शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

कामगारांच्या मुलांनी प्रगतीची धरली वाट; अस्वच्छतेतून मथुरानगर- संभाजी काॅलनीची मुक्ती कधी?

By साहेबराव हिवराळे | Updated: January 5, 2024 16:56 IST

अनेक कामगारांची मुलं व्यावसायिक दृष्टिकोनातून गॅरेजचालक, बांधकाम व्यावसायिक,लघुउद्योजक झाले आहेत.

छत्रपती संभाजीनगर : सिडको एन-६ परिसरातील मथुरानगर, संभाजी कॉलनी कामगार कुटुंबियासाठीची वसाहत आहे. त्या ठिकाणी कौटुंबिक गरजेनुसार राहण्याची सुविधा झाली परंतू मुलभूत गरजा सिडकोतून मनपात आल्यानंतर फारशा प्रमाणात प्रामुख्याने सोडविल्या नाहीत. कामगारांची मुलं डॉक्टर,वकील, इंजिनिअर, बँक तसेच मल्टिनॅशनल कंपनीत कामाला आहेत.

अनेक कामगारांची मुलं व्यावसायिक दृष्टिकोनातून गॅरेजचालक, बांधकाम व्यावसायिक,लघुउद्योजक झाले आहेत. परंतु, अस्वच्छतेतून कधी उजाडणार मथुरानगर- संभाजी काॅलनीची पहाट अशी अवस्था आहे. सिडकोत असताना येथील नागरिकांना सिडको सेवासुविधा देत होती. आता मनपाकडे हस्तांतरण झाल्यावर सेवासुविधा देण्याची जबाबदारी आहे. परंतु त्या काळात टाकलेल्या ड्रेेनेज लाईनवरच वाढलेल्या कुटुंबाचा भार आहे. त्यामुळे मथुरानगरात ड्रेनेज लाईन चोकअप होण्याचे प्रकार दिवसाआड बघायला मिळतात. त्यासाठी स्थानिक नागरिकांनी तक्रार करूनही त्याचे निराकरण होत नाही. कचरा गाड्या घरापर्यंत येऊन कचरा घेऊन जाणार असा नियम असतानाही गाड्या सरळ रस्त्याने निघून जातात अन् त्यामुळे नागरिक घरातील कचरा रस्त्याच्या कडेला किंवा मोकळ्या मैदानावर टाकून निघून जातात. परंतु जेव्हा घरी ये-जा करताना अनेकदा नाक दाबून प्रवास करावा लागतो. त्यामुळे आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

औषध फवारणी करणाऱ्यांचाही फेरफटका येथे दिसत नाही, त्यामुळे डासाचा त्रास देखील नागरिकांना सहन करावा लागतो. परिसराची भौगोलिक रचना टेकडीची असल्याने घराची उंची समान दिसत नाही. असे विविध प्रश्न नागरिकांचा पाठलाग सोडत नसल्याची खंत स्थानिक नागरिकांतून व्यक्त होत आहे.

उद्यानात दारूड्यांची भीतीमथुरानगर व संभाजी कॉलनीच्यालगत असलेल्या भव्य-दिव्य उद्यान सिडकोने हस्तांतर केले. मात्र, त्याची दुरावस्था झाली आहे.

उद्यानात सुरक्षा महत्वाचीउद्यानात बोअरवेल पेव्हर ब्लॉक, जाॅगिंगसाठीची तयारी असली तरी येथे दारूच्या रिकाम्या बाटली अन् दारूड्याचा आश्रय असल्याने येथे इतरांंना चांगल्या कामासाठी वापर करणे शक्य होत नाही.- मनिष नरवडे

कचऱ्याची विल्हेवाट लावावीसुंदर शहर स्वच्छ शहर ही घंटा गाडीवरील गीत ऐकून शहर कचरा मुक्त होणार, अशी आशा बळावली होती. परंतु गाड्या घरापर्यंत येऊन कचरा नेत नाहीत. त्यामुळे दुर्गंधीचा त्रास किती दिवस सहन करावा.-कुणाल परदेशी

रस्त्यावर ड्रेनेजचे पाट कधी थांबणार?जुन्याच ड्रेनेज लाइन असल्याने त्यावर अधिकचा भार पडत आहे. पावसाळ्यात तर रस्ते ओलेच असले तर समजून घेता येते; परंतु हिवाळा आणि उन्हाळ्यातही ड्रेनेज चोकअप होऊन दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर वाहते. त्यावेळी नागरिकांना अडचणीला सामोरे जावे लागते. जुन्या लाइन बदलून नवीन लाइन टाकण्याची गरज आहे.- कृष्णा नरवडे

अंतर्गत रस्ते सुधार कधी?मुख्य रस्ते गुळगुळीत केलेले आहेत. परंतु, अंतर्गत रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे. रस्त्यावरून घर गाठताना ओबडधोबड रस्त्यावरून जावे लागते. त्यामुळे वाहनाचे नुकसान होते आणि नागरिकांना पाठदुखीचा ही आजार जडत आहे. याकडे मनपाने लक्ष देण्याची गरज आहे. अंतर्गत रस्त्याची अवस्था सुधारावी, अशी मागणी आहे.- आकाश साबळे

बिघडलेल्या बोअरवेल सुधारासिडको एन-६ परिसरात लोकप्रतिनिधी तसेच मनपाच्या वतीने बोअरवेल टाकण्यात आलेले आहेत. परंतु, त्यापैकी जुन्या मनपाच्या शाळेतील बोअरवेल फक्त सुरू असून, त्याचा जनतेला काही फायदा नाही. इतर बोअरवेल बिघडलेले असताना मनपाच्या टंचाईत ते मनपाने दुरुस्ती केलेले नाही.- किरण पाटील शिरवत 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका