शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

चिंताजनक ! औरंगाबादेत दोन दिवसात कोरोनाचे चार बळी; रुग्णसंख्या ६८८ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 21:14 IST

कोरोनाचा हा शहरातील १९ वा बळी ठरला आहे. तसेच आणखी चार पॉझिटिव्ह आढळून आल्याने रुग्णसंख्या ६८८ वर गेली आहे.

ठळक मुद्देबुधवारी सकाळी दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते

औरंगाबाद : शहरातील रहेमानिया कॉलनीतील ५९ वर्षीय पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी सकाळी मृत्यू झाला. या रुग्णाला आधीपासून मधुमेह, उचरक्तदाब होता, अशी माहिती खाजगी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिली. कोरोनाचा हा शहरातील १९ वा बळी ठरला आहे. तसेच आणखी चार पॉझिटिव्ह आढळून आल्याने रुग्णसंख्या ६८८ वर गेली आहे. शहरात दोन दिवसात चार कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने शहरवासीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

शहरात कोरोनाबाधित दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याचे बुधवारी सकाळी समोर आले. बीड बायपास परिसरातील अरुणोदय कॉलनीतील ९४ वर्षीय वृद्धेचा आणि गारखेडा परिसरातील हुसैन कॉलनीतील ५८ वर्षीय महिलेचा मृत्यूनंतर अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर सायंकाळी सिल्कमिल कॉलनी येथील एका ६५ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. या महिलेला मंगळवारी खाजगी रूग्णालयातून घाटीत रेफर करण्यात आले होते. उपचार सुरू असताना बुधवारी पहाटे ४ वाजता महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर शहरातील रहेमानिया कॉलनीतील ५९ वर्षीय पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी सकाळी मृत्यू झाला. या चार मृत्यूमुळे दोन दिवसात शहरात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या आता १९ झाली आहे.

आणखी ४ पॉझिटिव्ह,रुग्णसंख्या ६८८ दरम्यान, रहेमानिया कॉलनी, सिल्लेखाना आणि शहाबाजार येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच घाटी रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या भोकरदन ब( जि. जालना) येथील २० वर्षीय तरुणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे औरंगाबादेतील रुग्णसंख्या ६८८ झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबादDeathमृत्यू