शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या, पण आता पुढे काय ?; मुलांच्या आकलनावर प्रश्नचिन्ह कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 19:11 IST

गेल्या वर्षी अनेक ठिकाणी नववीच्याही सहामाहीच परीक्षा झाल्या. त्यावरच मूल्यांकन होऊन तेच विद्यार्थी थेट दहावीत आले.

ठळक मुद्देमूल्यमापन कशावर आधारित आहेमूल्यमापन परीक्षेशिवाय अशक्य पुढील शिक्षणाचा निर्णय कसा

औरंगाबाद : कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने दहावीची परीक्षा रद्द केली. परीक्षेची नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनावर त्यांना उत्तीर्ण केले जाणार आहे. मात्र, नववीतही परीक्षा न होता थेट दहावीत आले. आताही परीक्षा न घेण्याचा निर्णय झाल्याने थेट बारावी बोर्डाच्या परीक्षेलाच हे विद्यार्थी सामोरे जातील. विद्यार्थी परीक्षेचे टेन्शन गेल्याने काहीसे सुखावले असले तरी पालक मात्र पुढे काय शिकवावे याबद्दल धास्तावलेले आहेत.

जिल्ह्यात १०३२ शाळेत ७० हजार विद्यार्थी शिकत आहेत. त्यापैकी ६५ हजार ११ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरले. मात्र, महामारीच्या काळात आरोग्यालाही महत्त्व देणे क्रमप्राप्त असल्याने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या गेल्या. दहावी विद्यार्थ्यांचा टर्निंग पाॅईंट आहे. वर्षभर ऑनलाइन शिक्षणातून पदरी काय पडले याची कल्पना न घेता परीक्षा न घेता मूल्यमापन कसे होईल, असा प्रश्न पालकांना पडला आहे. गेल्या वर्षी अनेक ठिकाणी नववीच्याही सहामाहीच परीक्षा झाल्या. त्यावरच मूल्यांकन होऊन तेच विद्यार्थी थेट दहावीत आले. आता वर्षभर ऑनलाइन शिकले. काही काळ वर्ग भरले. त्यातही शंका समाधान करण्यात वेळ गेला. त्यातही निम्मे अधिक विद्यार्थी वर्गातच आले नाही. त्यामुळे दहावीतून पुढे गेल्यावर थेट बारावीच्या परीक्षेला सामोरे जातांना या विद्यार्थ्यांवर दडपण येईल, अशी भीती पालकांसह शिक्षकांतून व्यक्त होत आहे. तर परीक्षा लगेच रद्द न करता काही काळ प्रतीक्षा करणे सोयीस्कर ठरले असते, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

मूल्यमापन कशावर आधारित आहेदहावीची परीक्षा रद्द झाल्याने अंतर्गत मूल्यामापन होईल. त्यावर समाधानी नसलेल्यांना गुण सुधारण्याची संधी दिल्या जाणार असल्याचे सांगण्यात येते. मात्र, मूल्यमापन कशावर आधारित आहे. हेच अद्याप कळालेले नाही. जे शिकायचे राहून गेले ते विद्यार्थ्यांना शिकवण्याची काय सोय असणार हाही प्रश्नच आहे.- संगीता गायकवाड, पालक

मूल्यमापन परीक्षेशिवाय अशक्य अभ्यासक्रमाचे महत्त्व असतेच. विद्यार्थांना किती आकलन झाले. याचे मूल्यमापन परीक्षेशिवाय अशक्य वाटते. त्यामुळे दहावीच्या परीक्षा व्हायला पाहिजे होत्या. मात्र, कोरोनामुळे अडचणी आहे. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यावर तरी विद्यार्थी काय शिकले काय नाही. हे समजलं तर त्यांचा कल कळू शकेल.- संतोष अहिरे, पालक

पुढील शिक्षणाचा निर्णय कसामुलगी दहावीत शिकतेय. ती काय? शिकली? तिला काही येते काय? हे परीक्षेवरूनच कळले असते. परीक्षा रद्द झाली ठीक आहे. पण पुढे काय? त्यांच्या पुढील शिक्षणाचा निर्णय कसा घ्यावा. या सर्वांत मुलांचे खूप नुकसान होणार आहे. दहावी हा पाया असतो. तोच कच्चा राहिला तर पुढे काय? होईल याची चिंता वाटते.- राधा पुसे, पालक

दोन वर्गांना जोडणारा ब्रीज कोर्स व्हावानववीतून थेट दहावीत आणि आता थेट अकरावीत जाणाऱ्या या बॅचबद्दल चिंता वाटते. शिक्षणात डावा आणि उजवा विद्यार्थी ठरणे गरजेचे आहे. ते परीक्षेतूनच ठरू शकते. तरी दोन वर्गांना जोडणारा दुवा म्हणून एखादा दोन-तीन महिन्यांचा ब्रीज कोर्स झाला पाहिजे. त्यातून शिकायचे राहिलेला अभ्यासक्रम विद्यार्थी शिकतील. परीक्षा रद्दचा निर्णय जाहीर करण्याची घाई व्हायला नको होती. आता मूल्यमापन योग्य होण्यासाठी योग्य पद्धत अवलंबली पाहिजे. दहावीत परीक्षेला सामोरे न गेलेले विद्यार्थी थेट बारावीच्या बोर्ड परीक्षेला सामोरे जातील, त्यावेळी त्यांच्यावर दडपण येणार नाही यासाठीही उपाययोजना आतापासून व्हायला पाहिजे.-अनिल देशमुख, मुख्याध्यापक, गणोरी

टॅग्स :examपरीक्षाAurangabadऔरंगाबादEducationशिक्षण