शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल; पित्याच्या आत्महत्याप्रकरणी चार जणांना अटक
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

पिसादेवी परिसरात गहू काढल्यानंतर शेतात उरलेल्या ओंब्या जमा करण्यासाठी महिलांची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2022 15:20 IST

सदरील महिलांची संवाद साधला असता त्यांनी सांगितले की गव्हाचे भाव अचानकपणे वाढल्याने एवढा महागव खरेदी करू शकत नाही.

औरंगाबाद- औरंगाबाद शहरातील पिसादेवी परिसरात शेतकऱ्यांनी गव्हाची सोंगणी केली.  शेतात लावलेला गहू काढला, आणि बाजारपेठेत गावाला भाव चांगला मिळायला लागला. मात्र काही गरीब कुटुंबाच्या गव्हाचे भाव आवाक्याच्या बाहेर गेल्याने पोटाची खळगी भरायची कशी असा मोठा प्रश्न काही कुटुंबांची समोर उभा राहिला आहे. मात्र आता यावर ती काही गरीब कुटुंबाने उपाय शोधून काढला असून गव्हाची सोंगणी झालेल्या शेतात, हे कुटुंब गव्हाच्या ओंब्या जमा करून वाया जाणारा गहू जमा करून सदरील कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न काही गरीब महिला करताना दिसत आहे.

सदरील महिलांची संवाद साधला असता त्यांनी सांगितले की गव्हाचे भाव अचानकपणे वाढल्याने एवढा महागव खरेदी करू शकत नाही. येणाऱ्या सणासुद आला व्हाची पोळी भेटावी या दृष्टिकोनातून आम्ही शेतातून वाया जाणार्‍या ओंब्या जमा करून त्यातून गहू जमा करत असल्याची भावना एका महिलेने माध्यमांशी बोलताना बोलून दाखवली आहे. या माध्यमातून एका शेतातून किमान 80 ते 90 किलो गहू जमा होतो. एका शेतातून गव्हाच्या ओंब्या जमा करायला सात ते आठ दिवस लागतात. मात्र यातून थोडाफार का होत नाही गहू जमा होतो अशी भावना सदरील महिलांनी बोलून दाखवली आहे.

एकीकडे कोरोनाच्या संसर्गामुळे हाताला असलेली कामे गेल्याने आता जगण्यासाठी नवीन धडपड काही कुटुंबांना करावी लागत आहे, याची प्रचिती आज औरंगाबाद शहरातील पिसादेवी या परिसरात पाहण्यास मिळाली एकीकडे एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करीत असताना स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना, दोन वेळचे अन्न मिळवण्यासाठी काही कुटुंबांना अशी धडपड करावी लागत असल्याचे चित्र आज औरंगाबाद जिल्ह्यात समोर आले आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद