शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

२६२ गावांत रखडली ‘जलयुक्त’ची कामे

By admin | Updated: May 22, 2016 00:04 IST

लातूर : सिंचन क्षेत्रामध्ये वाढ व्हावी म्हणून कृषी विभागामार्फत लातूर जिल्ह्यात २०२ गावात जलयुक्तची कामे मंजूर करण्यात आली़

लातूर : सिंचन क्षेत्रामध्ये वाढ व्हावी म्हणून कृषी विभागामार्फत लातूर जिल्ह्यात २०२ गावात जलयुक्तची कामे मंजूर करण्यात आली़ यातील १०५ गावातील कामे पूर्ण झाली आहेत़ तर ९७ गावात अजूनही कामाला मुहूर्त लागला नाही़ पहिल्या टप्प्यातील कामे रखडलेली असताना कृषी विभागाने त्याकडे दुर्लक्ष करीत नवीन वर्षातील गावाची निवड केली आहे़ सध्या २६२ गावात जलयुक्तची कामे रखडली आहेत़ कृषी विभागाने २०१४-१५ साठी लातूर तालुक्यातील २८, रेणापूर तालुक्यातील १६, औसा ३५, निलंगा ३१, शिरुर अनंतपाळ ९, उदगीर २२, जळकोट १०, देवणी ११, अहमदपूर २२, शिरुर अनंतपाळ ९ अशा एकूण २०२ गावांची निवड केली़ निवडलेल्या २०२ गावात कंपार्टमेंट बल्डींग, माती नाला बांध, सिमेंट बंधारे दुरुस्ती, एटी वेअर दुरुस्ती, पाझर तलाव दुरुस्ती, गॅबियन बंधारे, वृक्ष लागवड, समतल चर, रिचार्ड शाफ्ट अशी २८ प्रकारची कामे सुरु करण्यात आली आहेत़ यातील एकूण गावांपैकी १०५ गावातील जलयुक्तची कामे पूर्ण झाली आहेत़ उर्वरीत गावांपैकी ३५ गावात ५० टक्केपेक्षा जास्त कामे झाली आहेत़ जूनअखेर पाण्याच्या ताळेबंदानुसार १५० गावातील कामे पूर्ण होतील असा दावा कृषी विभागातील अधिकाऱ्यांकडून केला जात असला तरी हे उर्वरीत कामे रखडली असल्याचे चित्र जिल्हाभरात दिसून येत आहेत़ त्यातच २०१५-१६ च्या नवीन कामाची निवड करून त्याही गावातील कामाला गती देण्यात आली आहे़ मागील वर्षी मंजूर करण्यात आलेली कामे अपुरी असताना नवीन वर्षातील कामे सुरु केलीच कशी असा प्रश्न शेतकरी नागरिकांतून उपस्थित केला जात आहे़ जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत लातूर जिल्ह्यातील २०२ गावात २०१४ - १५ मध्ये कामे सुरु केली आहेत़ ही कामे पूर्ण झाली नाहीत तोवरच नवीन गावाची निवड करण्याची घाई कृषी विभागाने केली आहे़ परंतू, गत वर्षीच्या कामासाठी जून अखेरची डेडलाईन दिली असतानाही नवीन गावे निवडल्याने कृषी विभागाचा अनागोंधी कारभार दुष्काळी परिस्थितीतही समोर आला असल्याचे शेतकरी भरत जाधव म्हणाले़जलयुक्त शिवार अभियानच्या माध्यमातून निवड केलेल्या एकूण गावापैकी ४५ गावातील कामे लोकसहभागातून सुरु आहेत़ या कामातही सातत्य ठेवले असल्याने भविष्यात या गावातील सिंचन क्षेत्र वाढणार असल्याचे जिल्हा कृषी अधिक्षक प्रतापसिंह कदम म्हणाले़