शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या, पण आता पुढे काय ?; मुलांच्या आकलनावर प्रश्नचिन्ह कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 19:11 IST

गेल्या वर्षी अनेक ठिकाणी नववीच्याही सहामाहीच परीक्षा झाल्या. त्यावरच मूल्यांकन होऊन तेच विद्यार्थी थेट दहावीत आले.

ठळक मुद्देमूल्यमापन कशावर आधारित आहेमूल्यमापन परीक्षेशिवाय अशक्य पुढील शिक्षणाचा निर्णय कसा

औरंगाबाद : कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने दहावीची परीक्षा रद्द केली. परीक्षेची नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनावर त्यांना उत्तीर्ण केले जाणार आहे. मात्र, नववीतही परीक्षा न होता थेट दहावीत आले. आताही परीक्षा न घेण्याचा निर्णय झाल्याने थेट बारावी बोर्डाच्या परीक्षेलाच हे विद्यार्थी सामोरे जातील. विद्यार्थी परीक्षेचे टेन्शन गेल्याने काहीसे सुखावले असले तरी पालक मात्र पुढे काय शिकवावे याबद्दल धास्तावलेले आहेत.

जिल्ह्यात १०३२ शाळेत ७० हजार विद्यार्थी शिकत आहेत. त्यापैकी ६५ हजार ११ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरले. मात्र, महामारीच्या काळात आरोग्यालाही महत्त्व देणे क्रमप्राप्त असल्याने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या गेल्या. दहावी विद्यार्थ्यांचा टर्निंग पाॅईंट आहे. वर्षभर ऑनलाइन शिक्षणातून पदरी काय पडले याची कल्पना न घेता परीक्षा न घेता मूल्यमापन कसे होईल, असा प्रश्न पालकांना पडला आहे. गेल्या वर्षी अनेक ठिकाणी नववीच्याही सहामाहीच परीक्षा झाल्या. त्यावरच मूल्यांकन होऊन तेच विद्यार्थी थेट दहावीत आले. आता वर्षभर ऑनलाइन शिकले. काही काळ वर्ग भरले. त्यातही शंका समाधान करण्यात वेळ गेला. त्यातही निम्मे अधिक विद्यार्थी वर्गातच आले नाही. त्यामुळे दहावीतून पुढे गेल्यावर थेट बारावीच्या परीक्षेला सामोरे जातांना या विद्यार्थ्यांवर दडपण येईल, अशी भीती पालकांसह शिक्षकांतून व्यक्त होत आहे. तर परीक्षा लगेच रद्द न करता काही काळ प्रतीक्षा करणे सोयीस्कर ठरले असते, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

मूल्यमापन कशावर आधारित आहेदहावीची परीक्षा रद्द झाल्याने अंतर्गत मूल्यामापन होईल. त्यावर समाधानी नसलेल्यांना गुण सुधारण्याची संधी दिल्या जाणार असल्याचे सांगण्यात येते. मात्र, मूल्यमापन कशावर आधारित आहे. हेच अद्याप कळालेले नाही. जे शिकायचे राहून गेले ते विद्यार्थ्यांना शिकवण्याची काय सोय असणार हाही प्रश्नच आहे.- संगीता गायकवाड, पालक

मूल्यमापन परीक्षेशिवाय अशक्य अभ्यासक्रमाचे महत्त्व असतेच. विद्यार्थांना किती आकलन झाले. याचे मूल्यमापन परीक्षेशिवाय अशक्य वाटते. त्यामुळे दहावीच्या परीक्षा व्हायला पाहिजे होत्या. मात्र, कोरोनामुळे अडचणी आहे. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यावर तरी विद्यार्थी काय शिकले काय नाही. हे समजलं तर त्यांचा कल कळू शकेल.- संतोष अहिरे, पालक

पुढील शिक्षणाचा निर्णय कसामुलगी दहावीत शिकतेय. ती काय? शिकली? तिला काही येते काय? हे परीक्षेवरूनच कळले असते. परीक्षा रद्द झाली ठीक आहे. पण पुढे काय? त्यांच्या पुढील शिक्षणाचा निर्णय कसा घ्यावा. या सर्वांत मुलांचे खूप नुकसान होणार आहे. दहावी हा पाया असतो. तोच कच्चा राहिला तर पुढे काय? होईल याची चिंता वाटते.- राधा पुसे, पालक

दोन वर्गांना जोडणारा ब्रीज कोर्स व्हावानववीतून थेट दहावीत आणि आता थेट अकरावीत जाणाऱ्या या बॅचबद्दल चिंता वाटते. शिक्षणात डावा आणि उजवा विद्यार्थी ठरणे गरजेचे आहे. ते परीक्षेतूनच ठरू शकते. तरी दोन वर्गांना जोडणारा दुवा म्हणून एखादा दोन-तीन महिन्यांचा ब्रीज कोर्स झाला पाहिजे. त्यातून शिकायचे राहिलेला अभ्यासक्रम विद्यार्थी शिकतील. परीक्षा रद्दचा निर्णय जाहीर करण्याची घाई व्हायला नको होती. आता मूल्यमापन योग्य होण्यासाठी योग्य पद्धत अवलंबली पाहिजे. दहावीत परीक्षेला सामोरे न गेलेले विद्यार्थी थेट बारावीच्या बोर्ड परीक्षेला सामोरे जातील, त्यावेळी त्यांच्यावर दडपण येणार नाही यासाठीही उपाययोजना आतापासून व्हायला पाहिजे.-अनिल देशमुख, मुख्याध्यापक, गणोरी

टॅग्स :examपरीक्षाAurangabadऔरंगाबादEducationशिक्षण