शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

‘व्हॉटस्अ‍ॅप’द्वारे साहित्यप्रेमींना एकत्र आणण्याचा स्तुत्य प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 22:42 IST

व्हॉटस्अ‍ॅपसारख्या नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून साहित्यप्रेमींना एकत्र आणणे अतिशय स्तुत्य असून, हा सोशल मीडियाचा खऱ्या अर्थाने विधायक वापर

औरंगाबाद : व्हॉटस्अ‍ॅपसारख्या नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून साहित्यप्रेमींना एकत्र आणणे अतिशय स्तुत्य असून, हा सोशल मीडियाचा खऱ्या अर्थाने विधायक वापर असल्याचे मनोगत साहित्य काव्यगंध प्रतिष्ठान आयोजित दुसºया राज्यस्तरीय साहित्य संमेलनात सहभागी झालेल्या सर्व साहित्यिकांनी एकमुखाने व्यक्त केले.

रविवारी मराठवाडा महसूल प्रबोधिनी येथे या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकार दुर्गेश सोनार हे संमेलनाध्यक्ष होते. आ. अतुल सावे, मावळते संमेलनाध्यक्ष डॉ. पृथ्वीराज तौर, पी. विठ्ठल, उत्तम बावस्कर, के. एस. अतकरे, डॉ. दैवत सावंत, सायराबानो चौगुले, सागरराजे निंबाळकर, डॉ. राज रणवीर, मुरलीधर जगताप यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. ग्रंथदिंडीने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

साहित्य काव्यगंध प्रतिष्ठानचे अध्यक्ष गजानन काळे यांनी प्रास्ताविकातून संमेलनाच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली आणि व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून साहित्यप्रेमी एकत्र येत असून, त्यातून साहित्य संमेलन कसे आकाराला येत गेले, याविषयी माहिती दिली.

मान्यवरांच्या हस्ते ‘कथा नवलेखकांच्या’ या कथासंग्रहाचे तसेच ई- बुक कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. मानवी जीवन समजून घेतले तरच साहित्य समजून घेता येते, अशा शब्दांत डॉ. तौर यांनी उपस्थितांशी संवाद साधला. सध्याचा काळ हा कसोटीचा असून, या काळात आपण साहित्यिक म्हणून व्यक्त होणे, आत्यंतिक गरजेचे असल्याचे सोनार यांनी सांगितले. तर साहित्यिकांना योग्य असा मान, सन्मान, महत्त्व मिळत नसल्याची खंत आ. सावे यांनी व्यक्त केली. संदीप ढाकणे, आशा डांगे यांनी संचालन केले.

संमेलनाच्या दुसºया सत्रात डॉ. तौर यांच्या अध्यक्षतेखाली ‘समाज माध्यमे आणि वाचन संस्कृती’ या विषयावर परिसंवाद घेण्यात आला. यानंतर सायराबानो चौगुले आणि अरुण कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली दोन वेगवेगळी कविसंमेलने उत्स्फू र्तपणे पार पडली.

साहित्य संमेलनातील पुरस्कार विजेते१. साहित्य काव्यगंध प्रा. डॉ. नरेंद्र मारवाडे स्मृती पुरस्कार- डॉ. विद्या सुर्वे- बोरसे.२. साहित्य काव्यगंध स्व. नारायणराव डांगे स्मृती साहित्यप्रभा पुरस्कार- डॉ. पृथ्वीराज तौर.३. साहित्य काव्यगंध जीवन गौरव पुरस्कार- डॉ. शरयू शहा४. साहित्य काव्यगंध संघर्षयात्री पुरस्कार- कवी आकाश देशमुख. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद