शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
4
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
5
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
6
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
7
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
8
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
9
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
10
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
11
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
12
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
13
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
14
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
15
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
16
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
17
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
18
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
19
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
20
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला

समृद्धी महामार्गाच्या कामाला पुन्हा गती; जिल्ह्यातील काम वर्षभरात पूर्ण होण्याची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 16:26 IST

पहिल्या लॉकडाऊनमध्ये तीन महिन्यांच्या कार्यकाळात समृद्धी महामार्गाच्या कामावर थोडा परिणाम झाला होता.

ठळक मुद्देरोज १५० मीटर कामाचे उद्दिष्टऔरंगाबाद पूर्व विभागात ३१ टक्केतर पश्चिम विभागात ४५ टक्के काम पूर्ण

- विजय सरवदे 

औरंगाबाद : मार्चमध्ये लागू झालेल्या लॉकडॉऊनच्या पहिल्या टप्प्यात समृद्धी महामार्गाचे काम काही प्रमाणात प्रभावित झाले होते. आता मात्र महामार्गाच्या कामाने गती घेतली असून, जिल्ह्यात हे काम आॅगस्ट २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सांगितले.

डॉ. पुलकुंडवार यांनी सांगितले की, औरंगाबाद जिल्ह्यात समृद्धी महामार्गाचे काम गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यापासून सुरू झाले. जिल्ह्यातून ११०.३०७ कि.मी. लांबीचा समृद्धी महामार्ग जाणार आहे. बांधकामाच्या दृष्टिकोनातून औरंगाबादचे पूर्व आणि पश्चिम, असे विभाजन करण्यात आले असून, आतापर्यंत औरंगाबाद पूर्व विभागात ३१ टक्के, तर औरंगाबाद पश्चिम विभागात ४५ टक्के काम पूर्ण झाले आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यात मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लि. आणि लार्सन अँड टुब्रो या दोन कंत्राटदार संस्था काम करीत आहेत. पहिल्या लॉकडाऊनमध्ये तीन महिन्यांच्या कार्यकाळात समृद्धी महामार्गाच्या कामावर थोडा परिणाम झाला होता. आंतरराज्य वाहतूक थंडावल्याने कामाचा वेग थोडा मंदावला होता. स्टील आणि सिमेंटची वाहतूक थांबली होती; परंतु गेल्या महिनाभरात कामाने आता पुन्हा वेग घेतला आहे. या प्रकल्पावर काम करणाऱ्या १८ हजार कामगारांपैकी ४ हजार स्थलांतरित कामगार मे महिन्याच्या अखेरीस त्यांच्या मूळ गावी निघून गेले. आता प्रकल्पाच्या कामावर परतण्याची त्यांनी तयारी दर्शवली आहे. 

पुलकुंडवार म्हणाले की, समृद्धी महामार्ग प्रकल्प हा पूर्णपणे ग्रीनफील्ड प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे काम शहरापासून दूर सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आताच्या लॉकडाऊनचा कोणताही परिणाम प्रकल्पाच्या कामावर जाणवत नाही, तसेच कोरोना काळात घ्यावयाच्या काळजीसंदर्भात प्रकल्पावर काम करणाऱ्या सर्व कामगारांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यासाठी विशेष प्रशिक्षण शिबिरे घेण्यात आली. तज्ज्ञांकडून मार्गदर्शनही करण्यात आले आहे. सामाजिक अंतराचे काटेकोर पालन करूनच प्रकल्पाचे काम सुरू आहे.  जिल्ह्यात संपूर्ण रस्त्याचे दररोज १५० मीटर असे काम पूर्ण होत आहे.  समृद्धी महामार्गाच्या एकूण ७०१ कि.मी. लांबीपैकी ५०० कि.मी. लांबीचे काम मे २०२१ पर्यंत पूर्ण होईल, तर डिसेंबर २०२१ पर्यंत संपूर्ण समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचा  राज्य रस्ते विकास महामंडळाचा प्रयत्न आहे.

माळीवाडा येथील इंटरचेंज प्रगतिपथावर औरंगाबाद जिल्ह्यात सावंगी, माळीवाडा व हडस-पिंपळगाव या ठिकाणी इंटरचेंज घेण्यात आली आहेत. त्यापैकी माळीवाडा येथील इंटरचेंज प्रगतिपथावर आहे व सावंगी, हडस-पिंपळगाव येथील इंटरचेंजची कामे लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. याशिवाय मनमाड-सिकंदराबाद रेल्वे लाईनवर लासूर येथील ‘आरओबी’च्या कामासाठी रेल्वे खात्याची परवानगी प्राप्त झाली असून, ते काम सुरू करण्यात आलेले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कामे आॅगस्ट २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. 

जिल्ह्यात तीन नवनगरांची उभारणीसमृद्धी महामार्गालगत २० नवनगरांची उभारणी केली जाणार असून, औरंगाबाद जिल्ह्यात हडस पिंपळगाव, बाबतारा आणि घायगाव या तीन ठिकाणी कृषी समृद्धी केंद्रे अर्थात नवनगरे विकसित केली जाणार आहेत, तसेच महामार्गावर फ्लायओव्हर, व्हायाडक्ट, मोठे पूल, लहान पूल, पादचारी व पाळीव प्राण्यांसाठीचे, लहान वाहनांसाठीचे भुयारी मार्ग, फूड मॉल, ट्रॉमा केअर सेंटर, ट्रक टर्मिनल, बस बे इत्यादींचीही उभारणी केली जाणार आहे. 

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAurangabadऔरंगाबादhighwayमहामार्ग