शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

कार्यकर्त्यांपासून ग्रामस्थ झाले दूर

By admin | Updated: October 12, 2014 12:11 IST

विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील त्यात्या पक्षांच्या प्रमुख कार्यकर्ते व नेते यांच्याकडे ग्रामस्थ पाठ फिरवून दूर जात आहेत.

 

परभणी : विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील त्यात्या पक्षांच्या प्रमुख कार्यकर्ते व नेते यांच्याकडे ग्रामस्थ पाठ फिरवून दूर जात आहेत. त्यामुळे या पुढार्‍यांची चांगलीच पंचाईत होऊ लागली आहे. 
ग्रामीण भागातील नेते अथवा पुढारीपण करणार्‍यांकडे ग्रामस्थ आपल्या अडीअडचणी किंवा शासकीय कामे करून घेण्यासाठी धावाधाव करतात. परंतु, हे पुढारी त्या वेळी भाव खाऊन जातात. हा आपला, तो त्याचा असे म्हणून ग्रामस्थांची कामे खोळंबून ठेवतात. त्यामुळे अनेक गावातील पुढार्‍यांना चांगले दिवस आले होते. परंतु, ग्रामस्थ ही दर पाच वर्षानंतर होणार्‍या निवडणुकीची वाट पाहून असतात. निवडणुका लागल्या गाव पुढार्‍यांना ग्रामस्थ व सोयर्‍या-धायर्‍यांची गरज भासू लागते. अशा वेळी मात्र हे सगेसोयरे व ग्रामस्थ गाव पुढार्‍याला व कार्यकर्त्यांना अद्दल घडविण्यासाठी विविध युक्त्या लढवित असतात. 
सध्या विधानसभा निवडणुकीचे मतदान अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपले आहे. अशावेळी या गावपुढार्‍यांना मतदारांची (ग्रामस्थांची) गरज भासू लागली आहे. हे ग्रामस्थ या गाव पुढार्‍यांना पाहून तोंड वळवित दुसर्‍या दिशेने जात आहेत. त्यामुळे या गावपुढार्‍यांची चांगलीच गोची होत आहे. (प्रतिनिधी)
आता मतदार खाऊ लागले भाव
■ जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणूक बहुरंगी होत आहे. सध्या उमेदवारांना एक-एक मतांचे पडले आहे. त्यासाठी उमेदवार वत्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते रात्रीचा दिवस करून मतदारांना भेटण्यासाठी वाट्टेल ते करीत आहेत. आमच्याच पक्षाला व नेत्याला मतदान करा, असे सांगत आहेत. उमेदवार गावात तर शेतकरी (मतदार) शेतात अशी परिस्थिती ग्रामीण भागात दिसून येत आहे.
 ■ गावातील मतदार एवढे आमच्या जवळचे आहेत, असे गावपुढारी उमेदवारांना पटवून देत आहेत आणि निवडून आल्यानंतर हे गावपुढारी (नेत्यांकडून) उमेदवारांकडून आपले फायदे करून घेतात आणि ग्रामस्थांना वार्‍यावर सोडून देतात. त्यामुळे आता मतदारही भाव खाताना दिसत आहेत.