शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत आणि चीन रशिया-युक्रेन युद्धाला निधी देत ​​आहेत"; तेल खरेदीवरून ट्रम्प यांचा UNGA मध्ये आरोप
2
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
3
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
4
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
5
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
6
PAK vs SL War of Celebration :पाक गोलंदाजाने कळ काढली; हसरंगानं त्याचा बदला घेतला, पण... (VIDEO)
7
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
8
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
9
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
10
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
11
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
12
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
13
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
14
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
15
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
16
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
17
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
18
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
19
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
20
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

२६२ गावांत रखडली ‘जलयुक्त’ची कामे

By admin | Updated: May 22, 2016 00:04 IST

लातूर : सिंचन क्षेत्रामध्ये वाढ व्हावी म्हणून कृषी विभागामार्फत लातूर जिल्ह्यात २०२ गावात जलयुक्तची कामे मंजूर करण्यात आली़

लातूर : सिंचन क्षेत्रामध्ये वाढ व्हावी म्हणून कृषी विभागामार्फत लातूर जिल्ह्यात २०२ गावात जलयुक्तची कामे मंजूर करण्यात आली़ यातील १०५ गावातील कामे पूर्ण झाली आहेत़ तर ९७ गावात अजूनही कामाला मुहूर्त लागला नाही़ पहिल्या टप्प्यातील कामे रखडलेली असताना कृषी विभागाने त्याकडे दुर्लक्ष करीत नवीन वर्षातील गावाची निवड केली आहे़ सध्या २६२ गावात जलयुक्तची कामे रखडली आहेत़ कृषी विभागाने २०१४-१५ साठी लातूर तालुक्यातील २८, रेणापूर तालुक्यातील १६, औसा ३५, निलंगा ३१, शिरुर अनंतपाळ ९, उदगीर २२, जळकोट १०, देवणी ११, अहमदपूर २२, शिरुर अनंतपाळ ९ अशा एकूण २०२ गावांची निवड केली़ निवडलेल्या २०२ गावात कंपार्टमेंट बल्डींग, माती नाला बांध, सिमेंट बंधारे दुरुस्ती, एटी वेअर दुरुस्ती, पाझर तलाव दुरुस्ती, गॅबियन बंधारे, वृक्ष लागवड, समतल चर, रिचार्ड शाफ्ट अशी २८ प्रकारची कामे सुरु करण्यात आली आहेत़ यातील एकूण गावांपैकी १०५ गावातील जलयुक्तची कामे पूर्ण झाली आहेत़ उर्वरीत गावांपैकी ३५ गावात ५० टक्केपेक्षा जास्त कामे झाली आहेत़ जूनअखेर पाण्याच्या ताळेबंदानुसार १५० गावातील कामे पूर्ण होतील असा दावा कृषी विभागातील अधिकाऱ्यांकडून केला जात असला तरी हे उर्वरीत कामे रखडली असल्याचे चित्र जिल्हाभरात दिसून येत आहेत़ त्यातच २०१५-१६ च्या नवीन कामाची निवड करून त्याही गावातील कामाला गती देण्यात आली आहे़ मागील वर्षी मंजूर करण्यात आलेली कामे अपुरी असताना नवीन वर्षातील कामे सुरु केलीच कशी असा प्रश्न शेतकरी नागरिकांतून उपस्थित केला जात आहे़ जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत लातूर जिल्ह्यातील २०२ गावात २०१४ - १५ मध्ये कामे सुरु केली आहेत़ ही कामे पूर्ण झाली नाहीत तोवरच नवीन गावाची निवड करण्याची घाई कृषी विभागाने केली आहे़ परंतू, गत वर्षीच्या कामासाठी जून अखेरची डेडलाईन दिली असतानाही नवीन गावे निवडल्याने कृषी विभागाचा अनागोंधी कारभार दुष्काळी परिस्थितीतही समोर आला असल्याचे शेतकरी भरत जाधव म्हणाले़जलयुक्त शिवार अभियानच्या माध्यमातून निवड केलेल्या एकूण गावापैकी ४५ गावातील कामे लोकसहभागातून सुरु आहेत़ या कामातही सातत्य ठेवले असल्याने भविष्यात या गावातील सिंचन क्षेत्र वाढणार असल्याचे जिल्हा कृषी अधिक्षक प्रतापसिंह कदम म्हणाले़