शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

परराज्यात महिलांच्या विक्रीचा गोरखधंदा तेजीत; ६ वर्षांत औरंगाबादमधील ५०८ महिला बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 13:19 IST

नोकरी, व्यवसाय व लग्नाच्या आमिषाने परप्रांतात नेऊन विक्री करण्याचा गोरखधंदा तेजीत

ठळक मुद्देशहरातून बेपत्ता महिलांचे नेमके झाले काय? कामासाठी परराज्यात जायचे असल्याची थाप मारून विक्री

- बापू सोळुंके औरंगाबाद : १५ दिवसांसाठी कामाला जायचेय अशी थाप मारून गरजू महिलांना परराज्यात नेऊन त्यांची विक्री केली जात असल्याच्या घटना समोर येत आहेत. याप्रकरणी गतवर्षी जवाहनगर, हर्सूल ठाण्यात तीन महिलांची विक्री करणाऱ्या वेगवेगळ्या रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर जिन्सी पोलिसांनी आणखी एका रॅकेटमधील आरोपींना चार दिवसांपूर्वी बेड्या ठोकल्या. सहा वर्षांत शहरातून बेपत्ता असलेल्या ५०८ महिलांपैकी किती जणी रॅकेटच्या बळी ठरल्या आहेत, याचे गूढ मात्र उकलले नाही. 

कामासाठी परराज्यात जायचे असल्याची थाप मारून सोबत नेलेल्या गरजू महिलेचे लग्न तिच्या संमतीविना अनोळखी व्यक्तीसोबत लावले जाते. खरेदीदार काही दिवस तिचा सांभाळ करतो आणि नंतर तोसुद्धा त्या महिलेची दुसऱ्याला विक्री करतो. औरंगाबादेतील एका महिलेची दीड लाखात गुजरातच्या नीलेश पटेल याला अडीच वर्षांपूर्वी विक्री करण्यात आली होती. स्वत:ची सुटका करून औरंगाबादेत परतलेल्या महिलेने जिन्सी पोलिसांना तक्रार नोंदविली. यानंतर या रॅकेटमधील  दोन महिलांसह एका तरुणाला चार दिवसांपूर्वी अटक झाली. खरेदीदार नीलेश पटेल याला गुजरातमध्ये अटक करण्यात पोलिसांना यश आले. हर्सूल परिसरातून कामासाठी गेलेल्या तरुणीला ७० हजार रुपयांत विकण्यात आले होते. हा प्रकार समजल्यानंतर हर्सूल पोलिसांनी खरेदीदार पिता-पुत्राला अटक केली होती. गारखेड्यातील इंदिरानगर येथील दोन गरजू महिलांची परप्रांतात विक्री करण्यात आल्याचा गंभीर प्रकार जवाहरनगर पोलिसांनी उघडकीस आणला होता. यापैकी एक तरुणी अद्यापही पोलिसांना सापडली नाही. 

वर्षभरात तीन घटना समोर आल्या आहेत. १ जानेवारी २०१४ ते ३१ डिसेंबर २०१९ या सहा वर्षांत ५०८ महिला बेपत्ता असल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे. या सर्व महिला १८ वर्षांवरील आहेत. यापैकी किती महिलांची लग्नासाठी परप्रांतात विक्री करण्यात आली, याबाबतची माहिती पोलिसांकडे नाही. असे असले तरी शहरातील महिलांना कामानिमित्त परराज्यात नेऊन विक्री केली जाते, हे वर्षभरातील तीन घटनांवरून स्पष्ट झाले आहे. 

‘त्या’ राज्यात मागणी

मुलींचा जन्मदर कमी असलेल्या राज्यातील तरुणांना विवाहासाठी मुलगी मिळणे कठीण झाले. वयाची चाळिशी ओलांडल्यानंतरही लग्न होत नसल्याने असे घोडनवरदेव गरजू महिलांची खरेदी करून त्यांच्यासोबत विवाह करीत असल्याचे समोर आले. महिलांची खरेदी-विक्री करणाऱ्या रॅकेटचे धागेदोरे औरंगाबादमध्ये असल्याचे समोर आले. 

बेपत्ता महिलांची तक्रार आल्यानंतर पोलीस त्यांचा शोध घेऊन परत आणण्याचा प्रयत्न करतात. मात्र, ज्या महिला स्वेच्छेने घरातून निघून जातात. बऱ्याचदा त्या देहविक्रय व्यवसाय करतात. बदनामी होईल म्हणून त्या घरी येत नाहीत. बेपत्ता महिलांच्या विक्रीची आकडेवारी आमच्याकडे  नाही. मात्र, गतवर्षी जवाहरनगर, हर्सूल  आणि आता जिन्सी ठाण्यात या गुन्ह्यांची नोंद झाली.- डॉ. नागनाथ कोडे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा

वर्ष    हरवलेल्या     शोध न लागलेल्या               महिला    महिलांची संख्या२०१४    ५१३         ३७२०१५    ६१८        ४८२०१६    ४८३        ५२२०१७    ४२८        ६०२०१८    ५५४        ७३२०१९    ६१२        ११९शोध न लागलेल्या महिला - ५०८

 

टॅग्स :WomenमहिलाKidnappingअपहरणPoliceपोलिसAurangabadऔरंगाबाद