शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

रेल्वेच्या आशेने कामगार गाठताहेत रेल्वेस्टेशन; परिसरातच राहतात बसून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 17:28 IST

रेल्वेस्टेशनच्या परिसरात ते आशाळभूत नजरेने पाहत होते, कोणीतरी येईल आणि आमची व्यवस्था करतील, असे त्यांना वाटत होते.

ठळक मुद्देकामगारांना गावी जाण्याची प्रतीक्षा अनेक कामगार उशिरा आल्याने हुकली रेल्वे

औरंगाबाद : पाठीवर बॅग, हातात अवजड गाठोडे घेऊन अनेक मजूर, कामगारांनी रविवारी रेल्वेस्टेशन गाठले. मात्र, येथून कोणतीही रेल्वे धावणार नसल्याचे कळताच अनेक जण निराश होऊन माघारी परतले, तर काही जण रेल्वेच्या आशेने परिसरातच बसून राहिले.

कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीने अनेक श्रमिक, कामगारांना गावी जाण्यास भाग पाडले. अनेक कामगारांनी गाव गाठण्यासाठी शेकडो कि.मी.चे अंतर पायीच कापले. रेल्वे रुळावरून गावाकडे पायी जाणाऱ्या श्रमिकांचा रेल्वेखाली येऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेने देशभरात हळहळ व्यक्त झाली. शासनाने विविध राज्यांतील मजुरांसाठी विशेष श्रमिक रेल्वे सोडल्या. औरंगाबाद रेल्वेस्टेशनवरूनही विविध राज्यांतील श्रमिकांना घेऊन रेल्वे रवाना झाल्या. त्यातून हजारो प्रवासी गावी रवाना झाले; परंतु अद्यापही अनेक कामगार गावी जाण्यासाठी प्रयत्नशील आहेत. रेल्वेने गावी जाता येईल, या आशेने रेल्वेस्टेशन गाठत आहेत.

बिहारला जाण्यासाठी काही कामगार रविवारी रेल्वेस्टेशन पोहोचले; परंतु बिहारची रेल्वे एक दिवसापूर्वीच रवाना झाल्याचे कळताच ते निराश झाले. रेल्वेस्टेशनच्या परिसरात ते आशाळभूत नजरेने पाहत होते, कोणीतरी येईल आणि आमची व्यवस्था करतील, असे त्यांना वाटत होते. यावेळी काहींनी बिहारमध्ये जायचे असून, पुण्यावरून आल्याचे सांगितले. रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, रविवारी रेल्वे नव्हती. आमच्यापर्यंत कोणताही कामगार आला नाही, असे त्यांनी सांगितले.

१ जूनपासून नांदेड- अमृतसर विशेष एक्स्प्रेस१ जूनपासून नांदेड येथून नांदेड- अमृतसर विशेष एक्स्प्रेस धावेल. तसेच दिनांक ३ जूनपासून अमृतसर येथून अमृतसर-नांदेड सचखंड विशेष एक्स्प्रेस धावेल. या गाडीस २२ बोगी असतील, यात सामान्य म्हणजेच जनरलचे डबे नसतील. या विशेष रेल्वेची वेळ नियमित नांदेड-अमृतसर-नांदेड सचखंड एस्क्प्रेससारखीच असेल. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMigrationस्थलांतरणAurangabadऔरंगाबादrailwayरेल्वे