शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

कार्यकर्त्यांपासून ग्रामस्थ झाले दूर

By admin | Updated: October 12, 2014 12:11 IST

विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील त्यात्या पक्षांच्या प्रमुख कार्यकर्ते व नेते यांच्याकडे ग्रामस्थ पाठ फिरवून दूर जात आहेत.

 

परभणी : विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील त्यात्या पक्षांच्या प्रमुख कार्यकर्ते व नेते यांच्याकडे ग्रामस्थ पाठ फिरवून दूर जात आहेत. त्यामुळे या पुढार्‍यांची चांगलीच पंचाईत होऊ लागली आहे. 
ग्रामीण भागातील नेते अथवा पुढारीपण करणार्‍यांकडे ग्रामस्थ आपल्या अडीअडचणी किंवा शासकीय कामे करून घेण्यासाठी धावाधाव करतात. परंतु, हे पुढारी त्या वेळी भाव खाऊन जातात. हा आपला, तो त्याचा असे म्हणून ग्रामस्थांची कामे खोळंबून ठेवतात. त्यामुळे अनेक गावातील पुढार्‍यांना चांगले दिवस आले होते. परंतु, ग्रामस्थ ही दर पाच वर्षानंतर होणार्‍या निवडणुकीची वाट पाहून असतात. निवडणुका लागल्या गाव पुढार्‍यांना ग्रामस्थ व सोयर्‍या-धायर्‍यांची गरज भासू लागते. अशा वेळी मात्र हे सगेसोयरे व ग्रामस्थ गाव पुढार्‍याला व कार्यकर्त्यांना अद्दल घडविण्यासाठी विविध युक्त्या लढवित असतात. 
सध्या विधानसभा निवडणुकीचे मतदान अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपले आहे. अशावेळी या गावपुढार्‍यांना मतदारांची (ग्रामस्थांची) गरज भासू लागली आहे. हे ग्रामस्थ या गाव पुढार्‍यांना पाहून तोंड वळवित दुसर्‍या दिशेने जात आहेत. त्यामुळे या गावपुढार्‍यांची चांगलीच गोची होत आहे. (प्रतिनिधी)
आता मतदार खाऊ लागले भाव
■ जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणूक बहुरंगी होत आहे. सध्या उमेदवारांना एक-एक मतांचे पडले आहे. त्यासाठी उमेदवार वत्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते रात्रीचा दिवस करून मतदारांना भेटण्यासाठी वाट्टेल ते करीत आहेत. आमच्याच पक्षाला व नेत्याला मतदान करा, असे सांगत आहेत. उमेदवार गावात तर शेतकरी (मतदार) शेतात अशी परिस्थिती ग्रामीण भागात दिसून येत आहे.
 ■ गावातील मतदार एवढे आमच्या जवळचे आहेत, असे गावपुढारी उमेदवारांना पटवून देत आहेत आणि निवडून आल्यानंतर हे गावपुढारी (नेत्यांकडून) उमेदवारांकडून आपले फायदे करून घेतात आणि ग्रामस्थांना वार्‍यावर सोडून देतात. त्यामुळे आता मतदारही भाव खाताना दिसत आहेत.