शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
2
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
3
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
4
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
5
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
6
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
7
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
8
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
9
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
10
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
11
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
12
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
13
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
14
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
15
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
16
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
17
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
18
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
19
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
20
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश

औरंगाबाद-धुळे महामार्गाचे काम अर्धे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 00:35 IST

धुळे-औरंगाबाद-सोलापूर या राष्ट्रीय महामार्ग क्र.२११ साठी भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होत आली असली तरी नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या अनास्थेमुळे या महामार्गाच्या कामाची डेडलाईन हुकली आहे. मार्चअखेरची डेडलाईन हुकली असून, डिसेंबर २०१८ पर्यंतही रस्ता पूर्ण होणे शक्य नसल्याचे दिसते आहे.

ठळक मुद्देडेडलाईन हुकली : सोलापूर ते येडशीपर्यंतचेच झाले काम; नाक्याला विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : धुळे-औरंगाबाद-सोलापूर या राष्ट्रीय महामार्ग क्र.२११ साठी भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होत आली असली तरी नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या अनास्थेमुळे या महामार्गाच्या कामाची डेडलाईन हुकली आहे. मार्चअखेरची डेडलाईन हुकली असून, डिसेंबर २०१८ पर्यंतही रस्ता पूर्ण होणे शक्य नसल्याचे दिसते आहे. औरंगाबाद ते धुळेपर्यंतच्या कामाचे टेंडर गेल्या महिन्यात अंतिम झाले आहे. तर सोलापूर ते येडशीपर्यंतचे ५० टक्के काम पूर्ण झाले असून, येडशी येथील टोलनाक्याला विरोध सुरू झाला आहे.मार्च २०१८ पर्यंत रस्ता पूर्ण होईल, असा दावा केला जात होता. आता डिसेंबरअखेर रस्ता पूर्ण होण्याचा दावा एनएचएआय करीत आहे. सोलापूर ते येडशीपर्यंत रस्त्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे.त्यापुढील रस्त्याचे काम मंदगतीने सुरू आहे. येडशी ते औरंगाबाद या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी जवळपास संपूर्ण भूसंपादन होत आले आहे. रस्त्याचे काम ८० टक्के पूर्ण झाल्याची अधिसूचना काढण्यात आल्यानंतर कंत्राटदार कंपनी कंपनीला टोल वसूल करण्याची मुभा मिळणार होती. परंतु ८० टक्के काम पूर्ण होण्यापूर्वीच येडशी येथे टोल उभारण्यात आला आहे. तेथील टोल वसुलीला विरोध सुरू झाला आहे.अपघातांचे प्रमाण वाढलेचौसाळा, मांजरसुंबा, बीड (बायपासचे काम जवळपास पूर्ण), शहागड, पाचोड, आडूळपर्यंतचे काम अर्धवट झालेले आहे. चौपदरी आणि कुठे वळण दिल्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवास करताना अपघातांचे प्रमाण वाढले आहे. झाल्टा, गांधेलीमार्गे वाल्मी ते करोडीमार्गे कन्नड ते धुळे या उर्वरित महामार्गाच्या कामाच्या निविदा मंजूर होऊन काम सुरू झाल्याचा दावा केला जात आहे. येडशी ते औरंगाबाद या दुसºया टप्प्यामध्ये महसूल विभागाकडून बहुतांश भूसंपादन पूर्ण करण्यात आले आहे. महामार्गातील ७०० पैकी ६६२ हेक्टर जमीन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला हस्तांतरित करण्यात आली आहे. जुन्या रस्त्यावर पूर्णत: खड्डे पडले असून, औरंगाबाद ते बीडपर्यंत महामार्गावरून प्रवास करताना अनेक अडचणी येत असल्याचे वाहनचालक आणि प्रवासी सांगतात.

टॅग्स :highwayमहामार्गAurangabadऔरंगाबादDhuleधुळे