शहरं
Join us  
Trending Stories
1
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
2
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
3
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
4
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
5
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
अमेरिकेविरोधात रशिया-चीनचा खतरनाक प्लॅन; भारतासाठी धोक्याची घंटा, पुतिन-जिनपिंगचं चाललंय काय?
8
शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
9
'ओढत खोलीत घेऊन गेले, पाय पकडले अन्...', कोलकाता बलात्कार पीडितेने सांगितली आपबीती
10
'कोल्हापुरी'सारखी चप्पल विकून वादात अडकली 'प्राडा'; १ लाख रुपयांच्या किंमतीवरून झाला 'राडा'
11
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
12
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
13
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
14
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता
15
Viral Video : ताडपत्री अन् झावळ्या बघून झोपडी समजलात का? आत वाकून बघाल तर शॉकच व्हाल!
16
Jagannath Rath Yatra 2025 : जगन्नाथाच्या रथापुढे होते 'सोन्याच्या' झाडूने स्वच्छता; कोणी सुरू केली ही प्रथा? आता कोण करतं? वाचा!
17
Gold Silver Rates 27 June: सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, आता 'इतकी' झाली १० ग्राम सोन्याची किंमत
18
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीत संयुक्त राष्ट्रांची मदत घेतली जाणार नाही; भारताने प्रस्ताव फेटाळला
19
गोलंदाजांचा कहर...एकही फलंदाज टिकेना! फक्त एक फिफ्टी अन् २ दिवसांत पडल्या २४ विकेट्स!
20
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक

समृद्धी महामार्गाच्या कामाला पुन्हा गती; जिल्ह्यातील काम वर्षभरात पूर्ण होण्याची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 16:26 IST

पहिल्या लॉकडाऊनमध्ये तीन महिन्यांच्या कार्यकाळात समृद्धी महामार्गाच्या कामावर थोडा परिणाम झाला होता.

ठळक मुद्देरोज १५० मीटर कामाचे उद्दिष्टऔरंगाबाद पूर्व विभागात ३१ टक्केतर पश्चिम विभागात ४५ टक्के काम पूर्ण

- विजय सरवदे 

औरंगाबाद : मार्चमध्ये लागू झालेल्या लॉकडॉऊनच्या पहिल्या टप्प्यात समृद्धी महामार्गाचे काम काही प्रमाणात प्रभावित झाले होते. आता मात्र महामार्गाच्या कामाने गती घेतली असून, जिल्ह्यात हे काम आॅगस्ट २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सांगितले.

डॉ. पुलकुंडवार यांनी सांगितले की, औरंगाबाद जिल्ह्यात समृद्धी महामार्गाचे काम गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यापासून सुरू झाले. जिल्ह्यातून ११०.३०७ कि.मी. लांबीचा समृद्धी महामार्ग जाणार आहे. बांधकामाच्या दृष्टिकोनातून औरंगाबादचे पूर्व आणि पश्चिम, असे विभाजन करण्यात आले असून, आतापर्यंत औरंगाबाद पूर्व विभागात ३१ टक्के, तर औरंगाबाद पश्चिम विभागात ४५ टक्के काम पूर्ण झाले आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यात मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लि. आणि लार्सन अँड टुब्रो या दोन कंत्राटदार संस्था काम करीत आहेत. पहिल्या लॉकडाऊनमध्ये तीन महिन्यांच्या कार्यकाळात समृद्धी महामार्गाच्या कामावर थोडा परिणाम झाला होता. आंतरराज्य वाहतूक थंडावल्याने कामाचा वेग थोडा मंदावला होता. स्टील आणि सिमेंटची वाहतूक थांबली होती; परंतु गेल्या महिनाभरात कामाने आता पुन्हा वेग घेतला आहे. या प्रकल्पावर काम करणाऱ्या १८ हजार कामगारांपैकी ४ हजार स्थलांतरित कामगार मे महिन्याच्या अखेरीस त्यांच्या मूळ गावी निघून गेले. आता प्रकल्पाच्या कामावर परतण्याची त्यांनी तयारी दर्शवली आहे. 

पुलकुंडवार म्हणाले की, समृद्धी महामार्ग प्रकल्प हा पूर्णपणे ग्रीनफील्ड प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे काम शहरापासून दूर सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आताच्या लॉकडाऊनचा कोणताही परिणाम प्रकल्पाच्या कामावर जाणवत नाही, तसेच कोरोना काळात घ्यावयाच्या काळजीसंदर्भात प्रकल्पावर काम करणाऱ्या सर्व कामगारांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यासाठी विशेष प्रशिक्षण शिबिरे घेण्यात आली. तज्ज्ञांकडून मार्गदर्शनही करण्यात आले आहे. सामाजिक अंतराचे काटेकोर पालन करूनच प्रकल्पाचे काम सुरू आहे.  जिल्ह्यात संपूर्ण रस्त्याचे दररोज १५० मीटर असे काम पूर्ण होत आहे.  समृद्धी महामार्गाच्या एकूण ७०१ कि.मी. लांबीपैकी ५०० कि.मी. लांबीचे काम मे २०२१ पर्यंत पूर्ण होईल, तर डिसेंबर २०२१ पर्यंत संपूर्ण समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचा  राज्य रस्ते विकास महामंडळाचा प्रयत्न आहे.

माळीवाडा येथील इंटरचेंज प्रगतिपथावर औरंगाबाद जिल्ह्यात सावंगी, माळीवाडा व हडस-पिंपळगाव या ठिकाणी इंटरचेंज घेण्यात आली आहेत. त्यापैकी माळीवाडा येथील इंटरचेंज प्रगतिपथावर आहे व सावंगी, हडस-पिंपळगाव येथील इंटरचेंजची कामे लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. याशिवाय मनमाड-सिकंदराबाद रेल्वे लाईनवर लासूर येथील ‘आरओबी’च्या कामासाठी रेल्वे खात्याची परवानगी प्राप्त झाली असून, ते काम सुरू करण्यात आलेले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कामे आॅगस्ट २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. 

जिल्ह्यात तीन नवनगरांची उभारणीसमृद्धी महामार्गालगत २० नवनगरांची उभारणी केली जाणार असून, औरंगाबाद जिल्ह्यात हडस पिंपळगाव, बाबतारा आणि घायगाव या तीन ठिकाणी कृषी समृद्धी केंद्रे अर्थात नवनगरे विकसित केली जाणार आहेत, तसेच महामार्गावर फ्लायओव्हर, व्हायाडक्ट, मोठे पूल, लहान पूल, पादचारी व पाळीव प्राण्यांसाठीचे, लहान वाहनांसाठीचे भुयारी मार्ग, फूड मॉल, ट्रॉमा केअर सेंटर, ट्रक टर्मिनल, बस बे इत्यादींचीही उभारणी केली जाणार आहे. 

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAurangabadऔरंगाबादhighwayमहामार्ग