शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

ऊन, भारनियमन, पाणीटंचाईचा तडाखा

By admin | Updated: May 25, 2014 01:32 IST

औरंगाबाद : शनिवारचा दिवस औरंगाबादकरांसाठी त्रासदायक ठरला. उन्हाच्या जोरदार झळांनी नागरिकांना बाहेर पडणे अवघड झाले.

औरंगाबाद : शनिवारचा दिवस औरंगाबादकरांसाठी त्रासदायक ठरला. उन्हाच्या जोरदार झळांनी नागरिकांना बाहेर पडणे अवघड झाले. शहराचे तापमान ४१.२८ अंश सेल्सिअसपर्यंत गेले. उन्हाचा तडाखा चालू असतानाच काही भागांमध्ये अघोषित भारनियमनामुळे लहानथोर घामाघूम झाले. या दोन संकटांचा मुकाबला करतानाच विस्कळीत पाणीपुरवठ्याचा परिणाम म्हणून शहरवासीयांना आज पाण्यासाठी भटकंती करावी लागली व धावपळही करावी लागली. अनेक व्हॉल्व्हची दुरुस्ती न झाल्यामुळे कमी दाबाने अनेक भागात पाणीपुरवठा होत असल्याच्या रहिवाशांच्या तक्रारी आहेत.: महिन्यापासून शहराचे तापमान वाढतच आहे. शनिवारी तापमान ४१.२८ अंश सेल्सिअसवर गेले होते. त्यामुळे गजबजलेल्या रस्त्यांवरील वर्दळ घटली होती. नेहमी वर्दळ असणार्‍या क्रांतीचौक, पैठणगेट, गुलमंडी, औरंगपुरा, कॅनॉट गार्डन, सिडको, हडको भागात गर्दी घटली होती. असह्य उन्हामुळे नागरिकांनी घरात राहणे पसंद केले. उन्हामुळे बाजारपेठेवरही परिणाम झाला. ग्राहकांची उपस्थिती लक्षणीय घटली होती. रस्त्यावर तुरळक वाहने दिसत होती. बहुतेक महिला व पुरुषांनी उन्हापासून संरक्षणासाठी तोंडाला रुमाल बांधला होता. बाजारपेठेत जी वर्दळ दिसत होती त्यांच्यापैकी बहुतेकांकडे छत्री होती. सुट्यांचा आनंद घेण्यासाठी लहान मुले उन्हामुळेच उद्यान व मैदानावर दिसली नाहीत. गेल्या महिन्याभराचे तापमान पाहता रविवारीही पारा चढलेलाच राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. लग्नसराईच्या खरेदीसाठी आज शहरात आलेल्या नागरिकांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी नाकातोंडाला गमचे बांधलले दिसले. शहागंज परिसरात थंड पेयाच्या गाड्यांवर नागरिकांची गर्दी दिसली. येत्या दोन ते तीन दिवसांत शहरातील तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.औरंगाबाद शहराचे मे महिन्याचे तापमान हे सरासरी ३९ अंश सेल्सिअस इतके आहे. गेल्या वर्षी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर एप्रिल आणि मे महिन्यांत तापमान सातत्याने अधिकतम राहिले होते. यंदाही मे महिन्यात तापमानाने उंची गाठली. मे महिन्यात पारा ४४.६ अंश सेल्सिअसपर्यंत गेला. गेल्या तीन ते चार दिवसांपासून शहर आणि परिसरात तापमान वाढलेले दिसत आहे.