शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

परराज्यात महिलांच्या विक्रीचा गोरखधंदा तेजीत; ६ वर्षांत औरंगाबादमधील ५०८ महिला बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 13:19 IST

नोकरी, व्यवसाय व लग्नाच्या आमिषाने परप्रांतात नेऊन विक्री करण्याचा गोरखधंदा तेजीत

ठळक मुद्देशहरातून बेपत्ता महिलांचे नेमके झाले काय? कामासाठी परराज्यात जायचे असल्याची थाप मारून विक्री

- बापू सोळुंके औरंगाबाद : १५ दिवसांसाठी कामाला जायचेय अशी थाप मारून गरजू महिलांना परराज्यात नेऊन त्यांची विक्री केली जात असल्याच्या घटना समोर येत आहेत. याप्रकरणी गतवर्षी जवाहनगर, हर्सूल ठाण्यात तीन महिलांची विक्री करणाऱ्या वेगवेगळ्या रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर जिन्सी पोलिसांनी आणखी एका रॅकेटमधील आरोपींना चार दिवसांपूर्वी बेड्या ठोकल्या. सहा वर्षांत शहरातून बेपत्ता असलेल्या ५०८ महिलांपैकी किती जणी रॅकेटच्या बळी ठरल्या आहेत, याचे गूढ मात्र उकलले नाही. 

कामासाठी परराज्यात जायचे असल्याची थाप मारून सोबत नेलेल्या गरजू महिलेचे लग्न तिच्या संमतीविना अनोळखी व्यक्तीसोबत लावले जाते. खरेदीदार काही दिवस तिचा सांभाळ करतो आणि नंतर तोसुद्धा त्या महिलेची दुसऱ्याला विक्री करतो. औरंगाबादेतील एका महिलेची दीड लाखात गुजरातच्या नीलेश पटेल याला अडीच वर्षांपूर्वी विक्री करण्यात आली होती. स्वत:ची सुटका करून औरंगाबादेत परतलेल्या महिलेने जिन्सी पोलिसांना तक्रार नोंदविली. यानंतर या रॅकेटमधील  दोन महिलांसह एका तरुणाला चार दिवसांपूर्वी अटक झाली. खरेदीदार नीलेश पटेल याला गुजरातमध्ये अटक करण्यात पोलिसांना यश आले. हर्सूल परिसरातून कामासाठी गेलेल्या तरुणीला ७० हजार रुपयांत विकण्यात आले होते. हा प्रकार समजल्यानंतर हर्सूल पोलिसांनी खरेदीदार पिता-पुत्राला अटक केली होती. गारखेड्यातील इंदिरानगर येथील दोन गरजू महिलांची परप्रांतात विक्री करण्यात आल्याचा गंभीर प्रकार जवाहरनगर पोलिसांनी उघडकीस आणला होता. यापैकी एक तरुणी अद्यापही पोलिसांना सापडली नाही. 

वर्षभरात तीन घटना समोर आल्या आहेत. १ जानेवारी २०१४ ते ३१ डिसेंबर २०१९ या सहा वर्षांत ५०८ महिला बेपत्ता असल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे. या सर्व महिला १८ वर्षांवरील आहेत. यापैकी किती महिलांची लग्नासाठी परप्रांतात विक्री करण्यात आली, याबाबतची माहिती पोलिसांकडे नाही. असे असले तरी शहरातील महिलांना कामानिमित्त परराज्यात नेऊन विक्री केली जाते, हे वर्षभरातील तीन घटनांवरून स्पष्ट झाले आहे. 

‘त्या’ राज्यात मागणी

मुलींचा जन्मदर कमी असलेल्या राज्यातील तरुणांना विवाहासाठी मुलगी मिळणे कठीण झाले. वयाची चाळिशी ओलांडल्यानंतरही लग्न होत नसल्याने असे घोडनवरदेव गरजू महिलांची खरेदी करून त्यांच्यासोबत विवाह करीत असल्याचे समोर आले. महिलांची खरेदी-विक्री करणाऱ्या रॅकेटचे धागेदोरे औरंगाबादमध्ये असल्याचे समोर आले. 

बेपत्ता महिलांची तक्रार आल्यानंतर पोलीस त्यांचा शोध घेऊन परत आणण्याचा प्रयत्न करतात. मात्र, ज्या महिला स्वेच्छेने घरातून निघून जातात. बऱ्याचदा त्या देहविक्रय व्यवसाय करतात. बदनामी होईल म्हणून त्या घरी येत नाहीत. बेपत्ता महिलांच्या विक्रीची आकडेवारी आमच्याकडे  नाही. मात्र, गतवर्षी जवाहरनगर, हर्सूल  आणि आता जिन्सी ठाण्यात या गुन्ह्यांची नोंद झाली.- डॉ. नागनाथ कोडे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा

वर्ष    हरवलेल्या     शोध न लागलेल्या               महिला    महिलांची संख्या२०१४    ५१३         ३७२०१५    ६१८        ४८२०१६    ४८३        ५२२०१७    ४२८        ६०२०१८    ५५४        ७३२०१९    ६१२        ११९शोध न लागलेल्या महिला - ५०८

 

टॅग्स :WomenमहिलाKidnappingअपहरणPoliceपोलिसAurangabadऔरंगाबाद