शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

तीन महिन्यांपासून वेतनाविना काम

By admin | Updated: June 15, 2014 00:37 IST

वसमत : जिल्ह्यातील तिन्ही नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे तीन महिन्याचे वेतन अद्याप मिळाले नाही. वेतनाअभावी कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. वेतन त्वरित न मिळाल्यास काम बंद करण्याचा

वसमत : जिल्ह्यातील तिन्ही नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे तीन महिन्याचे वेतन अद्याप मिळाले नाही. वेतनाअभावी कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. वेतन त्वरित न मिळाल्यास काम बंद करण्याचा इशारा वसमत न.प.च्या कर्मचाऱ्यांनी दिला आहे. वेतनाच्या प्रश्नावरून न.प. कर्मचारी आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे. नगरपालिका कर्मचाऱ्यांना वेतनासाठी मिळणारे सहाय्यक अनुदान राज्यातील ७८ नगरपालिकांकडे अतिरिक्त देण्यात आले होते. एकट्या वसमत नगरपालिकेकडे सुमारे १२ कोटी रुपये जादा अनुदान देण्यात आल्याचा प्रकार शासनाच्या लेखा परीक्षणात समोर आला होता. त्यानंतर शासनाने ज्यादा रक्कम अदा झालेल्या नगरपालिकांकडून वसुली सुरू केली आहे. नगरपालिका कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या वेतनासाठीच्या सहाय्यक अनुदानातून ५० टक्के कपात सुरू झाल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन अनियमित होणे सुरू झाले आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी व हिंगोली नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्याचे वेतन अद्याप मिळालेले नाही. कर्मचाऱ्यांचे वेतन थकल्याने ते आर्थिक संकटाचा मुकाबला करत आहेत. विशेष बाब अशी की शासनाने कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सहाय्यक अनुदान जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग केले आहे. २० मे रोजी अनुदान जिल्हाधिकारी कार्यालयात जमा झाले आहे. मात्र अद्यापपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांच्या वेतन अदा करण्यासाठीच्या बिलावर स्वाक्षरीच न झाल्याने अजूनपर्यंत वेतन अदा झाले नसल्याचे समोर आले आहे. याबाबत वसमत नगर परिषद कर्मचारी संघटनेने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. यात वेतन न मिळाल्यास वसमत नगर परिषदेचे कर्मचारी कामबंद आंदोलन सुरू करणार असल्याचे नमूद केले आहे. न.प. कर्मचाऱ्यांच्या वेतनातील अडचणीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील न.प. प्रशासन विभागाचे प्रमुख कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी शासनाकडूनच अनुदान येण्यास विलंब झाला आहे. कर्मचाऱ्यांचे एप्रिल व मे महिन्याचे वेतन करण्यासाठीचे बिल तयार करण्यात आले आहे. हे बिल पाच दिवसांपूर्वी पाठविले असून जिल्हाधिकाऱ्यांकडे स्वाक्षरी होताच वेतनाच्या धनादेश संबंधित न.प.कडे वर्ग होणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. (वार्ताहर)आंदोलनाचा इशारानगरपालिका कर्मचाऱ्यांना वेतनासाठी मिळणारे सहाय्यक अनुदान राज्यातील ७८ नगर पालिकांकडे अतिरिक्त देण्यात आले होते.एकट्या वसमत पालिकेकडे सुमारे १२ कोटी रुपये जादा अनुदान देण्यात आल्याचा प्रकार लेखा परीक्षणात समोर आला होता. शासनाने ज्यादा रक्कम अदा झालेल्या नगरपालिकांकडून वसुली सुरू केली आहे. नगरपालिका कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या वेतनासाठीच्या सहाय्यक अनुदानातून ५० टक्के कपात सुरू झाल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन अनियमित होणे सुरू झाले आहे. वसमत, कळमनुरी व हिंगोली नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्याचे वेतन अद्याप मिळालेले नाही.वेतनासाठीचे अनुदान जिल्हाधिकारी कार्यालयात जमा झाले आहे. मात्र अद्याप जिल्हाधिकाऱ्यांकडून बिलावर स्वाक्षरीच झाली नसल्याचे समोर आले आहे. कर्मचारी आंदोलन करणार