शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकर्त्यांपासून ग्रामस्थ झाले दूर

By admin | Updated: October 12, 2014 12:11 IST

विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील त्यात्या पक्षांच्या प्रमुख कार्यकर्ते व नेते यांच्याकडे ग्रामस्थ पाठ फिरवून दूर जात आहेत.

 

परभणी : विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील त्यात्या पक्षांच्या प्रमुख कार्यकर्ते व नेते यांच्याकडे ग्रामस्थ पाठ फिरवून दूर जात आहेत. त्यामुळे या पुढार्‍यांची चांगलीच पंचाईत होऊ लागली आहे. 
ग्रामीण भागातील नेते अथवा पुढारीपण करणार्‍यांकडे ग्रामस्थ आपल्या अडीअडचणी किंवा शासकीय कामे करून घेण्यासाठी धावाधाव करतात. परंतु, हे पुढारी त्या वेळी भाव खाऊन जातात. हा आपला, तो त्याचा असे म्हणून ग्रामस्थांची कामे खोळंबून ठेवतात. त्यामुळे अनेक गावातील पुढार्‍यांना चांगले दिवस आले होते. परंतु, ग्रामस्थ ही दर पाच वर्षानंतर होणार्‍या निवडणुकीची वाट पाहून असतात. निवडणुका लागल्या गाव पुढार्‍यांना ग्रामस्थ व सोयर्‍या-धायर्‍यांची गरज भासू लागते. अशा वेळी मात्र हे सगेसोयरे व ग्रामस्थ गाव पुढार्‍याला व कार्यकर्त्यांना अद्दल घडविण्यासाठी विविध युक्त्या लढवित असतात. 
सध्या विधानसभा निवडणुकीचे मतदान अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपले आहे. अशावेळी या गावपुढार्‍यांना मतदारांची (ग्रामस्थांची) गरज भासू लागली आहे. हे ग्रामस्थ या गाव पुढार्‍यांना पाहून तोंड वळवित दुसर्‍या दिशेने जात आहेत. त्यामुळे या गावपुढार्‍यांची चांगलीच गोची होत आहे. (प्रतिनिधी)
आता मतदार खाऊ लागले भाव
■ जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणूक बहुरंगी होत आहे. सध्या उमेदवारांना एक-एक मतांचे पडले आहे. त्यासाठी उमेदवार वत्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते रात्रीचा दिवस करून मतदारांना भेटण्यासाठी वाट्टेल ते करीत आहेत. आमच्याच पक्षाला व नेत्याला मतदान करा, असे सांगत आहेत. उमेदवार गावात तर शेतकरी (मतदार) शेतात अशी परिस्थिती ग्रामीण भागात दिसून येत आहे.
 ■ गावातील मतदार एवढे आमच्या जवळचे आहेत, असे गावपुढारी उमेदवारांना पटवून देत आहेत आणि निवडून आल्यानंतर हे गावपुढारी (नेत्यांकडून) उमेदवारांकडून आपले फायदे करून घेतात आणि ग्रामस्थांना वार्‍यावर सोडून देतात. त्यामुळे आता मतदारही भाव खाताना दिसत आहेत.