीक्षा लगेच रद्द न करता काही काळ प्रतीक्षा करणे सोयीस्कर ठरले असते, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

मूल्यमापन कशावर आधारित आहेदहावीची परीक्षा रद्द झाल्याने अंतर्गत मूल्यामापन होईल. त्यावर समाधानी नसलेल्यांना गुण सुधारण्याची संधी दिल्या जाणार असल्याचे सांगण्यात येते. मात्र, मूल्यमापन कशावर आधारित आहे. हेच अद्याप कळालेले नाही. जे शिकायचे राहून गेले ते विद्यार्थ्यांना शिकवण्याची काय सोय असणार हाही प्रश्नच आहे.- संगीता गायकवाड, पालक

मूल्यमापन परीक्षेशिवाय अशक्य अभ्यासक्रमाचे महत्त्व असतेच. विद्यार्थांना किती आकलन झाले. याचे मूल्यमापन परीक्षेशिवाय अशक्य वाटते. त्यामुळे दहावीच्या परीक्षा व्हायला पाहिजे होत्या. मात्र, कोरोनामुळे अडचणी आहे. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यावर तरी विद्यार्थी काय शिकले काय नाही. हे समजलं तर त्यांचा कल कळू शकेल.- संतोष अहिरे, पालक

पुढील शिक्षणाचा निर्णय कसामुलगी दहावीत शिकतेय. ती काय? शिकली? तिला काही येते काय? हे परीक्षेवरूनच कळले असते. परीक्षा रद्द झाली ठीक आहे. पण पुढे काय? त्यांच्या पुढील शिक्षणाचा निर्णय कसा घ्यावा. या सर्वांत मुलांचे खूप नुकसान होणार आहे. दहावी हा पाया असतो. तोच कच्चा राहिला तर पुढे काय? होईल याची चिंता वाटते.- राधा पुसे, पालक

दोन वर्गांना जोडणारा ब्रीज कोर्स व्हावानववीतून थेट दहावीत आणि आता थेट अकरावीत जाणाऱ्या या बॅचबद्दल चिंता वाटते. शिक्षणात डावा आणि उजवा विद्यार्थी ठरणे गरजेचे आहे. ते परीक्षेतूनच ठरू शकते. तरी दोन वर्गांना जोडणारा दुवा म्हणून एखादा दोन-तीन महिन्यांचा ब्रीज कोर्स झाला पाहिजे. त्यातून शिकायचे राहिलेला अभ्यासक्रम विद्यार्थी शिकतील. परीक्षा रद्दचा निर्णय जाहीर करण्याची घाई व्हायला नको होती. आता मूल्यमापन योग्य होण्यासाठी योग्य पद्धत अवलंबली पाहिजे. दहावीत परीक्षेला सामोरे न गेलेले विद्यार्थी थेट बारावीच्या बोर्ड परीक्षेला सामोरे जातील, त्यावेळी त्यांच्यावर दडपण येणार नाही यासाठीही उपाययोजना आतापासून व्हायला पाहिजे.-अनिल देशमुख, मुख्याध्यापक, गणोरी

टॅग्स :examपरीक्षाAurangabadऔरंगाबादEducationशिक्षण