शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

व्वा..! छत्रपती संभाजीनगरहून दीड वर्षात ७ लाखांवर प्रवाशांची हवाई सफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 11:34 IST

प्रवासी संख्येत वाढ, मुंबई, दिल्लीला सर्वाधिक प्रवासी

छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गेल्या दीड वर्षात तब्बल ७ लाखांवर प्रवाशांनी हवाई सफर केली आहे. यात सर्वाधिक प्रवास दिल्ली, मुंबईसाठी करण्यात आला आहे.

एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या आर्थिक वर्षात चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ६ लाख २३ हजार ९१५ प्रवाशांनी प्रवास केला, तर ५ हजार ७९९ विमान उड्डाणे नोंदवली गेली आहे. एप्रिल आणि मे महिन्यात प्रत्येकी ५० हजारांवर प्रवाशांची नोंद झाली. प्रवाशांच्या संख्येत मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत ३७ टक्के वाढ झाली आहे, तर विमान उड्डाण संख्येत २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे, अशी माहिती एअर कनेक्टिव्हिटी एव्हिएशन ग्रुपचे अक्षय चाबूकस्वार यांनी दिली.

विमान प्रवाशांची संख्या (एप्रिल २०२३ ते मार्च २०२४)शहर- प्रवासी संख्यादिल्ली-२,२१,११६मुंबई- २,४८,२०१बंगळुरू- ५४,६४६हैदराबाद- ९१, ८०८

२०२४ मधील विमान प्रवासीमहिना- प्रवासी संख्याजानेवारी - ५७,१५०फेब्रुवारी- ५२,६३६मार्च-५४,३७२एप्रिल-५०,०४०मे- ५८,३९५

प्रवासी संख्या आणखी वाढेलविमानतळाच्या आकडेवारीत वाढ झाली आहे, हे साहजिकच आहे. कोविड प्रतिबंध हटताच प्रवासी संख्या वाढतच गेली. चिकलठाणा विमानतळावर वर्षाला ३ ते ४ लाख प्रवासी संख्या असायची, ती आता २०२३ पासून ६.२५ लाखांच्या घरात गेली आहे. ही खूप मोठी वाढ आहे. दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरूसाठी विमानसेवा असूनही व आंतरराष्ट्रीय प्रवासी वगळता २०२३ मध्ये प्रवासी संख्या ६ लाख पार गेली होती. आता अहमदाबाद, लखनौ-नागपूर-गोवा विमानसेवा सुरू झाल्यामुळे प्रवासी संख्या ही २०२४ अखेर ७ लाख पार करेल, अशी शक्यता आहे.- अक्षय चाबूकस्वार, एअर कनेक्टिव्हिटी एव्हिएशन ग्रुप

पाठपुरावा सुरू आहे९ विमानांची ये-जा विमानसेवेत आणि प्रवासी संख्येत वाढ होत आहे. दिवसभरात ९ विमानांची ये-जा होत आहे. छत्रपती संभाजीनगरहून नव्या शहरांसाठी विमानसेवा सुरू करण्यासाठी पाठपुरावा आणि प्रयत्न सुरू आहे.- शरद येवले, संचालक, चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळtourismपर्यटन