शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

राष्ट्रीय कृषी विकास योजनेतील कामे संशयाच्या भोवऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 23:05 IST

राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या कामाची देयके अदा करण्यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना असतानाही जिल्ह्यातील काही ठिकाणी कामांचे मूल्यमापन न करताच बिले अदा केल्याच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत.

ठळक मुद्देघोटाळ्याचे सिंचन: पाझर तलावाची कामे न होताच वाटप केला निधी

औरंगाबाद : राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या कामाची देयके अदा करण्यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना असतानाही जिल्ह्यातील काही ठिकाणी कामांचे मूल्यमापन न करताच बिले अदा केल्याच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत. परिणामी योजनेतील कामे संशयाच्या भोवºयात आली आहेत. जिल्हा दुष्काळाच्या खाईत गेलेला असताना जलयुक्त शिवार, पाझर तलाव आणि सिमेंट नाला बंधाºयांच्या कामात गैरव्यवहार होण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. या सगळ्या प्रकरणातील दोषी कार्यकारी अभियंता, उपअभियंत्यांवर मात्र कुठलीही कारवाई अद्यापपावेतो झालेली नाही.वैजापूर तालुक्यातील आलापूरवाडी, शिऊर गाव, कोल्ही, कोरडगाव, साफियाबादवाडी, शिरोडी, भादली, पारळा, नालेगाव, पानगव्हाण, मुंडवाडी, वडनेर, शिवगाव, हाजीपूरवाडी, बिबखेडा, भायगाव, शिवगाव, रोटेगाव, बाभूळतेल येथील पाझर तलावांची कामे न होताच बिले उचलण्यात आल्याचा संशय व्यक्त होतो आहे. उपविभागीय अभियंता आणि कार्यकारी अभियंत्यांनी भौतिकदृष्ट्या सर्व कामे पूर्ण करण्यात आल्याचे प्रमाणित केले आहे.१०० हेक्टर सिंचन क्षमतेच्या गाव पाझर तलांवाकरिता सप्टेंबर महिन्यात शासनाने थकबाकी देण्याबाबत निधी दिला. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली आहे. मृदू व जलंसधारण आयुक्त दीपक सिंगला यांनी राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या कामाची देयके अदा करताना दक्षता घेण्यासाठी विशेष परिपत्रक जारी केले होते; परंतु त्याची पायमल्ली झाल्याचे दिसत आहे. २०१६ ते २०१८ पर्यंत ५८ कोटी रुपयांचा चुराडा पाझर तलाव सिंचनावर झालेला आहे. त्यातून किती सिंचन झाले, याबाबतची ठोस माहिती काही पुढे येत नाही. उलट गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. औरंगाबाद, वैजापूर, कन्नड, फुलंब्री, गंगापूर या तालुक्यांतील कामांची चौकशीची मागणी होत आहे.साडेबारा लाख गेले कुठेसोयगाव तालुक्यातील हळदा येथील पाझर तलावाचे काम पूर्ण होऊन त्याचे साडेबारा लाखांचे बिल अदा करण्यात आले. सविता मजूर सहकारी संस्थेने ते काम केले. पॅनकार्ड, टीडीएस, जीएसटी हे सगळे कररूपी सोपस्कार पार पडल्यानंतर ७९६३३२ या क्रमांकाचा धनादेश संस्थेला देण्यात आला; परंतु सदरील रक्कम या संस्थेच्या खात्यात जमा झाली नाही. शिवाय आॅगस्ट महिन्यात काम अर्धवट असल्याचे कनिष्ठ अभियंत्याने चौकशी करण्याचे आदेश लघुसिंचन कार्यकारी अभियंत्याने दिले. या सगळ्या प्रकारात साडेबारा लाख कुठे गेले याचे उत्तर मात्र मिळत नाही.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पCrime Newsगुन्हेगारी