शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
2
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
3
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
4
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
5
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
6
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
7
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
8
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
9
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
10
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
11
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
12
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
13
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
14
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
15
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
16
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
17
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
18
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
19
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
20
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू

२६२ गावांत रखडली ‘जलयुक्त’ची कामे

By admin | Updated: May 22, 2016 00:04 IST

लातूर : सिंचन क्षेत्रामध्ये वाढ व्हावी म्हणून कृषी विभागामार्फत लातूर जिल्ह्यात २०२ गावात जलयुक्तची कामे मंजूर करण्यात आली़

लातूर : सिंचन क्षेत्रामध्ये वाढ व्हावी म्हणून कृषी विभागामार्फत लातूर जिल्ह्यात २०२ गावात जलयुक्तची कामे मंजूर करण्यात आली़ यातील १०५ गावातील कामे पूर्ण झाली आहेत़ तर ९७ गावात अजूनही कामाला मुहूर्त लागला नाही़ पहिल्या टप्प्यातील कामे रखडलेली असताना कृषी विभागाने त्याकडे दुर्लक्ष करीत नवीन वर्षातील गावाची निवड केली आहे़ सध्या २६२ गावात जलयुक्तची कामे रखडली आहेत़ कृषी विभागाने २०१४-१५ साठी लातूर तालुक्यातील २८, रेणापूर तालुक्यातील १६, औसा ३५, निलंगा ३१, शिरुर अनंतपाळ ९, उदगीर २२, जळकोट १०, देवणी ११, अहमदपूर २२, शिरुर अनंतपाळ ९ अशा एकूण २०२ गावांची निवड केली़ निवडलेल्या २०२ गावात कंपार्टमेंट बल्डींग, माती नाला बांध, सिमेंट बंधारे दुरुस्ती, एटी वेअर दुरुस्ती, पाझर तलाव दुरुस्ती, गॅबियन बंधारे, वृक्ष लागवड, समतल चर, रिचार्ड शाफ्ट अशी २८ प्रकारची कामे सुरु करण्यात आली आहेत़ यातील एकूण गावांपैकी १०५ गावातील जलयुक्तची कामे पूर्ण झाली आहेत़ उर्वरीत गावांपैकी ३५ गावात ५० टक्केपेक्षा जास्त कामे झाली आहेत़ जूनअखेर पाण्याच्या ताळेबंदानुसार १५० गावातील कामे पूर्ण होतील असा दावा कृषी विभागातील अधिकाऱ्यांकडून केला जात असला तरी हे उर्वरीत कामे रखडली असल्याचे चित्र जिल्हाभरात दिसून येत आहेत़ त्यातच २०१५-१६ च्या नवीन कामाची निवड करून त्याही गावातील कामाला गती देण्यात आली आहे़ मागील वर्षी मंजूर करण्यात आलेली कामे अपुरी असताना नवीन वर्षातील कामे सुरु केलीच कशी असा प्रश्न शेतकरी नागरिकांतून उपस्थित केला जात आहे़ जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत लातूर जिल्ह्यातील २०२ गावात २०१४ - १५ मध्ये कामे सुरु केली आहेत़ ही कामे पूर्ण झाली नाहीत तोवरच नवीन गावाची निवड करण्याची घाई कृषी विभागाने केली आहे़ परंतू, गत वर्षीच्या कामासाठी जून अखेरची डेडलाईन दिली असतानाही नवीन गावे निवडल्याने कृषी विभागाचा अनागोंधी कारभार दुष्काळी परिस्थितीतही समोर आला असल्याचे शेतकरी भरत जाधव म्हणाले़जलयुक्त शिवार अभियानच्या माध्यमातून निवड केलेल्या एकूण गावापैकी ४५ गावातील कामे लोकसहभागातून सुरु आहेत़ या कामातही सातत्य ठेवले असल्याने भविष्यात या गावातील सिंचन क्षेत्र वाढणार असल्याचे जिल्हा कृषी अधिक्षक प्रतापसिंह कदम म्हणाले़