शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
5
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
6
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
7
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
8
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
9
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
10
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
11
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
12
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
13
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
14
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
15
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
16
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
17
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
18
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
19
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
20
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत

परराज्यात महिलांच्या विक्रीचा गोरखधंदा तेजीत; ६ वर्षांत औरंगाबादमधील ५०८ महिला बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 13:19 IST

नोकरी, व्यवसाय व लग्नाच्या आमिषाने परप्रांतात नेऊन विक्री करण्याचा गोरखधंदा तेजीत

ठळक मुद्देशहरातून बेपत्ता महिलांचे नेमके झाले काय? कामासाठी परराज्यात जायचे असल्याची थाप मारून विक्री

- बापू सोळुंके औरंगाबाद : १५ दिवसांसाठी कामाला जायचेय अशी थाप मारून गरजू महिलांना परराज्यात नेऊन त्यांची विक्री केली जात असल्याच्या घटना समोर येत आहेत. याप्रकरणी गतवर्षी जवाहनगर, हर्सूल ठाण्यात तीन महिलांची विक्री करणाऱ्या वेगवेगळ्या रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर जिन्सी पोलिसांनी आणखी एका रॅकेटमधील आरोपींना चार दिवसांपूर्वी बेड्या ठोकल्या. सहा वर्षांत शहरातून बेपत्ता असलेल्या ५०८ महिलांपैकी किती जणी रॅकेटच्या बळी ठरल्या आहेत, याचे गूढ मात्र उकलले नाही. 

कामासाठी परराज्यात जायचे असल्याची थाप मारून सोबत नेलेल्या गरजू महिलेचे लग्न तिच्या संमतीविना अनोळखी व्यक्तीसोबत लावले जाते. खरेदीदार काही दिवस तिचा सांभाळ करतो आणि नंतर तोसुद्धा त्या महिलेची दुसऱ्याला विक्री करतो. औरंगाबादेतील एका महिलेची दीड लाखात गुजरातच्या नीलेश पटेल याला अडीच वर्षांपूर्वी विक्री करण्यात आली होती. स्वत:ची सुटका करून औरंगाबादेत परतलेल्या महिलेने जिन्सी पोलिसांना तक्रार नोंदविली. यानंतर या रॅकेटमधील  दोन महिलांसह एका तरुणाला चार दिवसांपूर्वी अटक झाली. खरेदीदार नीलेश पटेल याला गुजरातमध्ये अटक करण्यात पोलिसांना यश आले. हर्सूल परिसरातून कामासाठी गेलेल्या तरुणीला ७० हजार रुपयांत विकण्यात आले होते. हा प्रकार समजल्यानंतर हर्सूल पोलिसांनी खरेदीदार पिता-पुत्राला अटक केली होती. गारखेड्यातील इंदिरानगर येथील दोन गरजू महिलांची परप्रांतात विक्री करण्यात आल्याचा गंभीर प्रकार जवाहरनगर पोलिसांनी उघडकीस आणला होता. यापैकी एक तरुणी अद्यापही पोलिसांना सापडली नाही. 

वर्षभरात तीन घटना समोर आल्या आहेत. १ जानेवारी २०१४ ते ३१ डिसेंबर २०१९ या सहा वर्षांत ५०८ महिला बेपत्ता असल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे. या सर्व महिला १८ वर्षांवरील आहेत. यापैकी किती महिलांची लग्नासाठी परप्रांतात विक्री करण्यात आली, याबाबतची माहिती पोलिसांकडे नाही. असे असले तरी शहरातील महिलांना कामानिमित्त परराज्यात नेऊन विक्री केली जाते, हे वर्षभरातील तीन घटनांवरून स्पष्ट झाले आहे. 

‘त्या’ राज्यात मागणी

मुलींचा जन्मदर कमी असलेल्या राज्यातील तरुणांना विवाहासाठी मुलगी मिळणे कठीण झाले. वयाची चाळिशी ओलांडल्यानंतरही लग्न होत नसल्याने असे घोडनवरदेव गरजू महिलांची खरेदी करून त्यांच्यासोबत विवाह करीत असल्याचे समोर आले. महिलांची खरेदी-विक्री करणाऱ्या रॅकेटचे धागेदोरे औरंगाबादमध्ये असल्याचे समोर आले. 

बेपत्ता महिलांची तक्रार आल्यानंतर पोलीस त्यांचा शोध घेऊन परत आणण्याचा प्रयत्न करतात. मात्र, ज्या महिला स्वेच्छेने घरातून निघून जातात. बऱ्याचदा त्या देहविक्रय व्यवसाय करतात. बदनामी होईल म्हणून त्या घरी येत नाहीत. बेपत्ता महिलांच्या विक्रीची आकडेवारी आमच्याकडे  नाही. मात्र, गतवर्षी जवाहरनगर, हर्सूल  आणि आता जिन्सी ठाण्यात या गुन्ह्यांची नोंद झाली.- डॉ. नागनाथ कोडे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा

वर्ष    हरवलेल्या     शोध न लागलेल्या               महिला    महिलांची संख्या२०१४    ५१३         ३७२०१५    ६१८        ४८२०१६    ४८३        ५२२०१७    ४२८        ६०२०१८    ५५४        ७३२०१९    ६१२        ११९शोध न लागलेल्या महिला - ५०८

 

टॅग्स :WomenमहिलाKidnappingअपहरणPoliceपोलिसAurangabadऔरंगाबाद